शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसने ज्या 'ट्विट'वरून निवडणूक आयोगाची गचांडी धरली, ती पोस्टच डिलीट; संजय कुमारांनी माफी का मागितली?
2
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
3
निळ्या ड्रमातील मर्डर मिस्ट्रीचा खुलासा; पहिल्यांदाच प्रियकरासोबत समोर आली आरोपी पत्नी लक्ष्मी
4
'त्या' ५०० जवानांसाठी सुप्रीम कोर्ट पुढे सरसावलं; केंद्र अन् तिन्ही सैन्य दलाकडे मागितले उत्तर
5
Mumbai Rain Updates Live: मुंबईला उद्याही अतिवृष्टीचा इशारा, सतर्क राहण्याचे आवाहन!
6
शेवटचा श्रावण बुधवार: प्रदोष व्रतासह बुध पूजन; ‘अशी’ करा महादेवांची सेवा, शुभ-मंगल होईल!
7
सलग दुसऱ्या दिवशी बाजारात तेजी! रिलायन्स-टाटासह 'या' शेअर्स ठरले हिरो; कुठे झाली घसरण?
8
"तेजस्विनीचा रात्री ११ वाजता फोन आला अन्...", सुचित्रा बांदेकरांनी सांगितलं नक्की काय घडलं?
9
Thane Rain: कार भुयारी मार्गात फसली अन् मरता मरता...; ठाण्यातील घटनेचा थरारक व्हिडीओ
10
व्लादिमीर पुतिन यांची ऑफर लीक झाली, डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाचा प्लान जगाला सांगितला
11
४४ रुपयांच्या स्मॉलकॅप स्टॉकमध्ये तेजी; ५ वर्षात दिला ४०,०००% रिटर्न, FII नं वाढवला हिस्सा
12
नाथपंथीय दीक्षा, माऊलींची परंपरा, स्वामीकृपा; ‘सोऽहम’मंत्र देणारे पावसचे स्वामी स्वरुपानंद
13
विधानसभा निवडणुकीत बंडखोरी करणाऱ्या नेत्याचे निलंबन भाजपकडून रद्द, राणेंची डोकेदुखी वाढणार?
14
गणेश चतुर्थी २०२५: बाप्पाच्या आगमनाला उरले ८ दिवस, घराबाहेर काढा 'या' वस्तू; ज्यामुळे राहू केतू करतात अमंगल!
15
मुंबईपासून हाकेच्या अंतरावर आहे महाराष्ट्राचं 'मिनी काश्मीर'! तुम्ही कधी फिरायला गेलात का?
16
नोकरी खाजगी, पैसा सरकारी! पंतप्रधान विकासित भारत रोजगार योजनेचं पोर्टल सुरू, किती मिळणार पैसे?
17
फक्त १० वर्षांत कोट्यधीश होण्याची संधी! पती-पत्नीसाठी आर्थिक तज्ज्ञांनी सांगितला ‘स्मार्ट’ गुंतवणूक प्लॅन
18
आईने दोन पेग घेतले, त्यानंतर..., निळ्या ड्रमातील मृतदेह प्रकरणात मुलाने दिली धक्कादायक माहिती  
19
Asia Cup 2025 : त्याची काही चूक नाही, पण... आशिया कपसाठी श्रेयस अय्यर संघात का नाही? पुन्हा तोच रिप्लाय
20
Mumbai Local Train Update: मध्य, हार्बर मार्गावरील लोकल रेल्वे सेवा रद्द; कुठून कुठपर्यंत सुरू?

मोदी म्हणजे न ऐकणारे हेडमास्तर, शरद पवारांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2019 01:13 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी संसदेत आल्यानंतर सर्व सहकारी मित्र चिडीचूप बसतात़ मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांनाही त्यांची चिंता असते़ ते कुणाचेच ऐकत नाहीत.

