शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
3
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
4
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
5
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
6
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
7
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
8
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
9
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
10
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
11
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
12
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
13
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
14
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
15
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
16
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
17
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
18
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
19
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
20
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल

कचरामुक्त स्वच्छ शहरात महाराष्ट्र सर्वोत्तम; साईनगरीला यंदा थ्री स्टार रेंटींग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2020 14:19 IST

केंद्रीय गृहनिर्माण व नागरी कार्य मंत्रालयाने देशातील कचरामुक्त स्वच्छ शहरांचे स्टार रेटींग जाहिर केले आहे. त्यात महाराष्ट्र देशातील सर्वोत्तम राज्य ठरले आहे़ देशभरात सिंगल स्टार, थ्री स्टार, फाईव्ह स्टार व सेवन स्टारनुसार रेटींग देण्यात आले आहे.

प्रमोद आहेर /     शिर्डी : केंद्रीय गृहनिर्माण व नागरी कार्य मंत्रालयाने देशातील कचरामुक्त स्वच्छ शहरांचे स्टार रेटींग जाहिर केले आहे. त्यात महाराष्ट्र देशातील सर्वोत्तम राज्य ठरले आहे. देशभरात सिंगल स्टार, थ्री स्टार, फाईव्ह स्टार व सेवन स्टारनुसार रेटींग देण्यात आले आहे.देशपातळीवरील सर्वोत्तम १४१ कचरामुक्त स्वच्छ शहरात महाराष्ट्रातील तब्बल ७६ शहरांचा समावेश आहे. यात नवी मुंबई या एकमेव शहराने फाईव्ह स्टार, ३४ शहरांनी थ्री स्टार तर ४१ शहरांनी सिंगल स्टार रेटींग पटकावले आहे. स्वच्छतेच्या बाबतीत राज्याच्या दृष्टीने ही अभिमानाची बाब आहे.गेल्या तीन वर्षांची परंपरा कायम राखत यंदाही साईनगरीने स्वच्छतेतील आपला दबदबा कायम राखला आहे. यंदाच्या स्वच्छ सर्वेक्षणमध्ये शिर्डी नगरपंचायतीने थ्री स्टारमध्ये स्थान पटकावले आहे. माजीमंत्री, आमदार राधाकृष्ण विखे यांच्या नेतृत्वाखालील शिर्डी नगरपंचायतीने स्वच्छतेत राष्ट्रीय पातळीवर सलग तीन वर्षे आपली गुणवत्ता कायम राखली आहे. शहर स्वच्छतेसाठी नगराध्यक्षा अर्चना कोते, उपनगराध्यक्ष मंगेश त्रिभुवन यांच्यासह सर्व पदाधिका-यांनी सहभाग घेतला. मुख्याधिकारी सतिष दिघे यांच्या नेतृत्वाखाली प्रशासनाने स्वच्छतेत अव्वल राहण्यासाठी परिश्रमाची पराकाष्टा केली.शिर्डी, देवळाली प्रवरा थ्री स्टार; नगर, संगमनेर सिंगल स्टारनाशिक विभागात शिर्डी, देवळाली प्रवरा या नगरपालिका तर धुळे व जळगाव महापालिकांनी थ्री स्टारचा दर्जा मिळवला आहे. याशिवाय अहमदनगर व नाशिक महापालिकांसह जामनेर, रावेर, शहादा, संगमनेर, शिरपूर, वारणगाव व भगुर यांनी सिंगल स्टारचे मानांकन मिळविले आहे.राज्यातील थ्री स्टार रेटींग शहर असे-अंबरनाथ, भिवंडी-निझामपूर, ब्रम्हापुरी, चंद्रपूर, देवळाली प्रवरा, धुळे, गडहिंग्लज, इंदापूर, जळगाव, जालना, जेजुरी, जुन्नर, कागल, कराड, खेड, लोणावळा, महाबळेश्वर, मलकापूर, माथेरान, माऊदा, मिरा-भार्इंदर, मुरूड, नारखेल, पाचगणी, पन्हाळा, राजापूर, रत्नागिरी, सासवड, शिर्डी, तासगाव, ठाणे, वडगाव, वेंगुर्ला व वीटा या गावाचा समावेश आहे.

साईनगरी हे आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र आहे. काही वर्षापूर्वी येथील अस्वच्छतेबाबत मनात सल होती़. अस्वच्छतेचा कलंक धुवून काढण्यासाठी पदाधिकारी व प्रशासनाने मनापासून कष्ट केले. नागरिकांनी यासाठी पुरेपूर साथ दिली. साईनगरी साईबाबांबरोबरच स्वच्छतेचेही प्रतिक व्हावी, असा आमचा प्रयत्न आहे़, असे आमदार राधाकृष्ण विखे यांनी सांगितले.  

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरrahaataराहाताshirdiशिर्डीsaibabaसाईबाबा