शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
2
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
3
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
4
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
5
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
6
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
7
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
8
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
9
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
10
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
11
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
12
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
13
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
14
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
15
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
16
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
17
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
18
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
19
UP: बेकायदेशीर औषधाविरुद्ध योगी सरकारची कडक कारवाई; ४ दिवसांत १६ गुन्हे दाखल, २५ दुकानांवर बंदी!
20
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!

अहमदनगर जिल्ह्यातील ३७ हजार कृषिपंपांची वीज महावितरणने तोडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2017 19:30 IST

वीजबिलाची थकबाकी न भरल्याने महावितरणने शेतकºयांच्या कृषिपंपांवर कारवाईचा बडगा उगारला असून, गेल्या २६ दिवसांत जिल्ह्यातील ३७ हजार शेतक-यांची वीज खंडित करण्यात आली आहे.

ठळक मुद्देरब्बी पिकांवर परिणाम २ हजार २५० कोटींची थकबाकी

लोकमत न्यूज नेटवर्कअहमदनगर : वीजबिलाची थकबाकी न भरल्याने महावितरणने शेतकºयांच्या कृषिपंपांवर कारवाईचा बडगा उगारला असून, गेल्या २६ दिवसांत जिल्ह्यातील ३७ हजार शेतक-यांची वीज खंडित करण्यात आली आहे. त्यामुळे रब्बी हंगामातील पिकांवर परिणाम होणार आहे. चालू बील भरून शेतक-यांनी कारवाई टाळावी, असे आवाहन महावितरणने केले आहे.अहमदनगर जिल्ह्यातील एकूण ३ लाख ५७ हजार शेतकºयांकडे २ हजार २८५ कोटींची थकबाकी आहे. त्यात मूळ थकबाकी १ हजार ३३८ कोटींची असून उर्वरित दंड व व्याज आहे. थकबाकीदार कृषिपंप ग्राहकांना वीजबिल भरणे अधिक सुलभ व्हावे, यासाठी राज्य सरकारने नोव्हेंबरच्या सुरुवातीला मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजना आणली. या योजनेद्वारे शेतक-यांना त्यांच्या थकीत वीजबिलातील दंड व व्याज वगळून मूळ रकमेचे सुलभ हप्ते चालू बिलासह वर्षभरात भरण्याची सुविधा देण्यात आली. तसेच वीज बिलाबाबतच्या सर्वच शंकांचे निरसन करण्यासाठी डिसेंबर महिन्यात फिडरनिहाय कृषिपंप ग्राहकांच्या शिबिरांचेही नियोजन करण्यात आले होते.३१ नोव्हेंबरपर्यंत मुदत असलेल्या या योजनेत अहमदनगर जिल्ह्यातील ८८ हजार शेतक-यांनी सहभाग नोंदवला व चालू बिलाच्या रकमेपोटी ३५ कोटी १५ लाख रुपयांचा भरणा महावितरणकडे केला. परंतु अजूनही २ लाख ६९ हजार शेतक-यांकडे २ हजार २५० कोटींची थकबाकी आहे.या योजनेत अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने १ डिसेंबरपासून महावितरणने थकबाकी वसुलीची मोहीम तीव्र करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार तालुकानिहाय थकबाकी असलेल्या कृषिपंपाची वीज खंडित करण्यास प्रारंभ झाला असून २५ डिसेंबरपर्यंत जिल्ह्यातील ३७ हजार शेतक-यांवर कारवाई झाली आहे.चालू बील भरून कारवाई टाळाशेतक-यांंनी चालू बील किंवा ३ ते ५ हजार रूपये भरून कारवाई टाळावी. पैसेच भरले नाही तर वीज खंडित केल्याशिवाय पर्याय नाही. बिलाबाबत काही शंका, दुरूस्ती असेल तर स्थानिक उपकार्यालयात संपर्क करावा, तेथे कक्ष स्थापन केलेले आहेत. सर्व शंकांचे निरसन होईल. - अनिल बोरसे, अधीक्षक अभियंता, महावितरण 

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरmahavitaranमहावितरणFarmerशेतकरी