शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

बियाण्याच्या दरात मोठी वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2019 12:48 IST

तालुक्यात काही भागात मागील दोन तीन दिवसात सर्वत्र चांगला पाऊस झाल्याने सरासरी १४४.६६ मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे.

रोहित टेकेकोपरगाव : तालुक्यात काही भागात मागील दोन तीन दिवसात सर्वत्र चांगला पाऊस झाल्याने सरासरी १४४.६६ मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे बियाण्यांच्या खरेदीसाठी कृषी सेवा केंद्रावर चांगलीच गर्दी झाली आहे. परंतु सर्वच बियाणे खास करून मका बियाणाच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने ऐन दुष्काळात शेतक ऱ्यांच्याखिशाला चांगलाच आर्थिक फटका बसत आहे.कोपरगाव शहरात व तालुक्यात नोंदणीकृत १३५ कृषी सेवा केंद्र आहेत. त्यामध्ये सध्या भारतीय व बहुराष्ट्रीय ५० ते ६० कंपन्यांचे बियाणे उपलब्ध आहेत. मका व कपाशीमध्ये ५० ते ६० कंपन्यांचे प्रत्येकी ५ ते ६ वाण, सोयाबीनचे १५ ते १६ वाण, बाजरी १० वाण, तूर, मूग ३ ते ४ वाण उपलब्ध आहेत.मागील वर्षीच्या तुलनेत यंदा सोयाबीन, बाजरी, तूर, मूग यांच्या दरात प्रति पॅकेट ५० ते १०० रुपयाची तर मका बियाणाच्या प्रति पॅकेट मागे २०० ते ३०० रुपयाची वाढ झाली आहे. तर कपाशीच्या बियाणांवर शासनाने नियंत्रण आणल्याने भाव स्थिर आहेत. मात्र मका बियाणे विक्री करणा-या बहुराष्ट्रीय कंपन्यांनी बियाणे तसेच कीटकनाशके यांचेदर विक्रेत्यांना निश्चित करून दिलेल्या दराच्या खाली विक्रीकेल्यास विक्रीसाठी दिलेले बियाणे उचलून नेऊ, असेकाही दुकानदारांकडून सांगण्यात आले आहे.दुकानदारांना त्याच दरात विक्री करावी लागत असल्याने या कंपन्यांची एक प्रकारची मनमानीच म्हणावी लागेल .असे आहेत प्रति पॅकेटचे दरसोयाबीन ३० किलोच्या बॅगसाठी -१८०० ते १८५०मका ४ किलोच्या पॅकेटसाठी १२०० ते १८००बाजरी दीड किलोच्या पॅकेटसाठी ४५० ते ५३०तूर २ किलोच्या पॅकेटसाठी ३२० ते ३५०मूग १ किलोच्या पॅकेटसाठी १८० ते २२५तंत्र कपाशीचा प्रति ४५० ग्रॅम पॅकेट ७३० रुपये असे दर आहेत.शासनाने कपाशीप्रमाणेच खासगी कंपन्यांच्या मकासह इतर सर्वच बियाणांच्या दरावर नियंत्रण आणावे. त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक होणार नाही. शेतकºयांनी एकाच पिकावर अवलंबून न राहता वेगवेगळी पिके घ्यावी जेणेकरून उत्पादित मालाला चांगला भाव मिळेल. शेतकºयांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा . - आबासाहेब भोकरे, संचालक, अंकुर कृषी सेवा, कोपरगाव.बियाणे कंपन्यांनी त्यांचे दर निश्चित केले हा त्यांचा खासगी विषय आहे. परंतु निश्चित केलेल्या दरापेक्षा जास्त दरात शेतकºयांना बियाणे विक्री केल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल. - पंडित वाघेरे, कृषी अधिकारी, कोपरगाव.

 

यंदा बियाणे, खताचे, मजुरीचे भाव चांगलेच वाढले आहेत. मागील दोन वर्षापासून सततचा दुष्काळ आहे. सध्या पाऊस पडला आहे. परंतु शेती कशी उभी करायची हीच चिंता आहे. आमचे गाव दुष्काळग्रस्त जाहीर झालेले असताना शासनाकडून एका रुपयाचीही देखील अजून मदत मिळाली नाही. -संतोष सीताराम चव्हाण, शेतकरी,धोत्रे, ता.कोपरगाव. 

 

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar collector officeअहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय