शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
4
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
5
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
6
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
7
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
8
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
9
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
10
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
11
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
12
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
13
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
14
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
15
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
16
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
17
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
18
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
19
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
20
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त

गोदावरीला महापूर आल्यानं जनजीवन विस्कळीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2019 23:01 IST

कोपरगाव शहरासह तालुक्यातील नदीकाठच्या गावात पुराचे पाणी शिरले

कोपरगाव : नाशिक धरण क्षेत्रात पावसाचा जोर कायम असल्याने नांदूर मधमेश्वर धरणातून रात्री दहा वाजता  २ लाख ९१ हजार इतके क्युसेक पाणी सोडल्याने गोदावरीने रुद्रावतार धारण करत पूररेषा ओलांडून कोपरगाव शहरासह तालुक्यातील नदीकाठच्या गावात मोठ्या प्रमाणात पाणी शिरल्याने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली.रविवारी कोपरगाव शहरातील नदीकाठचे बाजारतळ, इंदिरानगर, गोरोबानगर, दत्तनगर, महादेवनगर, सर्वे न १०५, मोहिनीराजनगर या भागात मोठ्या प्रमाणात पाणी येत असल्याने रविवारी दुपारपासूनच येथील १०० ते १२० कुटुंबाना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले. सायंकाळी शहरातील नदीवरील पूल पाण्याखाली गेला तसेच शहरातील खंदकनाल्याला देखील पूर आल्याने रात्री उशिरा शहरात पाणी शिरले होते.तालुक्यातील गोदावरी काठच्या ८ गावातील ५९ कुटुंब व २९५ व्यक्ती ग्रामपातळीवरील प्रशासकीय यंत्रणा, मित्रमंडळ, सामाजिक संस्था यांच्या मदतीने नदीकाठी पूररेषेत असलेल्या घरातील ग्रामस्थांना सुरक्षितस्थळी हलवून राहण्याची व्यवस्था केली. प्रशासनाने कोपरगाव तालुक्यातील सर्व शाळा महाविद्यालयांना सोमवारी एक दिवसाची सुट्टी जाहीर केली आहे. गोदावरी नदीवरील मंजूर येथील बंधाऱ्यांचा भराव वाहून गेल्याचे परिसरातील शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.पूरपरिस्थितीत तहसीलदार योगेश चंद्रे, मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, उपमुख्याधिकारी सुनील गोरडे, पोलीस निरीक्षक प्रवीण लोखंडे, पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर, समन्वयक सुशांत घोडके यांच्यासह सर्व प्रशासकीय यंत्रणा लक्ष ठेवून होती.दरम्यान आमदार स्नेहलता कोल्हे, युवा नेते आशुतोष काळे यांनी प्रत्यक्ष तसेच त्यांच्या यंत्रणेमार्फत नागरिकांची मदत सर्वच मदत केली.गोदावरी काठच्या श्रीरामपूर तालुक्यातील ६ गावातील १६३ नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. नेवासा तालुक्यातील घोगरगावमधील 27 कुटुंब 157 लोकसंख्या, जेनपूर-75 कुटुंब 263 लोकसंख्या, सुरेगाव-8 कुटुंब 32 लोकसंख्या, उस्थळ-3 कुटुंब 13 लोकसंख्या सुरक्षित स्थळी स्थलांतरित केली आहे. राहाता तालुक्यातील १४१ नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे.

टॅग्स :godavariगोदावरीRainपाऊस