शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊनमुळे मे महिन्यातील विवाह मुहूर्तही हुकणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2020 12:17 IST

लग्नासाठी अनेकांनी यंदाचा मुहूर्त काढला होता़ परंतु, लॉकडाऊनमुळे मार्च आणि एप्रिल या दोन महिन्यांतील मुहूर्त हुकलेच आहेत.  मे महिन्यात काही मुहूर्त आहेत. केंद्र सरकारने ५० नातेवाईकांसह लग्नसमारंभ करण्यास परवानगी दिली आहे. पण, जिल्हा प्रशासनाने तसा आदेश न काढल्याने मे महिन्यातील मुहूर्त हुकण्याची शक्यता आहे. 

अहमदनगर : लग्नासाठी अनेकांनी यंदाचा मुहूर्त काढला होता. परंतु, लॉकडाऊनमुळे मार्च आणि एप्रिल या दोन महिन्यांतील मुहूर्त हुकलेच आहेत.  मे महिन्यात काही मुहूर्त आहेत. केंद्र सरकारने ५० नातेवाईकांसह लग्नसमारंभ करण्यास परवानगी दिली आहे. पण, जिल्हा प्रशासनाने तसा आदेश न काढल्याने मे महिन्यातील मुहूर्त हुकण्याची शक्यता आहे. मार्च, एप्रिल आणि मे हे तीन महिने लग्नसराई असते. फेब्रुवारी व मार्च महिन्यातील पहिल्या आठवड्यात लग्नसमारंभ नियोजित तारखेला पारही पडले. परंतु, मार्च महिन्याच्या दुसºया आठवड्यातच कोरोनाने कहर केला आणि सर्व काही बंद करण्याची वेळ आली. एप्रिल पूर्णपणे लॉकडाऊनमध्ये गेला. मे महिन्यात नगर जिल्ह्यातील लॉकडाऊन काही अंशी शिथिल करण्यात आला. त्यात केंद्र सरकारने सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून ५० नातेवाईकांमध्ये लग्नसमारंभ करण्यास परवानगी दिली. परंतु, या निर्णयाची जिल्ह्यात अंमलबजावणी करण्याचा अधिकार जिल्हाधिका-यांना आहे. जिल्हा प्रशासनाने अद्याप याबाबत कुठलाही निर्णय जाहीर केलेला नाही. लग्नसमारंभाबाबत काय धोरण आहे, याची विचारणा अनेकजण करू लागले आहेत. मे महिन्याचा पहिला आठवडा तर संपलाच आहे. पण यानंतरच्या मुहूर्तावर काही लग्न करण्याचे योजिले आहे. पण प्रशासनाकडून कुठलाही निर्णय न घेतल्यामुळे त्यांची धावपळ सुरू झाली आहे. कोरोनामुळे शहरासह ग्रामीण भागातील अनेक मंगल कार्यालय चालकांना पैसे परत करावे लागले. मे महिन्यातील पुढील तारखांचीही त्यांच्याकडे बुकिंग आहे. त्यांच्याकडे विचारणा होऊ लागली आहे़ परवानगी मिळत नसेल तर बुकिंगची रक्कम परत करा, अशी मागणी वधू पित्याकडून केली जात आहे. त्यामुळे ही रक्कम परत करावी की नाही, असा पेच मंगल कार्यालय चालकांसमोर आहे.  मंगलकार्यालय असोसिएशनकडून जिल्हा प्रशासनाकडे याबाबत मार्गदर्शक सूचना जारी करण्याची मागणी केली आहे.साध्या पद्धतीने लग्न करण्यास नातेवाईक तयार सरकारने २४ मार्चपासून लॉकडाऊन केल्यामुळे एप्रिल व मे महिन्यातील जे विवाह नियोजित करण्यात आले होते, ते पूर्णपणे स्थगित केलेले आहेत. आता केंद्र सरकारने ५० व्यक्तींच्या उपस्थितीत लग्नसमारंभ करण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे वर-वधू साध्या पद्धतीने लग्न करण्यास तयार आहेत. जेवणावळी, वरात असे कोणतेही कार्यक्रम न करता फक्त विधी करण्याचे नियोजन आहे. तसेच मंगल कार्यालयांकडून मास्क सॅनिटायझर वापरणे बंधनकारक करण्यात येणार आहे. दोन महिने गेले आहेत़ एक महिना बाकी आहे. महिन्यातील लग्नसमारंभाबाबतचे मार्गदर्शक तत्वे जाहीर करावीत, अशी मागणी अहमदनगर शहर मंगल कार्यालय, लॉन्स असोसिएशनचे अध्यक्ष भगवान फुलसौंदर यांनी केली आहे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरcorona virusकोरोना वायरस बातम्या