शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs PAK W "म्हारी छोरियां छोरो से कम है के.." हरमनप्रीत ब्रिगेडनंही पाकची जिरवली!
2
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
3
मुंबईतील राजकीय नेत्याच्या मुलाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, शौचालयात गाठले आणि...
4
IND vs AUS : बढती मिळताच अय्यरनं टीम इंडियाला जिंकून दिली ट्रॉफी; घरच्या मैदानात कांगारुंची शिकार
5
गाझातील सत्ता सोडण्यास नकार दिल्यास हमासची धुळधाण उडवू, डोनाल्ट ट्रम्प यांची ताकिद 
6
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
7
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
8
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
9
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
10
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
11
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
12
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
13
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
14
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
15
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
16
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
17
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
18
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
19
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
20
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार

बियाण्याच्या दरात मोठी वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2019 12:48 IST

तालुक्यात काही भागात मागील दोन तीन दिवसात सर्वत्र चांगला पाऊस झाल्याने सरासरी १४४.६६ मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे.

रोहित टेकेकोपरगाव : तालुक्यात काही भागात मागील दोन तीन दिवसात सर्वत्र चांगला पाऊस झाल्याने सरासरी १४४.६६ मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे बियाण्यांच्या खरेदीसाठी कृषी सेवा केंद्रावर चांगलीच गर्दी झाली आहे. परंतु सर्वच बियाणे खास करून मका बियाणाच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने ऐन दुष्काळात शेतक ऱ्यांच्याखिशाला चांगलाच आर्थिक फटका बसत आहे.कोपरगाव शहरात व तालुक्यात नोंदणीकृत १३५ कृषी सेवा केंद्र आहेत. त्यामध्ये सध्या भारतीय व बहुराष्ट्रीय ५० ते ६० कंपन्यांचे बियाणे उपलब्ध आहेत. मका व कपाशीमध्ये ५० ते ६० कंपन्यांचे प्रत्येकी ५ ते ६ वाण, सोयाबीनचे १५ ते १६ वाण, बाजरी १० वाण, तूर, मूग ३ ते ४ वाण उपलब्ध आहेत.मागील वर्षीच्या तुलनेत यंदा सोयाबीन, बाजरी, तूर, मूग यांच्या दरात प्रति पॅकेट ५० ते १०० रुपयाची तर मका बियाणाच्या प्रति पॅकेट मागे २०० ते ३०० रुपयाची वाढ झाली आहे. तर कपाशीच्या बियाणांवर शासनाने नियंत्रण आणल्याने भाव स्थिर आहेत. मात्र मका बियाणे विक्री करणा-या बहुराष्ट्रीय कंपन्यांनी बियाणे तसेच कीटकनाशके यांचेदर विक्रेत्यांना निश्चित करून दिलेल्या दराच्या खाली विक्रीकेल्यास विक्रीसाठी दिलेले बियाणे उचलून नेऊ, असेकाही दुकानदारांकडून सांगण्यात आले आहे.दुकानदारांना त्याच दरात विक्री करावी लागत असल्याने या कंपन्यांची एक प्रकारची मनमानीच म्हणावी लागेल .असे आहेत प्रति पॅकेटचे दरसोयाबीन ३० किलोच्या बॅगसाठी -१८०० ते १८५०मका ४ किलोच्या पॅकेटसाठी १२०० ते १८००बाजरी दीड किलोच्या पॅकेटसाठी ४५० ते ५३०तूर २ किलोच्या पॅकेटसाठी ३२० ते ३५०मूग १ किलोच्या पॅकेटसाठी १८० ते २२५तंत्र कपाशीचा प्रति ४५० ग्रॅम पॅकेट ७३० रुपये असे दर आहेत.शासनाने कपाशीप्रमाणेच खासगी कंपन्यांच्या मकासह इतर सर्वच बियाणांच्या दरावर नियंत्रण आणावे. त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक होणार नाही. शेतकºयांनी एकाच पिकावर अवलंबून न राहता वेगवेगळी पिके घ्यावी जेणेकरून उत्पादित मालाला चांगला भाव मिळेल. शेतकºयांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा . - आबासाहेब भोकरे, संचालक, अंकुर कृषी सेवा, कोपरगाव.बियाणे कंपन्यांनी त्यांचे दर निश्चित केले हा त्यांचा खासगी विषय आहे. परंतु निश्चित केलेल्या दरापेक्षा जास्त दरात शेतकºयांना बियाणे विक्री केल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल. - पंडित वाघेरे, कृषी अधिकारी, कोपरगाव.

 

यंदा बियाणे, खताचे, मजुरीचे भाव चांगलेच वाढले आहेत. मागील दोन वर्षापासून सततचा दुष्काळ आहे. सध्या पाऊस पडला आहे. परंतु शेती कशी उभी करायची हीच चिंता आहे. आमचे गाव दुष्काळग्रस्त जाहीर झालेले असताना शासनाकडून एका रुपयाचीही देखील अजून मदत मिळाली नाही. -संतोष सीताराम चव्हाण, शेतकरी,धोत्रे, ता.कोपरगाव. 

 

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar collector officeअहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय