शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

स्थलांतरित विद्यार्थ्यांची जिल्हाभरातील माहिती चुकीची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:38 IST

अहमदनगर : जून २०२० नंतर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून सर्व्हे करण्यात आलेल्या स्थलांतरित विद्यार्थ्यांची चुकीची माहिती सादर झाल्याचा संशय ...

अहमदनगर : जून २०२० नंतर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून सर्व्हे करण्यात आलेल्या स्थलांतरित विद्यार्थ्यांची चुकीची माहिती सादर झाल्याचा संशय असून त्यामुळे अनेक विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. कामचलावू प्रवृत्तीमुळे शिक्षण हक्क कायदा केवळ कागदावर असल्याचा आरोप जि. प. सदस्य तथा भाजपाचे गटनेते जालिंदर वाकचौरे यांनी केला आहे. ऊसतोडणी मजूर, खाणकामगार, वीटभट्टी कामगार आणि इतरही स्थलांतरित मजुरांच्या विद्यार्थ्यांचे दरवर्षी शिक्षण विभाग सर्वेक्षण करुन वंचित विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध करुन देतो. चालू वर्षीच्या सर्वेक्षणात जिल्हाभरात तालुकानिहाय एकत्रित मिळून ९०० विद्यार्थी स्थलांतरित होऊन आले आणि १३५ विद्यार्थी स्थलांतरित होऊन गेले, अशी माहिती मिळाली. ही माहिती कामचलावू आणि घाईघाईने केली असल्याचा संशय असून विद्यार्थी आणि कष्टकरी पालकांवर अन्याय करणारी आहे.

वास्तविक जिल्ह्यातील साखर कारखाने, वीटभट्टी, खाणी आणि इतरही ठिकाणी काम करणाऱ्या मजुरांची संख्या मोठी असून ती हजारोंच्या संख्येत असेल. मग या मजुरांचे स्थलांतरित विद्यार्थी इतके कमी कसे, हा प्रश्न आहे. याचाच अर्थ शिक्षण विभागाने केलेली पाहणी बोगस असून अनेक विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहण्याचा धोका आहे. याबाबत आपण बारकाईने चौकशी करुन वंचित विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्याचे काम करणार असल्याचेही वाकचौरे यांनी म्हटले आहे.

----------------------------------------