अहमदनगर : पंतप्रधान नरेंद्र मोदी संसदेत आल्यानंतर सर्व सहकारी मित्र चिडीचूप बसतात़ मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांनाही त्यांची चिंता असते़ ते कुणाचेच ऐकत नाहीत़ मोदी म्हणजे कडक हेडमास्तर आहेत, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नगर येथे केली़लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येथे व्यापाऱ्यांच्या मेळावा झाला. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजीमंत्री मधुकरराव पिचड, पक्ष निरीक्षक अंकुश काकडे, आमदार जितेंद्र आव्हाड, अरुण जगताप, संग्राम जगताप, माजी आमदार दादा कळमकर यांच्यासह व्यापारी उपस्थित होते़ सरकारच्या चुकीच्या निर्णयांमुळे देशाची अर्थव्यवस्था ढासळल्याची टीका पवार यांनी केली़ ते म्हणाले, जीएसटी लागू करण्याचा निर्णय आघाडी सरकारने घेतला होता़ पण, त्यावर देशातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची मते जाणून घेण्यासाठी एक बैठक बोलविण्यात आली़ या बैठकीत गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री आणि सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कडाडून विरोध केला़ मात्र मोदींनी सत्तेवर येताच जीएसटी लागू केला़ कुठलाही निर्णय घेताना संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांची मते जाणून घ्यावी लागतात़ तेव्हा तो कायदा पूर्णपणे होतो़ परंतु, पंतप्रधान मोदी यांनी कुणाचेच काहीही ऐकून न घेता नोटबंदी आणि जीएसटीचा निर्णय घेतला़ सरकार निर्णय घेताना संवाद साधत नाही, हेच मोठे दुर्दैव आहे़ जनतेशी संवाद ठेवून जो कोणी कारभार करील, त्यांच्याकडे देशाचा कारभार सोपवा, असे आवाहन पवार यांनी केले़सैनिकांच्या ७२ बस जम्मूमधून काश्मीरकडे निघाल्या़ एक जीप येते आणि एका बसला धडक देते़ त्यावेळी स्फोट होऊन ४० जवान शहीद होतात, हे दुर्दैवीच आहे़ देशाचे पंतप्रधान मोदी नेहमी ५६ इंचाची छाती लागते, असे सांगत असतात़ या हल्ल्याच्यावेळी तुमची ५६ इंचाची छाती कुठे गेली होती, असा प्रश्न पवार यांनी केला़राष्ट्रवादी काँग्रेसच्या १८ नगरसेवकांचे निलंबन मागे - जयंत पाटील यांची घोषणाअहमदनगर येथील महापालिकेत महापौर निवडणुकीत भाजपाला उघडपणे पाठिंबा दिल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे १८ नगरसेवक निलंबित करण्यात आले होते. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच्या सर्व १८ नगरसेवकांचे निलंबन मागे घेण्यात आल्याची घोषणा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी नगर येथे सायंकाळी केली.डिसेंबर २०१८ मध्ये झालेल्या निवडणुकीत शिवसेनेचे २४, भाजपाचे १४, राष्ट्रवादीचे १८ , काँग्रेसचे ५, बसपाचे ४, अपक्ष २, समाजवादी पक्ष १ असे नगरसेवक निवडून आले होते. भाजपाने शिवसेनेला बाजूला ठेवत सत्ता स्थापन करताना काँग्रेस, बसपा, अपक्षांसह राष्ट्रवादी काँग्रेसच्या १८ नगरसेवकांचा पाठिंबा घेतला होता. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांचा आदेश डावलून नगरसेवकांनी भाजपाचे बाबासाहेब वाकळे यांना महापौर निवडणुकीत मतदान केले होते. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसवर राज्यभरातून टीकेची झोड उठली. राष्ट्रवादीच्या १८ नगरसेवकांना प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी पक्षातून निलंबित केले होते. मात्र आमदार अरुण जगताप व आमदार संग्राम जगताप हाच आमचा पक्ष असल्याचे नगरसेवक वारंवार सांगत होते.लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या पदाधिकाºयांशी चर्चा करण्यासाठी सोमवारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, जयंत पाटील नगरमध्ये होते. पाटील यांनी नगरसेवकांचे निलंबन मागे घेण्यात आल्याची घोषणा मेळाव्यात केली. पाटील म्हणाले, निलंबित केलेल्या नगरसेवकांनी भाजपाला दिलेली साथ तात्पुरती होती. आम्ही राष्ट्रवादी सोडून कुठेही जाणार नाही, असे त्यांनी वारंवार संपर्क करून मला सांगितले. बेरजेचे राजकारण करताना काही गोष्टींमध्ये सुधारणा करावी लागते, अशीही पुष्टी जयंत पाटील यांनी जोडली.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९