शहरं
Join us  
Trending Stories
1
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
2
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
3
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
4
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
5
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
6
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
7
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
9
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
10
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
11
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
12
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
13
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
14
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
15
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
16
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
17
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
18
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
19
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...

लोकमत मुलाखत:राष्ट्रपती पुरस्कार विजेते मंगलारम यांच्याकडून धडे, गोपाळवाडी शाळेत स्वावलंबी शिक्षणाची पायाभरणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2020 12:29 IST

अहमदनगर : मुलांना केवळ खडू-फळा, वही-पेन, वर्गपाठ-गृहपाठ एवढ्या चौकटीतल्या शिक्षणात बांधून न ठेवता त्यांना आकाशातल्या पक्ष्यांप्रमाणे खुले सोडले, लिखापढीपेक्षा कृती करून दाखवली, त्यांना पुस्तकी किडा करण्यापेक्षा स्वावलंबी, रोजच्या व्यवहाराचं ज्ञान दिलं की मुले आनंदाने, आपसूक शिकतात, हा मंत्र आहे गोपाळवाडी (ता. राहुरी) येथील आदर्श शिक्षक नारायण मंगलारम यांचा. त्यांच्या या वैविध्यपूर्ण शिक्षणपद्धतीची दखल घेतल्यानेच यंदाच्या राष्ट्रीय पुरस्कारासाठी त्यांची निवड झाली आहे.

चंद्रकांत शेळके

अहमदनगर : मुलांना केवळ खडू-फळा, वही-पेन, वर्गपाठ-गृहपाठ एवढ्या चौकटीतल्या शिक्षणात बांधून न ठेवता त्यांना आकाशातल्या पक्ष्यांप्रमाणे खुले सोडले, लिखापढीपेक्षा कृती करून दाखवली, त्यांना पुस्तकी किडा करण्यापेक्षा स्वावलंबी, रोजच्या व्यवहाराचं ज्ञान दिलं की मुले आनंदाने, आपसूक शिकतात, हा मंत्र आहे गोपाळवाडी (ता. राहुरी) येथील आदर्श शिक्षक नारायण मंगलारम यांचा. त्यांच्या या वैविध्यपूर्ण शिक्षणपद्धतीची दखल घेतल्यानेच यंदाच्या राष्ट्रीय पुरस्कारासाठी त्यांची निवड झाली आहे.

मराठी, इतिहास, इंग्रजी या तीन विषयांची पदव्युत्तर पदवी घेतलेले शिक्षक मंगलारम सध्या राहुरी तालुक्यातील गोपाळवाडी जिल्हा परिषद शाळेत तिसरी, चौथीचे वर्गशिक्षक आहेत. मूळचे अहमदनगर येथील असलेले मंगलारम यांनी डी. एड. केल्यानंतर २००३पासून शिक्षकी पेशाला सुरूवात केली. प्रारंभीची १४ वर्षे त्यांनी पैठण तालुक्यात विविध शाळांवर सेवा दिली. २०१७ मध्ये आंतरजिल्हा बदलीने ते राहुरी तालुक्यातील गोपाळवाडी शाळेत आले. शिक्षकी पेशाच्या सुरूवातीपासून मंगलारम यांनी हसतखेळत आनंददायी शिक्षण देण्यावर भर दिला. मुलांना पुस्तकातून शिकवण्यापेक्षा कृतीतून, दृकश्राव्य पद्धतीने शिकवले तर विद्यार्थी ते कैक पटीने ग्रहण करतात, हे मानसशास्त्र आहे. त्यामुळे आपण हीच पद्धत वापरतो, असे ते सांगतात. त्यांना कलेची आवड असल्याने नाटक, एकांकिका, गायन, खेळ, कविता वाचून ते मुलांना जिंकून घेतात. त्यांच्या इतिहासाच्या तासाची तर विद्यार्थी चातकाप्रमाणे वाट पाहतात. कारण इतिहास शिकवताना ते प्रत्येक विद्यार्थ्याला एकेका पात्रात बसवून त्यांच्याकडून संवाद बोलून घेतात. त्यामुळे विद्यार्थ्यांचा अभ्यासासह अभिनयाचाही एक तास होतो.

नेमके हेच मुलांना भावते. लोकशाहीतील निवडणूक पद्धत विद्यार्थ्यांना अनुभवता यावी म्हणून ते वर्गातच दोन गटात निवडणूक घेतात. मग दोन गट, त्यांचे चिन्ह, प्रचार, प्रत्यक्ष बटन दाबून मतदान, नंतर मतमोजणी व निकाल. हीच त्यांची अध्ययनपद्धती आहे. मुलांच्या अंगभूत क्षमतांचा विकास करण्याचे कौशल्य त्यांच्या अंगी आहे. त्या कौशल्याला ते नावीन्यपूर्ण उपक्रम व तंत्रज्ञानाची जोड देतात. आंतरराष्ट्रीय उपक्रमांमध्ये सहभाग नोंदवून त्यांनी खेड्यापाड्यातील या मुलांना शाळेत बसून जगाची सफर घडवली आहे. स्काईपच्या माध्यमातून गोपाळवाडीच्या विद्यार्थ्यांनी २५ देशांतील २०० पेक्षा अधिक शाळांमधील विद्यार्थ्यांबरोबर संवाद साधला आहे. रशिया, अमेरिका व युक्रेनमधील शाळांबरोबर मुलांनी पत्रांची देवाणघेवाण केली. दक्षिण कोरियामधील शाळेने गोपाळवाडीच्या मुलांसाठी कल्चरल बॉक्स पाठवला आहे.

ग्लोबल नगरीच्या माध्यमातून मुलांनी महाराष्ट्रातील परंतु सध्या जगभर कामानिमित्त असणाऱ्या आपल्या भूमिपुत्रांशी गप्पा मारल्या. यातून विद्यार्थ्यांना संवादकौशल्य, इंग्रजी भाषेवरील प्रभुत्व, तसेच आंतरराष्ट्रीय शिक्षणपद्धतीची ओळख झाली. या उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांना यंदा सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्कारावर त्यांनी मोहोर उमटवली असून येत्या शिक्षकदिनी दिल्लीत राष्ट्रपतींकडून त्यांचा सन्मान होणार आहे.सहभाग आणि कार्य४कृतिशील शिक्षक महाराष्ट्र अर्थात (एटीएम) महाराष्ट्रचे राज्य सहसंयोजक.४महाराष्ट्राच्या चार राज्यस्तरीय शिक्षक संमेलनाच्या आयोजन नियोजनात सक्रिय सहभाग - नियमित रक्तदाता , गेल्या २० वर्षात ७० पेक्षा जास्त वेळा रक्तदान केले.

-----------निशंक : सोसायटी फॉर एज्युकेशन आर्ट अँड कल्चरचे ,महाराष्ट्र राज्य सचिव. महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळ (बालभारती ) च्या इंग्रजी विषय सदस्य.एनसीईआरटीच्या ( दिल्ली) कला विभागात मास्टर ट्रेनर म्हणून निवड.एनसीईआरटीकडून मॉडेल स्कूल म्हणून गोपाळवाडी शाळेची निवड आणि - फेब्रुवारी २०१९ मध्ये एनसीईआरटी कला पथकाची शाळेला भेट.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरEducationशिक्षण