शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

Nirbhaya Case : शुभदिन! न्याय मिळाला, विश्वास वाढला; तब्बल तीन महिन्यांनी अण्णा हजारेंनी सोडलं मौन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2020 18:45 IST

Nirbhaya Case : दिल्लीतील निर्भयाच्या आरोपींना शुक्रवारी सकाळी फाशी दिल्यानंतर राळेगणसिद्धीत (ता.पारनेर) येथे सकाळी १० वाजता हजारे यांनी मौन सोडले. यावेळी आमदार निलेश लंके उपस्थित होते.

ठळक मुद्देमहिला, युवतींवरील अत्याचार रोखण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात नवा दिशा कायदा आणण्याचा निर्णय घेतला आहे.हजारे म्हणाले, मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा झाल्याने खऱ्या अर्थाने निर्भयाला न्याय मिळाला.

पारनेर : निर्भयाच्या मारेक-यांना फाशी दिल्याने जनतेचा न्याय व्यवस्थेवरील विश्वास वाढला आहे, असा विश्वास ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी व्यक्त केला. दिल्लीतील निर्भयाच्या आरोपींना शुक्रवारी सकाळी फाशी दिल्यानंतर राळेगणसिद्धीत (ता.पारनेर) येथे सकाळी १० वाजता हजारे यांनी मौन सोडले. यावेळी आमदार निलेश लंके उपस्थित होते. यावेळी ते बोलत होते.

हजारे म्हणाले, मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा झाल्याने खऱ्या अर्थाने निर्भयाला न्याय मिळाला. निर्भयाला न्याय मिळण्यास सात वर्षे लागली. पोलीस चौकशी, कायदा, न्यायव्यवस्थेत कुठे उणिवा राहिल्या का? याचा अभ्यास होण्याची गरज आहे. त्यातून महिलांवरील अत्याचाराच्याविरोधात कठोर कायदे करण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने पुढाकार घ्यायला हवा. ‘देर है लेकिन अंधेर नही’ हे सुद्धा यातून उघड झाले, असे हजारे यांनी सांगितले.

 

Nirbhaya Case : राष्ट्रपती कोविंद यांच्या कार्यकाळातील पहिलाच मृत्युदंड

 

Nirbhaya Case : नराधमांचे मृतदेह कुटुंबीयांनी ताब्यात न घेतल्यास काय? सरकारकडे एकच पर्याय

राज्याप्रमाणेच देशभर कायदा करावामहिला, युवतींवरील अत्याचार रोखण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात नवा दिशा कायदा आणण्याचा निर्णय घेतला आहे. तसा कायदा केंद्र सरकारनेही करावा, असे मत हजारे यांनी व्यक्त केले. रखडलेला न्यायालय जबाबदारी कायदाही केंद्र शासनाने लवकरात लवकर मंजूर करावा, अशी मागणी हजारे यांनी केली.

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरParnerपारनेरanna hazareअण्णा हजारेStrikeसंपNirbhaya Gang-rapeनिर्भया गॅंगरेप