शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

जिल्हा मराठा संस्थेचे माजी अध्यक्ष माधवराव मुळे यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2019 13:21 IST

अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे विश्वस्त व माजी अध्यक्ष माधवराव मुळे यांचे आज निधन झाले.

अहमदनगर : अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे विश्वस्त व माजी अध्यक्ष माधवराव मुळे यांचे आज निधन झाले. ते ‘आबा’ या नावाने परिचित होते. त्यांच्या निधनामुळे अहमदनगर जिल्ह्यात मोठी पोकळी निर्माण झाली. नगर तालुक्यातील वाटेफळ या छोट्याशा गावात माधवराव मुळे यांचा १९३२ साली जन्म झाला.  त्यांनी गावातच किराणा दुकान सुरु केले. १९४७ साली झालेल्या रझाकार चळवळीत त्यांनी भाग घेतला. त्यानंतर १९५२ मध्ये नगरमध्ये येत आडत व्यवसाय सुरु केला. त्याचवेळी संयुक्त महाराष्ट्र चळवळीत सक्रीय झाले. या कालावधीत डाव्या विचारांशी जोडले गेले. १९५८ मध्ये अहमदनगर जिल्हा मराठा समाज संस्थेवर सदस्य म्हणून त्यांची निवड झाली. त्यानंतर नगर तालुका बाजार समितीची निवडणूक लढवली. १९६० नगर तालुका बाजार समितीचे सभापती झाली. बाजार समितीची दगडी कमान त्यांनी स्वत: बैलगाडीतून दगड आणून उभारली. माळीवाडा भागातून १९६७ साली नगरपालिकेची निवडणूक लढवली. इंदिरा काँग्रेस तालुकाध्यक्ष पदही भुषविले. त्यानंतरअहमदनगर जिल्हा मराठा समाज संस्थेच्या शिवाजी ग्राहक भांडारचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले. १९८० साली संस्थेचे सहसचिव झाले. १९८४ मध्ये डॉ.विठ्ठलराव विखे पाटील फौंडेशनचे मानद सचिव म्हणून काम पाहिले. अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे १९८५ संचालक होते. त्यानंतर जिल्हा मराठा संस्थेचे सचिव म्हणून काम पाहिले. पुणे विद्यापीठाचे सिनेट सदस्य म्हणूनही त्यांनी काम केले. १९९० मध्ये विधानसभेचे जनता दलाच्या तिकिटावर नगर-नेवासा मतदारसंघातून निवडणूक लढवली. हॉटेल व्यवसायातही उतरले. अनेक परदेश दौरेही त्यांनी केले. १० एप्रिल २०१२ रोजी ते जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे अध्यक्ष झाले. सलग ६ वर्षे त्यांनी अध्यक्षपदाची धुरा सांभाळली. माधवराव मुळे यांचे पार्थिव संस्थेच्या आवारात आज सायंकाळी ५ वाजता अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार असून सायंकाळी ६ वाजता अमरधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.  

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर