शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
4
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
5
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
6
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
7
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
8
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
9
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
10
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
11
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
12
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
13
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
14
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
15
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
16
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
17
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
18
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
19
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...

मुळा धरणातील मृतदेह २५ तासानंतर बाहेर; चक्कर आल्याने मिळाली होती जलसमाधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2020 16:21 IST

मुळा धरणात मासे पकडण्यासाठी गेलेल्या युवकाचा मृतदेह तब्बल २५ तासांनी पाण्याबाहेर काढण्यात यश आले. पाण्यात बुडून मृत्यू झालेल्या युवकाचे नाव नानासाहेब रघुनाथ जाधव (वय-३५, रा. ठाकरवाडी) असे आहे.

राहुरी : मुळा धरणात मासे पकडण्यासाठी गेलेल्या युवकाचा मृतदेह तब्बल २५ तासांनी पाण्याबाहेर काढण्यात यश आले. पाण्यात बुडून मृत्यू झालेल्या युवकाचे नाव नानासाहेब रघुनाथ जाधव (वय-३५, रा. ठाकरवाडी) असे आहे.  चक्कर आल्याने पाण्यात पडून जाधव यांचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले. शनिवारी सकाळी अकरा वाजता मुळा धरणाच्या जलाशयात जाळे टाकण्यासाठी नानासाहेब जाधव हे गेले होते़. जाळे टाकत असतांना त्यांना चक्कर आली. त्यामध्ये त्यांना जलसमाधी मिळाली़ मदत कार्यासाठी अहमदनगर महानगरपालिकेचे अग्निशमक दलाला पाचारण करण्यात आले होते.  बारागाव नांदुर परिसरातील पोहणारे बाळासाहेब बर्डे, पोलीस पाटील शिवाजी केदारे, बाबासाहेब ढाकणे, बाबासाहेब वडीते, घमाजी जाधव, प्रभाकर गाडे यांनी मदत केली.राहुरीचे तहसीलदार एफ. आर. शेख, पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांनी घटनास्थळी जाऊन मदत केली़. मृतदेह दुपारी नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.  राहुरी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे़.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरRahuriराहुरीWaterपाणीDeathमृत्यू