शहरं
Join us  
Trending Stories
1
PHOTO: संपूर्ण ठाकरे कुटुंब एकाच व्यासपीठावर एकत्र... खास पोज देत काढला 'फॅमिली फोटो'
2
"हिंदुत्व ही कोणत्याही भाषेची मक्तेदारी नाही, आम्ही मराठी बोलणारे तुमच्यापेक्षा…’’, उद्धव ठाकरेंनी भाजपाला सुनावले
3
भारताच्या शत्रूसोबत अजरबैजानची १७ हजार कोटींची डील, काय आहे त्यांचा प्लान?
4
राज ठाकरेंजवळ आदित्य, उद्धव ठाकरेंजवळ अमित, सुप्रिया सुळेंनी एकत्र आणलं; पाहा Video
5
Uddhav Thackeray pats Raj Thackeray Video : कौतुकाची थाप..!! राज ठाकरे यांच्या भाषणानंतर उद्धव ठाकरे यांच्या कृतीने मराठी माणूस सुखावला...
6
"निवडणुकीत हरणार म्हणून कुटुंब "तहात" जिंकण्याचा प्रयत्न"; भाजपाचा पलटवार
7
"३० वर्ष झाली तरी मराठी माणसासारखी..."; सुशील केडियांनी राज ठाकरेंची जाहीर माफी मागितली
8
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
9
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: ...तर आहोत आम्ही गुंड; उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना आव्हान
10
Raj Thackeray : "तुमच्याकडे सत्ता विधान भवनात असेल, आमच्याकडे रस्त्यावर...",हिंदी सक्तीवरुन राज ठाकरेंचा राज्य सरकारला इशारा
11
Uddhav Thackeray : "आमच्या दोघांमधला अंतरपाट अनाजी पंतांनी दूर केला"; उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला
12
Raj Thackeray : ठाकरेंची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकली, या आरोपावर राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
13
मराठी कलाकारांसमोर राज ठाकरेंकडून बॉलिवूडच्या ए.आर.रहमानचं कौतुक, सांगितला 'तो' प्रसंग
14
"जे बाळासाहेबांना आणि इतरांना जमलं नाही ते फडणवीसांना जमलं’’, राज ठाकरे यांचं मोठं विधान
15
"एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी, आमचं एकत्र दिसणं महत्त्वाचं," उद्धव ठाकरेंचं सूचक विधान
16
Raj Thackeray : जास्त नाटकं केली, तर कानाखाली आवाज काढलाच पाहिजे; पण...; राज ठाकरेंचा 'सैनिकां'ना आदेश
17
सुरतेची "स्वारी" आता हुजरेगिरीसाठी उरली...; अमोल कोल्हेंचा एकनाथ शिंदेवर कवितेतून निशाणा
18
'मुंबई आकर सारी हेकडी निकाल दूंगा', पप्पू यादव यांचे राज ठाकरेंना चॅलेंज!
19
खळखट्याक सुरू; मराठीत बोलणार नाही म्हणणाऱ्या सुशील केडिया यांचं कार्यालय फोडलं
20
त्रिनिदाद आणि टोबॅगोच नव्हे, 'या' २५ देशांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलाय सर्वोच्च सन्मान!

कोरोनामुळे दूध उत्पादक अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:19 IST

कोरोना संकटामुळे दूध उत्पादक शेतकरी अडचणीत आहेत. गेल्या वर्षभरापासून कोरोना महामारी थैमान घातल असल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला ...

कोरोना संकटामुळे दूध उत्पादक शेतकरी अडचणीत आहेत.

गेल्या वर्षभरापासून कोरोना महामारी थैमान घातल असल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. वर्षभरापासून शेतमालाला पाहिजे तितका दर मिळत नाही. त्यात दिवसेंदिवस महागाई वाढतच चालली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची 'दुष्काळात तेरावा महिना' म्हणावे अशी परिस्थिती झाली आहे.

गतवर्षी कोरोना टाळेबंदीच्या काळात घसरलेल्या दुधाच्या दरात मध्यंतरी वाढ झाली होती; परंतु सध्या कोरोनाच्या निर्बंधामुळे प्रतिलिटर ५ ते१० रुपयांनी दर घसरले आहेत. दूध दरात झालेल्या घसरणीमुळे पशुपालकांना आर्थिक झळ सोसावी लागत आहे.

ग्रामीण भागात शेतीसाठी जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जातो. त्यासाठी जनावरांना हिरवा चारा, वैरण व खुराकाची आवश्यकता असते. भुसा व पेंडीचे दर गगनाला भिडले आहेत व दुधाचे दर मात्र कमी झाले आहेत. त्यामुळे दुग्ध व्यवसाय अडचणीत आला आहे. दोन महिन्यांपूर्वी गाईच्या दुधाला ३० ते ३३ रुपये दर दिला जात होता. कोरोना संसर्गाची दुसरी लाट आली अन् शासनाने कडक निर्बंध लागू केले. त्यामुळे मुंबई, नाशिक पुणेसारख्या महानगरातील दुधाची मागणी घटली. तसेच ग्रामीण भागात असलेल्या लहान-मोठे हॉटेल व्यवसाय बंद असल्याने, याचा परिणाम म्हणून आज रोजी गाईचे दूध २० ते २५ रुपये, तर म्हशीचे दूध ३० ते ३५ रुपये लिटरने खरेदी केले जात आहे.

सध्या राज्यात केलेल्या संचारबंदीमुळे पशुखाद्याच्या दरात कमालीची वाढ झाली आहे. तर दूध दरात मात्र मोठी उतराई झाली आहे. गाईच्या दुधास प्रतिलिटर ३० ते३५ रुपये असलेला भाव संचारबंदीमुळे २० ते २५ रुपये इतका झाला आहे. नाइलाजास्तव शेतकऱ्यांना दुधाची विक्री प्रतिलिटर पाण्याच्या बाटलीच्या किमतीत करावी लागत आहे.

...............

खुराकाच्या किमती वाढल्या

जनावरांना लागणाऱ्या खुराकाच्या (खाद्य) वाढलेल्या किमती व चाऱ्याचा विचार केला तर शेतकऱ्यांना एक लिटर दूध उत्पादनासाठी तब्बल २५ रुपयांपर्यंत खर्च येतो. मात्र हेच दूध सध्या २० ते २५ रुपये लिटरने विकले जात असल्याने, शेतकऱ्यांना तोटा सहन करावा लागत आहे.

.............

उन्हाची तीव्रता मोठ्या प्रमाणात वाढली असून, जनावरांच्या हिरव्या चाऱ्याचा दूध उत्पादक शेतकऱ्यांपुढे मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. मागील पाच-सहा महिन्यांपासून ऊसतोडणी सुरू होती. मात्र साखर कारखाने बंद झाल्याने जनावरांना हिरवा चारा म्हणून उपलब्ध होत असलेले उसाचे वाढे मिळत नाही. त्यामुळे दूध उत्पादक शेतकरी वर्गापुढे हिरव्या चाऱ्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे.