शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

अकोलेतील ममताबाईचे संशोधन आंतरराष्ट्रीय पातळीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2019 15:42 IST

देवगाव येथील आदिवासी शेतकरी महिला ममताबाई भांगरे यांचे सेंद्रिय शेतीचे संशोधन आंतरराष्ट्रीय पातळीवर झळकले.

हेमंत आवारी । अकोले : देवगाव येथील आदिवासी शेतकरी महिला ममताबाई भांगरे यांचे सेंद्रिय शेतीचे संशोधन आंतरराष्ट्रीय पातळीवर झळकले. कोलकत्ता येथे झालेल्या आतंरराष्ट्रीय विज्ञान महोत्सवात भांगरे यांनी सहभाग नोंदवत सेंद्रिय भात शेती, नैसर्गिक परसबाग शेती, गांडुळ खतनिर्मितीविषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले. भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान, भूमी विज्ञान, आरोग्य आणि कुटुंब कल्याण या तिन्ही विभागाच्या वतीने कोलकात्ता येथे पाचवा भारतीय आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव नुकताच पार पडला. संमेलनात ममताबाई भांगरे यांनी दुर्गम आदिवासी भागात फुलवलेल्या सेंद्रिय शेतीविषयी मार्गदर्शन केले. दुभाषिकाचे काम बायफचे जितीन साठे यांनी केले. ममताबाई बायफ संस्थेशी ‘जनरल मिल्स’ या कंपनीने पुरस्कृत केलेल्या आदिवासी विकास प्रकल्पाच्या माध्यमातून पुढे आल्या. त्यांनी सेंद्रिय शेतीतून भात शेती तर नैसर्गिक शेतीतून परसबाग फुलवली. उत्तम रितीने गांडुळ खत निर्मिती केली आणि गांडुळ खताच्या छोट्या गोळ्या तयार केल्या. दोन रोपांमध्ये या गोळ््या गाडल्या. खत वाहून जाणार नाही, याची काळजी घेतली.  त्यांचे हे संशोधन यशस्वी ठरले. याच पध्दतीने त्यांनी बियाणे गोळा करुन परसबाग रोपवाटिका तयार केली. विविध भाजीपाला पिकांच्या बियांचे संवर्धन त्यांनी केले. तंत्रज्ञानाचा प्रचार व प्रसार करण्यासाठी केलेल्या कामाची दखल घेऊन त्यांना कोलकात्ता येथील विज्ञान महोत्सवासाठी आमंत्रित करण्यात आले होते.कामाची प्रशंसा बायफचे विभाग प्रमुख जितीन साठे यांनीही संमेलनात मार्गदर्शन केले. विज्ञान - तंत्रज्ञान विभागाचे मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी ममताबाई यांच्या कामाची प्रशंसा केली. खासदार रूपा गांगुली यांनीही त्यांच्या कार्याचा गौरव केला. लीना बावडेकर, बाळासाहेब मुळे, राम कोतवाल, योगेश नवले, लीला कुºहे, रोहिदास भरीतकर, राम भांगरे यांनी ममताबाईंना प्रोत्साहन दिले.

टॅग्स :AkoleअकोलेFarmerशेतकरी