शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

पुन्हा महायुतीचेच सरकार, खोट्या प्रचाराला जनता बळी पडणार नाही: रामदास आठवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2024 13:47 IST

कर्जत येथे मंगळवारी महायुतीच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

लोकमत न्यूज नेटवर्क, कर्जत : महाराष्ट्रासह कर्जत-जामखेड मतदारसंघात रिपाई महायुती, एनडीए सोबत आहे. राज्यात पुन्हा एकदा सरकार स्थापन करण्याचा विश्वास आम्हाला आहे. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने संविधान बदलण्याचा जो खोटा प्रचार केला होता, तो उघडा पडलेला आहे. त्यामुळे महाराष्ट्राची जनता आता पुन्हा या खोट्या प्रचारास बळी पडणार नाही, असे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सांगितले.

कर्जत येथे मंगळवारी महायुतीच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आठवले म्हणाले, ज्याला संविधान मान्य नाही. त्याला देशात राहण्याचा अधिकार नाही. संविधान बदलण्याची भाषा जी सुरू आहे ती केवळ सत्ता मिळविण्यासाठी केलेली धडपड आहे. काँग्रेस आणि त्यांचे मित्रपक्ष सत्तेशिवाय राहू शकत नाहीत. म्हणून त्यांचा तोल सुटत असून, ते काहीही बेछूट आरोप महायुतीवर करत आहेत. २०२४ ला खोटा-नाटा प्रचार करून लोकांची दिशाभूल करीत विरोधीपक्ष पद मिळेल एवढ्या जागा त्यांनी मिळवल्या. खासदार राहुल गांधी हे भाजपबाबत संविधान बदलण्याची भाषा करतात, यांच्या विरोधात निवडणूक आयोगाकडे आपण तक्रार केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचा आदर करतात. भाजप विकासाचे राजकारण करीत असून, सर्व घटकांना न्याय देण्याचा केंद्र सरकार प्रयत्न करीत आहे. प्रत्येक जिल्ह्यात विमानतळ करण्याची घोषणा लवकरच मार्गी लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.

पक्षासाठी ठोस शब्द घेतला 

महायुतीमध्ये तीन मोठे राजकीय पक्ष असल्याने रिपाइंला दोनच जागा मिळाल्या आहेत. मात्र, कोणत्याही नेत्यांनी अथवा कार्यकर्त्यांनी हवालदिल होऊ नये. सत्तेत मंत्रीपद यासह जिल्हा परिषद, पंचायत समिती, तसेच विविध महामंडळात रिपाईसाठी ठोस शब्द घेतला आहे. त्यामुळे सर्वांनी महायुतीच्या उमेदवारांना निवडून आणण्याची जबाबदारी पार पाडावी, असे आदेश पक्षातील पदाधिकाऱ्यांना दिले असल्याचे आठवले यांनी सांगितले.

 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४north maharashtra regionउत्तर महाराष्ट्र विधानसभा निवडणूकkarjat-acकर्जतRamdas Athawaleरामदास आठवले