शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
5
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
6
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
7
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
8
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
9
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
10
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
11
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
12
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
13
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
14
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
15
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
16
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
17
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
18
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
19
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
20
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले

जिल्ह्यातील ‘जलजीवन’च्या कामांची अधिवेशनात लक्तरे- आमदार लहू कानडे

By शिवाजी पवार | Updated: December 13, 2023 15:27 IST

अधिकारी आणि ठेकेदारांनी योजनांची वाट लावली

श्रीरामपूर (अहमदनगर) : नगर जिल्ह्यात पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी आणि ठेकेदारांनी एकत्रित जलजीवन मिशनच्या योजनांची पुरती वाट लावली. सरपंचांच्या खोट्या सह्या घेऊन थातूरमातूर चाचण्या उरकून योजना गावांच्या माथी मारल्या. त्यामुळे कोट्यवधी रुपये खर्चूनही गावे तहानलेली राहिली, अशी टीका काँग्रेस पक्षाचे आमदार लहू कानडे यांनी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात केली.   

संपूर्ण जिल्ह्यात जलजीवन मिशनच्या योजनांवरून मोठ्या प्रमाणावर तक्रारी झाल्या होत्या. एक हजार कोटी रुपयांहून अधिक खर्च होऊनही गावांची तहान भागेल अशी स्थिती नाही. श्रीरामपूर व राहुरी तालुक्यातील टाकळीमिया, कारेगाव व इतर अनेक योजनांवरून आंदोलने, उपोषणे झाली. त्याची दखल घेत आमदार कानडे यांनी पाणीपुरवठा विभागाच्या कामांचे अधिवेशनात वाभाडे काढले.

कानडे म्हणाले, पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी व ठेकेदारांनी एकत्रित येत एकाच ठेकेदाराला आठ-दहा गावांतील योजनांची कामे दिली. गरीब सरपंचांच्या खोट्या सह्या घेऊन योजना ग्रामपंचायतींच्या माथी मारण्यात आल्या. पाण्याचा उद्भव, साठवणूक व वितरण या कामांच्या सर्व टप्प्यांवर गावातील लोकांचा कोणताही सहभाग घेतला गेला नाही. अंदाजपत्रकांप्रमाणे कामे करण्यात आली नाहीत. स्वतंत्र एजन्सी नियुक्त करून अंदाजपत्रके बनविण्यात आली. त्याचा परिणाम असा झाला की अनेक योजना अपूर्ण राहून गावांना पाणी मिळाले नाही. राहुरी तालुक्यातील टाकळीमिया या १५ हजार लोकवस्तीच्या गावात ११ कोटी रुपये खर्चाचे पाणी योजनेचे काम झाले. अत्यंत खोट्या पद्धतीने चाचणी घेऊन योजना ताब्यात देण्यात आली. सरकारने आताच तातडीने हस्तक्षेपाद्वारे अंदाजपत्रकांप्रमाणे योजना पूर्ण करून घ्याव्यात. स्वतंत्र शासन निर्णय घेऊन प्रभावी अंमलबजावणी करावी, असे कानडे म्हणाले.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरWaterपाणी