शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

कोतूळ शहरात लॉकडाऊनचे वाजले बारा; बाजारात दीड हजार लोकांची गर्दी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2020 14:00 IST

कोतूळ शहरात सकाळी सात ते दहा या कालावधीत थेट मुख्य चौकात भाजी बाजार भरतो. बुधवारी या बाजारात मोठी गर्दी करीत किमान एक हजार लोक हजेरी लावत असल्याने लॉकडाऊनचे बारा वाजले आहेत. 

कोतूळ  : शहरात सकाळी सात ते दहा या कालावधीत थेट मुख्य चौकात भाजी बाजार भरतो. बुधवारी या बाजारात मोठी गर्दी करीत किमान एक हजार लोक हजेरी लावत असल्याने लॉकडाऊनचे बारा वाजले आहेत.     कोतूळ गावात सध्या ७५ जण होम कोरोंटाइनर आहेत. तर आसपासच्या चाळीस गाव डांग भागात हा आकडा एक हजारांच्या वर आहे. पुणे, मुंबई व परराज्यातील कामगार या भागात आपल्या स्वगृही परतले असल्याने आरोग्य विभाग, ग्रामपंचायत, स्थानिक पोलीस प्रशासनाने त्यांना होम कोरोंटाइन केले आहे. मात्र कोतूळ  ही परिसराची व्यापारीपेठ असल्याने कोतूळात परगावातील असंख्य लोक सकाळी भाजी व इतर खरेदीसाठी सकाळी सात ते दहा या कालावधीत मोठी गर्दी करतात. विशेष म्हणजे कोणत्याही प्रकारची सोशल डिस्टन्स न पाळता हा बाजार भरत असल्याने कोतूळ गावात धोक्याची घंटा वाजली आहे.   कोतूळ पोलीस स्टेशनचे सुनील साळवे व विजय खुळे  व ग्रामविकास अधिकारी सुभाष जाधव यांनी अत्यंत कडक बंदोबस्त ठेवला. परंतू रात्री उशिरापर्यंत पहारा देणारे कर्मचारी सकाळी नऊ दहा वाजता नाकेबंदी करतात. त्या आगोदर तीस, पस्तीस भाजी व्यापारी मुख्य रस्त्यावरच दुकाने थाटल्याने गर्दी वाढते. विशेष म्हणजे यात एकही शेतकरी नसून परगावातील व्यापारी हा माल विकतात. तर शासनाने कोरोना बचावासाठी ठरवून दिलेले नियमांना पायदळी तुडवले जाते.

‘लोकमत’ने पाच दिवसांपूर्वी अकोलेचे पोलीस निरीक्षक अरविंद जोंधळे यांना ही माहिती दिली. मात्र भाजी विक्रेत्यांना कोणतेही नियम नाहीत. ती जीवनावश्यक वस्तू असल्याने कोठेही विक्री करू शकतात. त्यांना कोणतेही निर्बंध नाहीत असे त्यांनी सांगितले.  

टॅग्स :AhmednagarअहमदनगरAkoleअकोलेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस