शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

मोदींनी लोकशाही धोक्यात आणली - अण्णा हजारे यांची टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2018 22:30 IST

पंतप्रधान झाल्यावर संसदेच्या पायरीवर डोके टेकवून लोकशाहीच्या पवित्र मंदिरात प्रवेश केल्यावर त्यांनी भ्रष्टाचार मुक्तीचा संकल्प केला होता. आता त्यांनीच आपल्या हुकूमशाहीतून देशाची पवित्र लोकशाही संकटात आणली आहे, अशी टीका अण्णा हजारे यांनी केली आहे.

विनोद गोळेपारनेर : लोकपाल व शेतकरी यांचे प्रश्न सोडविण्यासाठी साडेतीन वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ४३ पत्रे पाठवली. त्यातील एकाचेही उत्तर मिळाले नाही. पंतप्रधान झाल्यावर संसदेच्या पायरीवर डोके टेकवून लोकशाहीच्या पवित्र मंदिरात प्रवेश केल्यावर त्यांनी भ्रष्टाचार मुक्तीचा संकल्प केला होता. आता त्यांनीच आपल्या हुकूमशाहीतून देशाची पवित्र लोकशाही संकटात आणली आहे, अशी टीका अण्णा हजारे यांनी केली आहे. अण्णा हजारे २३ मार्च पासून दिल्लीत आंदोलन करणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर गुरुवारी ‘लोकमत’ने अण्णांशी संवाद साधला.दिल्लीत आंदोलनास चार महिन्यापासून जागा मागतोय, दिली नाही. सत्तेची मस्ती आल्याने हुकूमशाहीतून मला पंतप्रधाननरेंद्र मोदी यांच्याकडून ८० व्या वर्षीही त्रास दिला जातोय, पण जनसेवेसाठी त्रास सहन करून पंतप्रधान यांच्या घरासमोर आंदोलन सुरू करणार आहे. आपण नेहमी जनतेच्या प्रश्नांवर लढा देत आहोत. मी जनसेवक व पंतप्रधान मोदी सुध्दा जनसेवक आहेत. तरीपण त्यांनी पत्रांना उत्तरे का दिली नाही ते समजत नाही. बहुतेक सत्तेत आल्यावर काहींना सत्तेची मस्ती येते. तशी सत्तेची नशा येऊन त्यांना मस्ती आली असेल, असे अण्णा म्हणाले.

मुख्यमंत्री पंतप्रधानांचे ऐकत नाही का?

लोकपालसाठी विरोधी पक्षनेते नाही, असे सरकारचे म्हणणे आहे. त्यात वेळकाढूपणा सरकारने केला. पण किमान भाजपचे मुख्यमंत्री असणाऱ्या राज्यांमध्ये लोकायुक्त का नेमले गेले नाहीत. मग अनेक राज्यांमध्ये असणारे भाजपचे मुख्यमंत्री पंतप्रधानांचे ऐकत नाही का? असा प्रश्न अण्णांनी उपस्थित केला.

देशातील शेतकरी संघटनांनी एकत्र यावे

देशभरात शेतक-यांच्या मोठ्या समस्या आहेत. शेतक-यांना पेन्शन मिळावी, शेतमालाला हमीभाव मिळावा व स्वामिनाथन आयोग लागू करावा ह्या सुध्दा आपल्या आंदोलनात प्रमुख मागण्या आहेत. देशभरात केलेल्या दौ-यात मोठ्या प्रमाणात शेतकरी व संघटना सहभागी झाल्या होत्या. आता महाराष्ट्रासह देशातील सर्व शेतकरी संघटनांनी दिल्लीतील आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन अण्णांनी केले.

वृत्तपत्रांनी साथ दिली

देशभरात गेली दोन महिने जम्मू काश्मीरसह देशभरात प्रत्येक राज्यात सभा घेतल्या. त्यावेळी लोकांचा प्रतिसाद मोठा होता पण सभेस असणारे शेकडो वृत्तवाहिन्यांची गर्दी प्रत्यक्षात काहीच दाखवत नसल्याचे कार्यकर्ते म्हणत होते. मग ही मीडियाची गर्दी कुठे गेली. वर्तमानपत्र यांनी मोठी साथ सभांना दिल्याचेही अण्णांनी सांगितले.

कार्यकर्त्यांसह जेलभरो सत्याग्रह

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या घरासमोर व खासदारांच्या घरासमोर आम्ही व कार्यकर्ते भजन, कीर्तनासह आंदोलन करणार आहोत. सत्याग्रह सुरू केल्यावरच सरकार आम्हाला तुरुंगात टाकेल यातूनच आम्ही जेलभरो आंदोलन करणार आहोत असे अण्णांनी सांगितले.

टॅग्स :anna hazareअण्णा हजारेNarendra Modiनरेंद्र मोदीprime ministerपंतप्रधानBJPभाजपा