शहरं
Join us  
Trending Stories
1
जपानमधील एका एक्सप्रेसवेवर ५० हून अधिक वाहनांची टक्कर, एकाचा मृत्यू; २६ जण जखमी
2
"सीमा उघडा, आम्हाला वाचवा..."; बांगलादेशात अडकलेल्या हिंदूंची भारताकडे विनवणी
3
भयंकर! पंतप्रधान आवास योजनेचा मिळाला नाही लाभ; पेट्रोल टाकून थेट ग्रामपंचायतीला लावली आग
4
Nitish Kumar : Video - मुख्यमंत्री नितीश कुमारांच्या ताफ्यातील कारची DSP ना धडक; थोडक्यात वाचला जीव
5
दररोज करा छोटी बचत, मिळतील १७ लाख रुपये; पोस्ट ऑफिसची 'ही' स्कीम करेल मालामाल, पटापट पाहा डिटेल्स
6
PNB Fraud: पंजाब नॅशनल बँकेत पुन्हा झाला ₹२,४३४ कोटींचा घोटाळा; RBI ला दिली माहिती, कोणावर आहे आरोप?
7
वृश्चिक राशीसाठी नवीन वर्ष 2026: आव्हानांमधून प्रगतीची 'आशा'; परिश्रमात सातत्य ठेवल्यास होणार नाही निराशा 
8
मित्रपक्षाच्या ३ माजी नगरसेवकांवरही भाजपाचा गळ, ९०हून अधिक सक्षम उमेदवार असल्याचा दावा
9
औटघटकेची ठरली तिसऱ्या आघाडीची चर्चा! निलंबित नेत्यांची होणार घरवापसी, नागपुरात घेतली वरिष्ठांची भेट
10
काँग्रेसची ४८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर; २९ नवे चेहरे रिंगणात, पहिल्या यादीत कोणाची नावे?
11
तूळ राशीसाठी नवीन वर्ष 2026 नियोजन आणि स्वप्नपूर्तीचे वर्ष; 'या' एका चुकीमुळे होऊ शकते मोठे नुकसान!
12
पिंपरीत आम्ही १२५ जागा जिंकू, अजित पवारांना फक्त तीनच जागा मिळणार', भाजपा आमदाराचा दावा
13
फोननंतर विजयकुमारांचा बंडाचा झेंडा; गोरे, तडवळकर मुंबईकडे, उमेदवारीवरून रणकंदन
14
महाराष्ट्रभर पारा आणखी घसरणार! नवीन वर्षाचे स्वागत थंडीच्या कडाक्यानेच, तयार रहा...
15
आता कॅब बुक करताना मिळणार महिला ड्रायव्हर निवडण्याचा पर्याय, महिलांच्या सुरक्षेसाठा सरकारचा मोठं पाऊल
16
Salman Khan Birthday: मध्यरात्री पनवेलच्या फार्महाऊसवर सलमानने केलं वाढदिवसाचं जोरदार सेलिब्रेशन, व्हिडीओ व्हायरल
17
बांगलादेशमध्ये प्रसिद्ध गायक जेम्सच्या संगीत कार्यक्रमावर जमावाने केला हल्ला, अनेक जण जखमी
18
अमेरिका नाही, या मुस्लिम देशाने २०२५ मध्ये सर्वाधिक भारतीयांना बाहेर काढले; रशियाचाही समावेश
19
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २७ डिसेंबर २०२५: अविवाहितांना योग्य जोडीदार मिळू शकेल, प्राप्तीत वाढ होईल
20
संपादकीय: कुऱ्हाड - झाडांवर, निष्ठेवरही! महाजनांची मुजोरी आता कार्यकर्त्यांवरही...
Daily Top 2Weekly Top 5

कंपन्यांकडून सोयाबीनच्या बियाणाची परस्पर विक्री?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:20 IST

टाकळीभान : सोयाबीनला मिळालेल्या उच्चांकी दरामुळे शेतकऱ्यांचा सोयाबीन पेरणीकडे कल वाढला. मागील वर्षी अतिवृष्टीमुळे सोयाबीन भिजल्याने दर्जेदार बियाण्याचा ...

टाकळीभान : सोयाबीनला मिळालेल्या उच्चांकी दरामुळे शेतकऱ्यांचा सोयाबीन पेरणीकडे कल वाढला. मागील वर्षी अतिवृष्टीमुळे सोयाबीन भिजल्याने दर्जेदार बियाण्याचा तुटवडा होता. बियाणांची उगवण क्षमतेची अडचण लक्षात घेत बियाणे तयार करणाऱ्या नामवंत कंपन्यांनी सोयाबीनचे बियाणे व्यापाऱ्यांना, ऑईल मिल मालकांना परस्पर विकून टाकले. त्यामुळे शेतकऱ्यांना जास्त भावाने बियाणे विकत घ्यावे लागले.

श्रीरामपूर तालुक्यात बियाणे खरेदी करताना आर्थिक फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागला. चढ्या भावाने बियाणे विकत घ्यावे लागले. अनुदानावर मिळणारे बियाणेही मोजक्याच शेतकऱ्यांना मिळाले. त्यासाठीच्या ऑनलाइन नोंदणीतही मोठा गोंधळ उडाला. अनेक शेतकऱ्यांना ऑनलाइन प्रक्रियाच माहीत नाही. उपलब्ध बियाणेच शेतकऱ्यांनी पेरले. जून महिन्यात पावसाचा मोठा खंड पडला. त्याचाही विपरित परिणाम पेरणी झालेल्या सोयाबीनच्या उगवण क्षमतेवर झाला. अनेक भागात उशिरा झालेल्या पावसामुळे सोयाबीनच्या पेरण्या लांबल्या. अनेक शेतकऱ्यांपुढे दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले. त्यासाठी बियाणे पाहताना पुन्हा शेतकऱ्यांना मोठी ससेहोलपट करावी लागली. दुबार पेरणीसाठी श्रीरामपूर तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी बियाण्यासाठी नाशिक, धुळे, जळगाव, मालेगाव परिसरात धाव घेतली. तिकडेही शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक झाली. नफेखोर व्यापारी आणि अनेक कृषी व्यावसायिकांनी शेतकऱ्यांची बियाणांसाठी पद्धतशीर कोंडी केली.

मागील वर्षीच्या अनुभवामुळे नामवंत कंपन्यांनी सीड प्लॉटचे बियाणे स्थानिक व्यापाऱ्यांना तसेच ऑइल मिल मालकांना परस्पर विकून टाकले. या खेरीज अनेक मोठ्या कृषी विक्रेत्यांना आपल्याकडील बियाणांचा साठा तसाच ठेवण्याच्या सूचनाही करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. बियाण्यात होणाऱ्या फसवेगिरी विरोधातील शेतकऱ्यांमधील जागरूकता आणि शेतकरी संघटनांचा वाढता दबावमुळे संबंधित बियाणे कंपन्यांना असे पाऊल उचलावे लागल्याची चर्चा आहे.

............

महाबीज दरवर्षी राज्यात ६ ते ६.५ लाख क्विंटल बियाणे उत्पादन करते. यावर्षी केवळ २ ते २.५ लाख क्विंटल बियाणांचे उत्पादन शक्य झाले. अतिवृष्टीमुळे बियाणांच्या गुणवत्तेत २० टक्के घट आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात दरवर्षी २८ ते ३० हजार क्विंटल बियाणांची मागणी नोंदवली जाते. मागील वर्षी १०२ कंपन्यांच्या बियाणांबाबत तक्रारी झाल्या होत्या. या वर्षी अजून तक्रारी आलेल्या नाहीत.

- रवींद्र जोशी, जिल्हा व्यवस्थापक, महाबीज

...................

अनुदानावर उपलब्ध होणारे बियाणे यंदा श्रीरामपूर तालुक्यातील ५२ शेतकऱ्यांना ऑनलाइन सोडत पद्धतीने देण्यात आले आहे.

-अशोक साळी, तालुका कृषी अधिकारी, श्रीरामपूर