शहरं
Join us  
Trending Stories
1
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
2
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
3
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
4
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
5
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
6
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
7
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
8
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
9
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
10
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
11
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
12
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
13
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
14
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
15
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
16
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."
17
लव्ह जिहादवरील 'पुस्तका'द्वारे लोकांना भडकवायचा छांगूर बाबा, आणखी ४ सहकाऱ्यांचाही खुलासा; या जिल्ह्यांत सुरू होता धर्मांतराचा खेळ
18
ट्रम्प सरकारची नोकरदारांवरच कुऱ्हाड! १३०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार, लवकरच पाठवणार नोटीस
19
"पैशांची एखादी बॅग देऊ...आजकल हमारा नाम बहुत चल रहा है"; शिरसाटांची मिश्कील टिप्पणी
20
“महायुतीच्या अपयशावर बोट ठेवणार, पक्षाची प्रतिष्ठा वाढवणार”; शशिकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया

लोखंडेंना खासदारकीची ‘लॉटरी’

By admin | Updated: May 17, 2014 00:58 IST

अहमदनगर: एकीकडे देशात मोदीची लाट असताना शिर्डी मतदारसंघात स्थानिक प्रस्थापित नेत्यांविरोधात उसळलेला जनक्षोभ मतात परावर्र्तित करण्यात यश मिळवणार्‍या

अहमदनगर: एकीकडे देशात मोदीची लाट असताना शिर्डी मतदारसंघात स्थानिक प्रस्थापित नेत्यांविरोधात उसळलेला जनक्षोभ मतात परावर्र्तित करण्यात यश मिळवणार्‍या शिवसेनेच्या सदाशिव लोखंडेना १ लाख ९९ हजार ९२२ मतांच्या मोठ्या फरकाच्या विजयासह खासदारकीची लॉटरी लागली. लोखंडे पराभूत झाले, तर तो ‘चमत्कार’ ठरेल, अशी चर्चा मतदारसंघात जाहीरपणे सुरु झाली होती. आघाडीचे पराभूत उमेदवार भाऊसाहेब वाकचौैरे शिवसेना सोडून ज्या विश्वासाने काँग्रेसमध्ये आले, तो काळ वगळता ते कधीही जिंकण्यासाठी लढताहेत, हे जाणवलेच नाही. अर्थात त्यांच्याविरोधात उसळलेल्या जनमताचाच हा परिणाम! भाऊसाहेब वाकचौरे २००९ मध्ये एका विशिष्ट राजकीय परिस्थितीत खासदार झाले. त्यांना आपली खासदारकी कोणत्याही परिस्थितीत यंदा पुन्हा राखायची होती. सहा महिन्यापूर्वी सेनेची राज्यातील अवस्था तशी विस्कळीतच! या परिस्थितीत वाकचौरे काँग्रेसच्या तिकिटावर आणि माजी खासदार बाळासाहेब विखे, कृषीमंत्री राधाकृष्ण विखे या पिता-पुत्र्यांच्या राजकीय ‘सामर्थ्या’चा वापर करत पुुढील डाव खेळण्यासाठी आतूर होते. काँग्रेसकडेही उमेदवार नव्हता. योग जुळून आला आणि वाकचौरेंनी शिवसेना सोडली. पण हे करताना मतदारराजाच्या क्षोभाचा अंदाज घेण्यात ते चुकले, हे आता निकालाने अधोरेखित केले आहे. अडखळत सुरुवात करतही मतदार राजाने दाखविलेल्या विश्वासाच्या जोरावर सदाशिव लोखंडे खासदार झाले आहेत. लोखंडेंना ५ लाख ३२ हजार ९३६ तर पराभूत वाकचौरेंना ३ लाख ३३ हजार १४ मते मिळाली. लोखंडे १ लाख ९९ हजार ९२२ मतांनी विजयी झाले.लोकसभा मतदारसंघात येणार्‍या सर्व विधानसभा मतदारसंघात महायुतीने मतांची आघाडी घेतली आहे. त्यात उत्तरेतील तीनही मंत्र्यांच्या मतदारसंघांचा समावेश आहे. महायुतीने अकोलेत ४ हजार ५९१, संगमनेरमध्ये २६ हजार २७० तर शिर्डी विधानसभा मतदारसंघात ९ हजार ५०९ मतांची आघाडी घेतली आहे. यावरुन निकालाचा कल कसा सेनेच्या बाजूने झुकला, याची स्पष्ट कल्पना येते. दरम्यान, ‘आप’सह अन्य पक्षांना अपेक्षीत मतसंख्याही गाठता आली नाही. या निवडणुकीने प्रस्थापितांना इशारा दिला आहे. अगामी काळातील राजकीय समिकरणेही बदलतील. महायुतीचा उमेदवार म्हणून शिवसेनेचे कार्याध्यक्ष उध्दव ठाकरे यांनी शिर्डी लोकसभा मतदारसंघातून संधी दिली. ज्या दिवशी उमेदवारी अर्ज भरला त्या दिवशीच विजय निश्चित झाला होता. या मतदारसंघातील एकमेव पक्षाचे आमदार अशोक काळे यांनी पाणीप्रश्न मार्गी लावलेला आहे. यामुळे मताधिक्य मिळाले. याच जिल्ह्यात १५ वर्ष आमदार आणि जिल्हा बँकेत काम केलेले असल्याने अनेकांनी मदत केली. - सदाशिव लोखंडे (शिवसेना) या कारणांमुळे मिळाला विजय भाऊसाहेब वाकचौरे यांनी शिवसेना सोडून दिलेला ‘धोका’ हा मुद्दा शिवसैनिकांनी प्रचाराचा मुख्य मुद्दा केला. खरेतर तोच जोरदारपणे ‘कॅश’ करण्यात यश आले. प्रस्थापित राजकारणाला विरोध करत जनतेची सहानुभूती जिंकण्यात महायुतीला यश आले. त्यामुळे तयारी आणि प्रचार यासाठी वेळ न मिळूनही लोखंडेचा विजय निश्चित झाला. विस्कळीत झालेली सेना सहा महिन्यापूर्वी वाकचौरेंनी पक्ष सोडल्यामुळे कमालीची एकजूट झाली. सामान्य शिवसैैनिक अत्यंत त्वेषाने प्रचारात उतरला. त्यांना विरोधकांतील नाराजांचीही मदत झाली.