शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
3
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
4
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
5
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
6
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
7
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
8
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
9
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
10
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
11
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
12
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
13
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
14
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
15
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
16
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
17
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
18
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
19
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
20
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय

मुळा धरणाच्या उजव्या कालव्यातून आवर्तन सोडले; २६ हजार हेक्टर क्षेत्र येणार ओलिताखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2020 17:08 IST

मुळा धरणाच्या उजव्या कालव्यातून शुक्रवारी (दि.२०) शेतीसाठी उन्हाळी पहिले आवर्तन सोडण्यात आले. पहिल्या टप्प्यात ७०० क्युसेकने पाणी सोडण्यात आले आहे. शनिवारी १५०० क्युसेकपर्यंत आवर्तन वाढविण्यात येणार आहे. दहा दिवस विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला असून २६ हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. 

राहुरी : मुळा धरणाच्या उजव्या कालव्यातून शुक्रवारी (दि.२०) शेतीसाठी उन्हाळी पहिले आवर्तन सोडण्यात आले. पहिल्या टप्प्यात ७०० क्युसेकने पाणी सोडण्यात आले आहे. शनिवारी १५०० क्युसेकपर्यंत आवर्तन वाढविण्यात येणार आहे. दहा दिवस विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला असून २६ हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. मुळा धरणातूनपाणी कधी सुटणार? यासंदर्भात शेतक-यांमध्ये उत्सुकता होती. अखेर शुक्रवारी पाणी सोडल्याने उजव्या कालवा लाभक्षेत्रातील उभ्या पिकांना जीवदान मिळणार आहे. मुळा धरणात सध्या २० हजार ११ दशलक्ष घनफूट इतका पाणी साठा आहे. येत्या ४० दिवसात सर्वसाधारण ४ हजार ५०० दशलक्ष घनफूट पाणी वापरात येण्याची शक्यता आहे. मुळा धरणाचे कालवे दुरूस्तीचे काम पूर्ण झाले आहे. कालव्याला भराव टाकणे, गेट दुरूस्तीची कामे पूर्ण झालेली आहेत. या टप्प्यात उजव्या कालव्यातून ७०० क्युसेकने पाणी सोडण्यात आले आहे. कालव्यावर शेतकरी विद्युत मोटारी टाकून पाणी उचलण्याची शक्यता आहे. त्यामुळे विद्युत मोटारी व पाईप ताब्यात घेऊन कारवाई करण्याच्या तयारीत पाटबंधारे खाते आहे. पाटबंधारे खात्याने रात्रंदिवस भरारी पथक तैनात केले आहे. मुळा धरणाच्या डाव्या कालव्यातून सध्या शेतीसाठी उन्हाळी आवर्तन २ हजार ५०० क्युसेकने सुरू आहे.मुळा धरणाच्या उजव्या कालव्यातून पाणी सोडले असले तरी गैरवापर होण्याची शक्यता लक्षात घेता पाटबंधारे खात्याने पोलीस संरक्षणाची मागणी केली आहे. शेतक-यांनी पाणी वाया जाऊ न देता काटकसरीने पाण्याचा वापर करावा, असे आवाहन मुळा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता किरण देशमुख यांनी केले आहे.  

टॅग्स :AhmednagarअहमदनगरRahuriराहुरीDamधरणWaterपाणी