शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

कर्जत येथे दूध उत्पादकांचा मेळावा : शेतक-यांनी दूध धंद्यात बदल करावा- राम शिंदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2018 18:40 IST

दूध व्यवसाय सर्वात जास्त जोखमीचा असून दूध धंदा आता बदलत आहे, तसा बदल शेतकºयांनी करावा, असे आवाहन पालकमंत्री राम शिंदे यांनी शनिवारी कर्जत येथे बोलताना केले.

कर्जत : दूध व्यवसाय सर्वात जास्त जोखमीचा असून दूध धंदा आता बदलत आहे, तसा बदल शेतक-यांनी करावा, असे आवाहन पालकमंत्री राम शिंदे यांनी शनिवारी कर्जत येथे बोलताना केले.गजानन महाराज प्रकट दिनानिमित्ताने दूध उत्पादकांचा मेळावा कर्जत येथील सदगुरू मिल्क अ‍ॅन्ड मिल्क या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता. यावेळी पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी दूध उत्पादक शेतकºयांना मार्गदर्शन केले. अध्यक्षस्थानी कर्जत नगरपंचायतीचे नगराध्यक्ष नामदेव राऊत हे होते. यावेळी संयोजक शंकरराव नेवसे, उध्दवराव नेवसे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा मंजुषा गुंड, कल्याणी नेवसे, अशोक खेडकर, काका धांडे, सचिन कातोरे, डॉ.कांचन खेत्रे, बी. बी. बो-हाडे, बापूसाहेब नेटके, अमृत लिंगडे, लहु शिंदे, प्रशांत बुध्दिवंत, रामदास हजारे, राम ढेरे, रवींद्र थोरात, राहुल सोनमाळी यांच्यासह दूध उत्पादक शेतकरी उपस्थित होते.प्रा. राम शिंदे म्हणाले, कर्जत तालुका हा दुष्काळी तालुका होता. येथे शेतीला पूरक म्हणून दूध धंद्याची गरज होती हे ओळखून शंकर नेवसे व त्यांचे बंधू उध्दव नेवसे यांनी दुग्ध व्यवसाय सुरू केला. ४०० लीटरवरील व्यवसाय आज ७० हजार लिटर केला आहे. ही एक क्रांती आहे, असे ते म्हणाले.यावेळी कर्जतचे नगराध्यक्ष नामदेव राऊत, अशोक खेडकर उध्दवराव नेवसे, शंकरराव नेवसे यांची भाषणे झाली. दूध उत्पादकांच्या वतीने पालकमंत्री राम शिंदे यांचा सत्कार करण्यात आला.

पालकमंत्री आणि अ‍ॅडव्हान्स

पालकमंत्री प्रा राम शिंदे म्हणाले, राजकारणामध्ये येण्याअगोदर मी दुधाची डेअरी पण टाकली होती. दूध डेअरी सुरू करताना शेतक-यांनी दूध घालावे यासाठी त्यांना अ‍ॅडव्हान्स द्यावा लागतो. त्याप्रमाणे मी अ‍ॅडव्हान्स दिला होता. मात्र कालांतराने राम शिंदे यांची दूध डेअरी बंद पडली आणि शेतक-यांना दिलेला अ‍ॅडव्हान्स आजतागायत अनेक वेळा मागणी करूनही परत मिळाला नाही, हे सांगताच जोरदार हशा झाला.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरRam Shindeराम शिंदेKarjatकर्जत