शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
2
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
3
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
4
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
5
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
6
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
7
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
8
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
9
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
10
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
11
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
12
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
13
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
14
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
15
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
16
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
17
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
18
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
19
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
20
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?

महापौरांनी दुस-याच्या जमिनी लाटल्या : बाळासाहेब बोराटे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2019 15:59 IST

महापौर बाबासाहेब वाकळे यांनी अनेकांच्या जमिनी लाटल्या आहेत.

अहमदनगर : महापौर बाबासाहेब वाकळे यांनी अनेकांच्या जमिनी लाटल्या आहेत. म्हणून त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणावर संपत्ती जमा झाली. स्वत:च्या नातेवाइकांच्याही जमिनी त्यांनी लाटल्या. ज्यांनी त्यांना महापौर होण्यासाठी पैसे दिले तेच त्यांचे खरे बोल बोलवते धनी आहेत, असा आरोप शिवसेनेचे नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत केला.पत्रकार परिषदेत बाळासाहेब बोराटे यांनी महापौर वाकळे यांनीच नगररचना विभागातील कल्याण बल्लाळ यांची पैसे घेऊन बदली केल्याचा आरोप केला होता. त्याला उत्तर देताना वाकळे यांनी बोराटे यांची लायकी काय आहे? हे सर्व नगरला माहित आहे, असे प्रत्युत्तर दिले होते. त्याला उत्तर देण्यासाठी शुक्रवारी बोराटे यांनी पुन्हा पत्रकार परिषदेच्या माध्यमातून महापौरांवर अत्यंत वैयक्तिक पातळीवर टीका केली. ते म्हणाले, शंभर कर्मचा-यांचे बदलीचे अर्ज प्रलंबित असताना बल्लाळ यांची बदलीचा अर्ज मात्र तातडीने मंजूर कसा होतो. माझी लायकी काढणारे वाकळे यांची प्रत्यक्षात काय लायकी आहे? हे याचे त्यांनी आत्मपरीक्षण करावे. लोढा थमार्कोलमध्ये हेल्पर म्हणून काम करण-या वाकळे यांच्याकडे एवढी संपत्ती आली कोठून ?बदली करणे हा विषय महापौरांचा नव्हे तर आयुक्तांचा आहे. स्वत:च्या अपत्याच्या तारखा लपवणारे महापौर यांनी आधी स्वत:ची लायकी तपासावी. महापौरांनी नातेवाईकांचे प्लॉटही हडप करण्याचे सोडले नाहीत.आपण वैफल्यग्रस्त असल्याचाही वाकळे यांचा आरोप आहे. मात्र आपण कुठे वैफल्यग्रस्त दिसतो का ? असा सवाल त्यांनी पत्रकारांना केला. शिवसेनेच्या काळात पथदिवे घोटाळा काढला. एका अभियंत्याला सोडवण्यासाठी ठेकेदारांनी कशी मदत केली, त्याचे पुरावे आमच्याकडे आहेत. कल्याण रोडवरील झालेल्या कार्यक्रमात शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड यांनी वाकळे यांचे नव्हे तर माजी महापौर सुरेखा कदम यांच्या कामाचे कौतुक केले, असेही बोराटे यांनी स्पष्टीकरण दिले.महापौर पदासाठी 14 कोटीमहापौर पदासाठी 13 ते 14 कोटी रुपये त्यांनी खर्च केले. ही वसुली करण्यासाठी महापौर वाकळे यांनी बल्लाळ यांची बदली करून बेयादेशीर जमिनी नियमात बसलून वसुली सुरू केलेली आहे. त्यांनी महापौर झाल्यापासून शहरासाठी कोणते ठोस काम केले. बल्लाळ यांनी स्वेच्छानिवृत्तीसाठी अर्ज दिला होता. मात्र तो प्रशासनाने स्वीकारला नाही. बल्लाळ यांची नगररचना विभागात महापौरांनी बेकायदेशीर पद्धतीने बदली केली. कुष्ठधाम परिसरातील तीन ते चार एकर जागा कोणी कोणी घेतली व कोण कोण त्या व्यवहारात आहेत, याची जनतेस माहिती मिळाली पाहिजे.स्वत:च्याच वार्डाचा विकासमुख्यमंत्र्यांकडून दहा कोटीचा विशेष निधी महापौरांनी मंजूर केला. मात्र त्यांनी तो स्वत:च्याच प्रभागासाठी वापरला. शहराचे महापौर आहेत याचा विसर हे वाकळे यांना पडला आहे. दहा कोटीचा निधी तुम्ही आणला की कोणी आणला? याचाही त्यांनी खुलासा केला पाहिजे, असे बोराटे म्हणाले. या पत्रकार परिषदेला शहर शिवसेना प्रमुख दिलीप सातपुते, नगरसेवक अनिल शिंदे, संभाजी कदम,गटनेते संजय शेंडगे, अनिल बोरूडे, दत्ता सप्रे, अर्जुन बोरूडे आदी उपस्थित होते.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar municipal corporationअहमदनगर महापालिका