शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

नगर मनपा निवडणूक : शहरासाठी दिलीप गांधीनी काय केले? : संग्राम जगताप यांचा सवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2018 11:41 IST

देशात, राज्यात भाजपची सत्ता आहे. नगरचा खासदारही भाजपचा आहे. तरीही शहराच्या विकासासाठी तुम्ही काय केले? असा खडा सवाल आ. संग्राम जगताप यांनी ‘लोकमत’च्या व्यासपीठावरून थेट खा. दिलीप गांधी यांना केला.

अहमदनगर : देशात, राज्यात भाजपची सत्ता आहे. नगरचा खासदारही भाजपचा आहे. तरीही शहराच्या विकासासाठी तुम्ही काय केले? असा खडा सवाल आ. संग्राम जगताप यांनी ‘लोकमत’च्या व्यासपीठावरून थेट खा. दिलीप गांधी यांना केला. ‘लोकमत’च्या फेसबुक पेजवर आ. जगताप यांची मंगळवारी लाईव्ह मुलाखत झाली. त्यावेळी त्यांनी विविध प्रश्नांना सडेतोड उत्तरे दिली.महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ सर्वच राजकीय पक्षांच्या प्रमुखांची भूमिका जाणून घेत आहे. मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाची भूमिका आ. जगताप यांनी ‘लोकमत’च्या फेसबुक पेजवर थेटपणे मांडली.महापालिकेत काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता असूनही शहराचा विकास झाला नाही, असा आरोप राष्ट्रवादीवर होत आहे, याकडे लक्ष वेधले असता, आ. जगताप म्हणाले, निवडणूक म्हटले की आरोप होतात. मात्र ते काय करतात आणि आम्ही काय केले, याला जाहीर सभांमधून उत्तर देणार आहे. गल्लीपासून दिल्लीपर्यंत देशात भाजपची सत्ता आहे. त्यांचाच शहरात खासदार आहे. शहराच्या विकासासाठी काय केले, हे त्यांनी आधी सांगितले पाहिजे. त्यावर ते बोलत नाहीत. आम्ही मात्र आधी काय केले, ते सांगतो, नंतर दुसऱ्यांनी काय नाही केले, ते सांगतो. मूलभूत सोयी-सुविधा देण्यासाठी ४० कोटी रुपयांचा निधी आणला. मात्र त्यालाही स्थगिती मिळविण्यासाठी आटापिटा झाला. अन्यथा आजघडीला शहरात चांगले रस्ते दिसले असते.दानवे यांनी ३०० कोटी रुपये आणू, असे सांगितले, याबाबत आ. जगताप म्हणाले, निधी देण्यासाठी यांना यापूर्वी कोणी अडविले होते़ आताही महापौरपद आमच्याकडे द्या तरच निधी देऊ अशी भाषा हे करीत आहेत़ ही नगरकरांना सरळसरळ धमकी आहे, असे जगताप भाजपवर टीका करताना म्हणाले़केडगावचे भांडवल कुणी केले?

केडगाव प्रकरणाचे सेनेने भांडवल केले़ ते सर्वांना माहित आहे़ ते वेगळे सांगण्याची गरज नाही. घटना दुर्दैवी आहे. त्याचा आम्ही निषेध करतो. परंतु, या घटनेत निष्पाप लोकांना अडकविण्यात आले. ते नगरकरांना माहिती आहे. ज्यावेळी नगरकरांना संधी मिळेल, त्या-त्यावेळी नगरकर त्यांना त्यांची जागा दाखवून देतील. केडगावची घटना ही अत्यंत दुर्दैवी आहे. शहरासह जिल्ह्यात जवखेडा, कोपर्डी या दुर्दैवी घटनांमुळे नगरची राज्यभर बदनामी झाली.  त्यामुळे नगरबाबत इतर ठिकाणच्या लोकांचा गैरसमज झाला. वास्तविक पाहता नगरला सुशिक्षित लोक राहातात. केडगाव घटनेतील दु:ख बाजूला ठेवून राजकारण करण्याचा प्रयत्न केला गेला. एका घरात दु:खाचा प्रसंग घडला. त्याचे दु:ख झाले नाही. त्याचे भांडवल केले गेले.मुलाखत फेसबुकवर हिटआमदार संग्राम जगताप यांची मुलाखत लोकमत अहमदनगरच्या फेसबुक पेजवर लाईव्ह करण्यात आली. ही मुलाखत तब्बल २० हजार जणांपर्यंत पोहोचली, तर ६ हजार नगरकरांसह जिल्ह्यातील व राज्यातील नागरिकांनी ही मुलाखत पाहिली.मुलाखत अहमदनगर लोकमत फेसबुक पेजवर लाईव्ह असताना शेकडो नगरकरांनी त्यांना नगरच्या विकासावर प्रश्न विचारले, तर आ. जगताप यांच्या समर्थकांनी सडेतोड मुलाखत दिल्याबद्दल त्यांचे अभिनंदनही केले.प्रमुख राजकीय पक्षांच्या प्रमुखांना ‘लोकमत’ भवनमध्ये निमंत्रित करून त्यांचीही मुलाखत फेसबुक पेजवरून लाईव्ह केली जाणार आहे. यानिमित्ताने शहराच्या प्रश्नांचा उहापोह करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar municipal corporationअहमदनगर महापालिकाSangram Jagtapआ. संग्राम जगतापDilip Gandhiखा. दिलीप गांधी