शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
2
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
5
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
6
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
7
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
8
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
9
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
10
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
11
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
12
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
13
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
14
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
15
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
16
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
17
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
18
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
19
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
20
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

मच्छिंद्रनाथ देवस्थानने १५०  कुटुंबांना दिला आधार; अन्नधान्य, किराणा वाटप, गावागावात केली जंतुनाशक फवारणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2020 19:25 IST

आष्टी (जि. बीड) तालुक्यातील सावरगाव येथील श्रीक्षेत्र मच्छिंद्रनाथ देवस्थान ट्रस्टच्या वतीने विविध गावातील भटक्या, आदिवासी, गरीब गरजू कुटुंबीयांना अन्नधान्य, किराणा मालाचे वाटप करण्यात आले.

अहमदनगर : आष्टी (जि. बीड) तालुक्यातील सावरगाव येथील श्रीक्षेत्र मच्छिंद्रनाथ देवस्थान ट्रस्टच्या वतीने विविध गावातील भटक्या, आदिवासी, गरीब गरजू कुटुंबीयांना अन्नधान्य, किराणा मालाचे वाटप करण्यात आले. याशिवाय अनेक गावात कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी जंतुनाशक फवारणी करण्यात आली. कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी सर्वच जण लढा देत आहेत. अनेक भटके , आदिवासी कुटुंब  गावागावात अडकून पडले आहेत. या कुटुंबीयांना आधार मिळावा, यासाठी सामाजिक  जाणीवेतून अनेक मदतीचे हात पुढे येत आहेत. याच भावनेतून मच्छिंद्रनाथ देवस्थानच्या वतीने गेल्या आठ दिवसापासून भटक्या, आदिवासी, गरजू कुटुंबीयांना ज्वारी, गहू , बाजरी, तांदूळ  धान्यासह किराणा मालाचे वाटप केले जात आहे. जवळपास १५० कुटुंबीयांना आतापर्यंत मदतीचे वाटप केले. देवस्थान ट्रस्टच्या वतीने नागरिकांना मदतीचे आवाहन केले होते. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी अन्नधान्य व रोख स्वरुपात मदत गोळा केली होती. यासाठी ट्रस्टचे अध्यक्ष दादासाहेब चितळे, सचिव बाबासाहेब म्हस्के, सरपंच राजेंद्र म्हस्के, बाळासाहेब म्हस्के, अशोक म्हस्के, विठ्ठल म्हस्के, आयुब शेख व कर्मचाºयांनी पुढाकार घेतला होता. मदत गोळा झाल्यानंतर या मदतीचे त्यांनी नियोजनपूर्वक वाटप केले.   दरम्यान, रविवारी (दि.५ एप्रिल) हिवरा येथील २२ कुटुंबातील १०२ व्यक्तींना मदतीचे वाटप केले. यातील १८ कुटुंब जडीबुटीचा व्यवसाय करणारे आहेत. तर चार कुटुंब रोजंदारीवर काम करणारे आहेत. याप्रसंगी कार्यकर्ते मुरलीधर लगड, अशोक लगड, अ‍ॅड. योगेश लगड, भारत चव्हाण, राहूल लगड, मारुती लगड व इतर उपस्थित होते. सॅनेटायझर्स, डेटॉल साबणाचे वाटपआष्टी तालुक्यातील गंगादेवी शेडाळा, सावरगाव, शेंडगेवाडी, शिंदेवाडी, घाटदेवळगाव, पिंपळगाव घाट, अरणविहिरा, तागडखेल परिसरातील ३५ गावात मच्छिंद्रनाथ देवस्थान ट्रस्टच्या वतीने सॅनेटायझर्स, डेटॉल साबण वाटप केले. यावेळी कोरोनाचा प्रसार रोखण्याविषयी प्रबोधन केले. तर काही गावात जंतुनाशक फवारणी करण्यात आली.मदतीचे आवाहनकोरोनामुळे अनेक भटके, आदिवासी, गरीब कुटुंब अनेक गावात अडकून पडले आहेत. त्यांना रोजगार नसल्याने उपासमार सुरू आहे. त्यांना आपल्या सर्वांच्या आधाराची आज खरी गरज आहे. तरी विविध संस्था, दानशूर व्यक्ती, युवकांंनी मदतीसाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन श्रीक्षेत्र मच्छिंद्रनाथ देवस्थान ट्रस्टच्या वतीने केले आहे. 

आज प्रत्येक गावात गरजू, गरीब लोकांना कोणतेही रोजगाराचे साधन नाही. त्यांची उपासमार होऊ नये याची काळजी प्रत्येकाने घेण्याची गरज आहे. सामाजिक बांधिलकीच्या नात्याने सर्वांनी आपल्या परिसरातील अशा लोकांच्या मदतीसाठी पुढे यावे, असे आवाहन हिवरा येथील कार्यकर्ते अ‍ॅड.योगेश लगड यांनी केले आहे.  

टॅग्स :Beedबीडashti-acआष्टीSocialसामाजिकcorona virusकोरोना वायरस बातम्या