शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
3
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
4
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
5
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
6
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
7
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
8
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
9
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
10
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
11
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
12
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
13
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
14
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
15
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
16
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
17
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
18
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
19
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
20
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!

वेतन थकले: बायका, पोरांसह रस्त्यावर उतरून माथाडी कामगारांचा आक्रोश माेर्चा

By अरुण वाघमोडे | Updated: December 15, 2023 14:56 IST

अहमदनगर : दोन वर्षांपासून रखडलेल्या थकीत वेतनासाठी शुकवारी रेल्वे मालधक्क्यावरील माथाडी कामगारांनी बायका, पोरासं रस्त्यावर उतरून शहरातून आक्रोश मोर्चा ...

अहमदनगर: दोन वर्षांपासून रखडलेल्या थकीत वेतनासाठी शुकवारी रेल्वे मालधक्क्यावरील माथाडी कामगारांनी बायका, पोरासं रस्त्यावर उतरून शहरातून आक्रोश मोर्चा काढत महसूल प्रशासनाचा निषेध केला. काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी या मोर्चाचे नेतृत्व केले.

माथाडी मंडळ २०२१ च्या आदेशाची अंमलबजावणी करून जानेवारी पासून सुधारित दराने वेतन अदा करा, पहिल्या टप्प्यातील थकीत वेतन तत्काळ कामगारांच्या खात्यात जमा करा, दुसऱ्या टप्प्यातील वेतन वसुली लवकरात लवकर पूर्ण करा, विळद धक्क्यावरील काम बंद करून पूर्वीप्रमाणेच नगर रेल्वे स्टेशन येथील एकत्रित काम चालू ठेवा. आदी कामगण्यांसाठी हा माेर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात काळे यांच्यासह माथाडी काँग्रेस विभागाचे जिल्हाध्यक्ष विलास उबाळे, शहर विभाग अध्यक्ष सुनील भिंगारदिवे, मनोज गुंदेचा, दशरथ शिंदे, अनिस चुडीवाला, संजय झिंजे, उषाताई भगत, सुनीता भाकरे, सोपानराव साळुंके, किशोर कोतकर, सोफियान रंगरेज, रोहीदास भालेराव आदींसह कामगार मोठ्या संख्येने मोर्चात कुटुंबियांसह सहभागी झाले होते.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून मार्चाला प्रारंभ झाला. आशा टॉकीज चौक, चौपाटी कारंजा, चितळे रोड, नेता सुभाष चौक मार्गे कापड बाजार एमजी रोडच्या भिंगारवाला चौकात मोर्चाचा समारोप झाला. कामगारांनी राज्य सरकार, महसूल विभाग, माथाडी मंडळ यांच्या निषेधाच्या घोषणा देत मोर्चा मार्ग दणाणून सोडला होता. ' दाम आमच्या कामाचं, नाही कुणाच्या बापाचं ', ' कोण म्हणतं देत नाय, घेतल्या शिवाय राहत नाय ' अशा घोषणा देत कामगारांनी आपल्या संतापाला यावेळी मोकळी वाट करून दिली. तसे निषेधाचे फलक कामगारांनी मोर्चात झळकवले.

याप्रसंगी बोलताना काळे म्हणाले राज्यातील खोके सरकार कामगारांच्या जीवावर उठले आहे. माथाडी कायदा देखील यांना मोडीत काढायचा आहे. सहाय्यक कामगार आयुक्त, जिल्हा महसूल प्रशासन हे कामगार, सर्वसामान्य जनतेसाठी काम करते की. महसूलमंत्र्यांच्या खाजगी दावणीला बांधले आहे असा प्रश्न निर्माण झाला आहे. कामगारांना प्रश्न तातडीने मार्गी लागला नाही तर यापेक्षाही तीव्र आंदोलनकरण्याचा ईशारा त्यांनी दिला. विलास उबाळे यांनीही याप्रसंगी कामगारांच्या व्यथा मांडल्या. मोर्चा विसर्जित झाल्यानंतर किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये शिष्टमंडळाने जाऊन जिल्हाधिकारी यांना यांना निवेदन सादर केले.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर