शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

दोनशे गावांना मीटरने पाणी

By admin | Updated: July 25, 2014 00:26 IST

अहमदनगर पाणी पुरवठा योजनेमार्फत चालविण्यात येणाऱ्या ३६ नळ पाणी पुरवठा योजनेतील २०६ गावांना मीटरने पाणी पुरवठा करण्याचा निर्णय जिल्हा परिषदेच्या जलव्यस्थापन समितीच्या बैठकीत झाला

अहमदनगर : जिल्हा परिषद संयुक्त पाणी पुरवठा योजनेमार्फत चालविण्यात येणाऱ्या ३६ नळ पाणी पुरवठा योजनेतील २०६ गावांना मीटरने पाणी पुरवठा करण्याचा निर्णय जिल्हा परिषदेच्या जलव्यस्थापन समितीच्या बैठकीत झाला. जिल्हा नियोजन विकास निधीतून वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून यासाठी १ कोटी ६ लाख रुपयांचा निधीची मागणी नोंदविण्यात आली आहे. शंभर टक्के नळ जोडणी यंत्र बसविणाऱ्या ग्रामपंचायतींना सौर ऊर्जेची जोड मिळणार असल्याचे बैठकीत सांगण्यात आले.अध्यक्ष विठ्ठलराव लंघे यांच्या अध्यक्षेतखाली गुरूवारी जिल्हा परिषदेच्या जल व्यवस्थापन समितीची बैठक झाली. यात भविष्यात प्रादेशिक पाणी योजना, नळ पाणी योजना आणि स्वतंत्र पाणी योजनांचे पाणी मीटरव्दारे मोजून देण्याबाबत चर्चा झाली. जिल्हा परिषदेच्या संयुक्त पाणी पुरवठा योजनेमार्फत ३६ नळ पाणी पुरवठा योजना चालविण्यात येत आहेत. पहिल्या टप्प्यात या योजनेत समाविष्ट असणाऱ्या गावांना मीटरव्दारे पाणी पुरवठा करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.यासाठी जिल्हा नियोजनमधून वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून १ कोटी ६ लाख रुपयांची मागणी पालकमंत्री मधुकरराव पिचड यांच्याकडे करण्यात आलेली आहे. शंभर टक्के नळ जोडणी करणाऱ्या ग्रामपंचायतींना पाण्याचा पंप चालविण्यासाठी सौर ऊर्जेचा जोड देण्यात येणार आहे. यासाठी प्रत्येक तालुक्यातून एका गावाची निवड करण्यात येणार आहे. या योजनेसाठी १ कोटी ६८ लाख रुपयांची मागणी करण्यात येणार आहे. शेवगाव-पाथर्डी या तालुक्यातील ५८ गावाचा तालुका घटक धरून व पाथर्डी शहर आणि शेवगाव शहर वगळून अन्य गावांसाठी स्वतंत्र पाणी योजना मंजूर करण्यासाठी सर्वेक्षण आणि अंदाजपत्रक तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या. पाथर्डी शहरात नगरपालिका असून शेवगावमध्ये प्रस्तावित असल्याने या दोघांना यातून वगळण्यात आलेले आहे.बैठकीला उपाध्यक्ष मोनिका राजळे, सभापती बाबासाहेब तांबे, शाहुराव घुटे, हर्षदा काकडे, सदस्य अ‍ॅड. सुभाष पाटील, सुनील गडाख, निमंत्रित सदस्य केशव भवर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद जगताप, कार्यकारी अभियंता कदम उपस्थित होते. (प्रतिनिधी)खोले यांचा पदभार काढला१पावसाळ्यात ३६१ टँकरव्दारे दररोज ९५६ खेपाव्दारे २७९ वाड्या आणि १ हजार ३३२ गावातील जनतेची तहान भागविण्यात येत आहे. भर पावसाळ्यात सहा लाख आठ हजार जनतेला सरकारी पाण्यावर अवलंबून राहवे लागत आहे. ग्रामीण पाणी पुरवठा विभागाला संभाव्य पाणी टंचाईला तोंड देण्यासाठी सज्ज राहण्यास सांगण्यात आले आहे. २शेवगाव-पाथर्डी पाणी योजनेचे वादग्रस्त शाखा अभियंता बबन खोले यांची चौकशी करून त्यांच्याकडून पाणी योजनेचे कामकाज काढून घेण्याचा निर्णय सुमारे महिनाभरापूर्वी झालेल्या बैठकीत घेण्यात आला होता. मात्र, त्यावर कार्यवाही झालेली नव्हती. गुरूवारच्या बैठकीत सभापती काकडे यांनी याप्रकरणी नाराजी व्यक्त करत, प्रशासनावर टीका केली. त्यामुळे तातडीने खोले यांचा कार्यभार काढण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.३राज्य शासनाने पाणी पुरवठा योजनांसाठी असणारी दहा टक्के लोकवर्गणीची अट शासनाने रद्द केली आहे. याच निर्णयाप्रमाणे जिल्हा परिषदेच्या देखभाल दुरूस्तीच्या योजनांना दहा टक्के वर्गणीची अट देखील लागू राहणार नसल्याचे अध्यक्ष लंघे यांनी सांगितले.