शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: रस्त्यावर उतरत सरकारची कोंडी; बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?
2
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!
3
मित्राने 'नाईस डीपी' म्हणून मेसेज पाठवला, संतप्त पतीने महिला डॉक्टरच्या डोक्यात खलबत्ता मारला, बलापूरमधील धक्कादायक घटना
4
जिल्हाधिकाऱ्यांना मुख्य सचिव बनून केला फोन, दिले असे आदेश, पिता-पुत्रासह तिघांना अटक, असं फुटलं बिंग
5
हॉटेलमध्ये आलेल्या 'त्या' डॉक्टर तरूणीची अवस्था काय होती?; मालकाने सांगितला घटनाक्रम
6
'ट्रम्पने 50 वेळा मोदींचा अपमान केला, तरीही मोदी गप्प; इंदिरा गांधींसारखे धाडस हवे'- राहुल गांधी
7
सलमान खान स्वत: 'बिग बॉस'चे सगळे एपिसोड्स बघतो का? अखेर निर्मात्यांनी केला खुलासा
8
बायकोचा खून करून घरात रचला चोरीचा बनाव, पण पतीच्या एका चुकीमुळे झाला 'भांडाफोड'...
9
IPO ची वाटही पाहिली नाही! देशातील सर्वात मोठ्या म्युच्युअल फंडने Lenskart ला दिला ₹100 कोटींचा चेक
10
13 दिवसांनंतर सोनं १३०९ नं महागलं, चांदीही ३८३२ नं वधारली, पुन्हा विक्रमी पातळीव पोहोचणार गोल्ड? काय म्हणतात एक्सपर्ट?
11
Jio चा धमाका! २०० रुपयांपेक्षा कमी दरात अनलिमिटेड 5G डेटा आणि कॉलिंग; 'हे' २ स्वस्त प्रीपेड प्लॅन्स लॉन्च
12
'तुम्ही सांगा फक्त, नरेंद्र मोदी मतांसाठी स्टेजवर नाचायलाही तयार होतील,' राहुल गांधींची टीका
13
IND vs AUA 1st T20I : सूर्यकुमार यादव अन् शुबमन गिल जोडी जमली; पण शेवटी पाऊस जिंकला!
14
रणबीर कपूरनंतर आता प्रभासही देणार न्यूड सीन? संदीप रेड्डी वांगा यांच्या 'स्पिरीट'ची चर्चा
15
वयाच्या ७० व्या वर्षी पिता बनला हा अभिनेता, पत्नीसह केलं आठव्या मुलाचं स्वागत
16
"महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणी SIT स्थापन करा, रणजितसिंह निंबाळकरांना तात्काळ अटक करा’’, कांग्रेसची मागणी 
17
‘केंद्रच्या कर्मचाऱ्यांचा डेटा गेला चीनकडे, देशातील गल्लीबोळाची त्यांना माहिती’, बड्या टेक तज्ज्ञाचा सनसनाटी दावा 
18
बाबोsss.... फुटबॉल विश्वचषकासाठी सौदी अरेबिया बांधणार जगातील पहिले 'स्काय स्टेडियम'
19
डॉक्टर तरुणी रात्री १.३० वाजता हॉटेलमध्ये आली होती; सीसीटीव्ही फुटेज पहिल्यांदाच समोर आले
20
रामकेशच्या हत्येचा फूलप्रूफ प्लॅन बनवला; मग खूनी गर्लफ्रेंडचं रहस्य कसं उघड झालं? पोलिसांनी सांगितली संपूर्ण कहाणी

मोदींनी लोकशाही धोक्यात आणली - अण्णा हजारे यांची टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2018 22:30 IST

पंतप्रधान झाल्यावर संसदेच्या पायरीवर डोके टेकवून लोकशाहीच्या पवित्र मंदिरात प्रवेश केल्यावर त्यांनी भ्रष्टाचार मुक्तीचा संकल्प केला होता. आता त्यांनीच आपल्या हुकूमशाहीतून देशाची पवित्र लोकशाही संकटात आणली आहे, अशी टीका अण्णा हजारे यांनी केली आहे.

विनोद गोळेपारनेर : लोकपाल व शेतकरी यांचे प्रश्न सोडविण्यासाठी साडेतीन वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ४३ पत्रे पाठवली. त्यातील एकाचेही उत्तर मिळाले नाही. पंतप्रधान झाल्यावर संसदेच्या पायरीवर डोके टेकवून लोकशाहीच्या पवित्र मंदिरात प्रवेश केल्यावर त्यांनी भ्रष्टाचार मुक्तीचा संकल्प केला होता. आता त्यांनीच आपल्या हुकूमशाहीतून देशाची पवित्र लोकशाही संकटात आणली आहे, अशी टीका अण्णा हजारे यांनी केली आहे. अण्णा हजारे २३ मार्च पासून दिल्लीत आंदोलन करणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर गुरुवारी ‘लोकमत’ने अण्णांशी संवाद साधला.दिल्लीत आंदोलनास चार महिन्यापासून जागा मागतोय, दिली नाही. सत्तेची मस्ती आल्याने हुकूमशाहीतून मला पंतप्रधाननरेंद्र मोदी यांच्याकडून ८० व्या वर्षीही त्रास दिला जातोय, पण जनसेवेसाठी त्रास सहन करून पंतप्रधान यांच्या घरासमोर आंदोलन सुरू करणार आहे. आपण नेहमी जनतेच्या प्रश्नांवर लढा देत आहोत. मी जनसेवक व पंतप्रधान मोदी सुध्दा जनसेवक आहेत. तरीपण त्यांनी पत्रांना उत्तरे का दिली नाही ते समजत नाही. बहुतेक सत्तेत आल्यावर काहींना सत्तेची मस्ती येते. तशी सत्तेची नशा येऊन त्यांना मस्ती आली असेल, असे अण्णा म्हणाले.

मुख्यमंत्री पंतप्रधानांचे ऐकत नाही का?

लोकपालसाठी विरोधी पक्षनेते नाही, असे सरकारचे म्हणणे आहे. त्यात वेळकाढूपणा सरकारने केला. पण किमान भाजपचे मुख्यमंत्री असणाऱ्या राज्यांमध्ये लोकायुक्त का नेमले गेले नाहीत. मग अनेक राज्यांमध्ये असणारे भाजपचे मुख्यमंत्री पंतप्रधानांचे ऐकत नाही का? असा प्रश्न अण्णांनी उपस्थित केला.

देशातील शेतकरी संघटनांनी एकत्र यावे

देशभरात शेतक-यांच्या मोठ्या समस्या आहेत. शेतक-यांना पेन्शन मिळावी, शेतमालाला हमीभाव मिळावा व स्वामिनाथन आयोग लागू करावा ह्या सुध्दा आपल्या आंदोलनात प्रमुख मागण्या आहेत. देशभरात केलेल्या दौ-यात मोठ्या प्रमाणात शेतकरी व संघटना सहभागी झाल्या होत्या. आता महाराष्ट्रासह देशातील सर्व शेतकरी संघटनांनी दिल्लीतील आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन अण्णांनी केले.

वृत्तपत्रांनी साथ दिली

देशभरात गेली दोन महिने जम्मू काश्मीरसह देशभरात प्रत्येक राज्यात सभा घेतल्या. त्यावेळी लोकांचा प्रतिसाद मोठा होता पण सभेस असणारे शेकडो वृत्तवाहिन्यांची गर्दी प्रत्यक्षात काहीच दाखवत नसल्याचे कार्यकर्ते म्हणत होते. मग ही मीडियाची गर्दी कुठे गेली. वर्तमानपत्र यांनी मोठी साथ सभांना दिल्याचेही अण्णांनी सांगितले.

कार्यकर्त्यांसह जेलभरो सत्याग्रह

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या घरासमोर व खासदारांच्या घरासमोर आम्ही व कार्यकर्ते भजन, कीर्तनासह आंदोलन करणार आहोत. सत्याग्रह सुरू केल्यावरच सरकार आम्हाला तुरुंगात टाकेल यातूनच आम्ही जेलभरो आंदोलन करणार आहोत असे अण्णांनी सांगितले.

टॅग्स :anna hazareअण्णा हजारेNarendra Modiनरेंद्र मोदीprime ministerपंतप्रधानBJPभाजपा