शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

थकीत वेतनासाठी मालधक्का कामगारांचे सहाय्यक आयुक्त कार्यालयासमोर निदर्शने

By अरुण वाघमोडे | Updated: November 7, 2023 19:07 IST

अन्यथा कामगार रस्त्यावर उतरतील असा इशारा काँग्रेसच्या माथाडी कामगार विभागाच्या वतीने देण्यात आला.

अहमदनगर: दरवाढीसह थकीत वेतन वसुलीच्या मागणीसाठी येथील रेल्वे मालधक्का कामगारांनी मंगळवारी येथील सहाय्यक कामगारआयुक्त कार्यालया समोर जोरदार निदर्शने केली. दोन आठवड्यात वसुली करून कामगारांच्या खात्यावर रक्कम जमा करा, अन्यथा कामगार रस्त्यावर उतरतील असा इशारा काँग्रेसच्या माथाडी कामगार विभागाच्या वतीने देण्यात आला.

काँग्रेसचे शहरजिल्हाध्यक्ष किरण काळे, माथाडी काँग्रेस विभागाचे जिल्हाध्यक्ष विलास उबाळे, विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष सुनील भिंगारदिवे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी सहाय्यक कामगार आयुक्त नितीन कवले, माथाडी मंडळाचे सचिव बोरसे यांना कार्यालयात घेराव घालण्यात आला. यावेळी काळेंसह उबाळे, भिंगारदिवे, कामगारांनी अधिकाऱ्यांवर प्रश्नांचा भडीमार करत चांगलेच धारेवर धरले. यावेळी बोलताना किरण काळे महणाले कामगारांच्या भावनांशी खेळण्याचे काम सुरू आहे. तारीख पे तारीख देऊन दिशाभूल केली जात आहे. माथाडी मंडळ नेमके कामगारांच्या हितासाठी काम करते की मुठभर भांडवलदारांसाठी. काँग्रेसचा माथाडी कामगार विभाग रेल्वे मालधक्क्यासह शहरातील सर्वच कामगारांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असून दरवाढीसह थकीत वेतन वसुली कामी आता कोणत्याही परिस्थितीत मंडळाला पळ काढून दिला जाणार नाही. विलास उबाळे म्हणाले, आम्ही पंधरा दिवसांचा अल्टीमेटम दिला आहे. कामगार व महसूल प्रशासन एकमेकांकडे बोट न दाखवता आपापसामध्ये समन्वय ठेवावा.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरrailwayरेल्वे