शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
3
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
4
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
5
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
6
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
7
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
8
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
9
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
10
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
11
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
12
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
13
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
14
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
15
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
16
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
17
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
18
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
19
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
20
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...

‘मेक इन इंडिया’ कोणासाठी?

By admin | Updated: October 2, 2014 23:50 IST

आश्वी : खुर्चीच्या राजकारणासाठी सुरू झालेली भाऊबंदकी ही राज्याच्या हिताची नाही. तुमच्या या राजकारणाने गावपातळीवरील नेतृत्व आता संपवले आहे.

आश्वी : खुर्चीच्या राजकारणासाठी सुरू झालेली भाऊबंदकी ही राज्याच्या हिताची नाही. तुमच्या या राजकारणाने गावपातळीवरील नेतृत्व आता संपवले आहे. या राजकारणातून महाराष्ट्र तुम्ही कुठे नेणार आहात, असा सवाल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब विखे पाटील यांनी केला. मेक इन इंडिया, मेड इन इंडियाचे वातावरण केले जात असले तरी सहकाराप्रमाणे हे उत्पादकांच्या मालकीचे असले पाहिजे, असे ठाम मत त्यांनी व्यक्त केले.शिर्डी विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निवडणूक प्रचाराचा प्रारंभ श्रीक्षेत्र निझर्णेश्वर येथे करण्यात आला. त्याप्रसंगी सभेत विखे बोलत होते. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रा. श्रीकांत बेडेकर अध्यक्षस्थानी होते. यावेळी माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे, अण्णासाहेब म्हस्के, शालिनीताई विखे, डॉ. भास्करराव खर्डे, बाबासाहेब डांगे, अ‍ॅड. बापूसाहेब गुळवे, अ‍ॅड. आप्पासाहेब दिघे, अ‍ॅड. रघुनाथ बोठे, सोमनाथ नवले, डॉ. सुजय विखे पाटील, ताराचंद कोते आदी उपस्थित होते.विखे म्हणाले की, जग घडवा, राष्ट्र घडवा असा नारा दिला जात आहे. मात्र समाज एकसंघ ठेवण्याचे काम महाराष्ट्रातीलच फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारांनी केले. तो विचार आज गरजेपुरता वापरला जातो. राजकारणापायी सामाजिक जीवन उद्ध्वस्त करण्याचे काम होत आहे. भाऊबंदकीतून खुर्चीसाठी सुरू झालेल्या या राजकारणातून महारष्ट्र खड्ड्यात घालणार का? असा प्रश्न त्यांनी केला. पद्मश्रींनी सहकार चळवळ जोपासताना संकुचीतपणा ठेवला नाही. त्यामुळेच शेतकऱ्यांच्या उत्पादनाला शेतातच भाव मिळाला.निळवंडे धरणाबाबत नेहमीच चर्चा होते मात्र हा इतिहास समजून घेण्याची गरज आहे. कालव्यांची कामे आपणच पूर्ण करणार आहोत. सर्वात प्रथम अकोले तालुक्याने बंदिस्त जलवाहिनीतून पाण्याची मागणी केली. जमिनी वाचवण्याचा त्यांचा विचार होता. या मागणीला पाठिंबा देत पिचडांबरोबर राहण्याची भूमिका घेतली. केवळ गैरसमज पसरवू नका असे सूचित करून विखे म्हणाले की, सत्तेपेक्षा सेवा आणि जनहिताला आम्ही प्राधान्य दिले. सध्या सत्तेसाठी हपापलेली माणसे केवळ लबाडांचे रक्षण करण्यासाठी एकमेकांचा पानउतारा करीत राज्यात फिरत आहेत.राधाकृष्ण विखे म्हणाले की, मतदारसंघात सामाजिक न्यायतत्त्वाने आपण बंधूभाव जोपासला त्यामुळेच या मतदारसंघात कुठे जातीय दंगली झाल्या नाहीत. विकासाचा अजेंडा हा सर्वांसाठी लाभल्यानेच या तालुक्याचा मानवी विकास निर्देशांक हा सर्वात उच्च राहिला. राज्यात पुन्हा विजेच्या संकटाने डोके वर काढले आहे. वाढते भारनियमन हे जाणीवपूर्वक केले जात आहे का, असा प्रश्न निर्माण होऊ लागला आहे. लोकसभा निवडणुकीच्या वेळी ही असेच षडयंत्र रचले गेले. या पाठीमागे कोण आहे, याचा विचार करा, असे आवाहन करून राज्यात काँग्रेसचीच सत्ता पुन्हा येणार, असा दावा विखे यांनी केला. प्रारंभी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी रॅली काढून विखे यांचे स्वागत केले. (वार्ताहर)