शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
4
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
5
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
6
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
7
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
8
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
9
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
10
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
11
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
12
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
13
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
14
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
15
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
16
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
17
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
18
नाशिक: मुलासोबत ट्रेकिंगला गेले अन् पांडव लेणीच्या डोंगरावर अडकले; नंतर...
19
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
20
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!

बियाण्याच्या दरात मोठी वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2019 12:48 IST

तालुक्यात काही भागात मागील दोन तीन दिवसात सर्वत्र चांगला पाऊस झाल्याने सरासरी १४४.६६ मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे.

रोहित टेकेकोपरगाव : तालुक्यात काही भागात मागील दोन तीन दिवसात सर्वत्र चांगला पाऊस झाल्याने सरासरी १४४.६६ मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे बियाण्यांच्या खरेदीसाठी कृषी सेवा केंद्रावर चांगलीच गर्दी झाली आहे. परंतु सर्वच बियाणे खास करून मका बियाणाच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने ऐन दुष्काळात शेतक ऱ्यांच्याखिशाला चांगलाच आर्थिक फटका बसत आहे.कोपरगाव शहरात व तालुक्यात नोंदणीकृत १३५ कृषी सेवा केंद्र आहेत. त्यामध्ये सध्या भारतीय व बहुराष्ट्रीय ५० ते ६० कंपन्यांचे बियाणे उपलब्ध आहेत. मका व कपाशीमध्ये ५० ते ६० कंपन्यांचे प्रत्येकी ५ ते ६ वाण, सोयाबीनचे १५ ते १६ वाण, बाजरी १० वाण, तूर, मूग ३ ते ४ वाण उपलब्ध आहेत.मागील वर्षीच्या तुलनेत यंदा सोयाबीन, बाजरी, तूर, मूग यांच्या दरात प्रति पॅकेट ५० ते १०० रुपयाची तर मका बियाणाच्या प्रति पॅकेट मागे २०० ते ३०० रुपयाची वाढ झाली आहे. तर कपाशीच्या बियाणांवर शासनाने नियंत्रण आणल्याने भाव स्थिर आहेत. मात्र मका बियाणे विक्री करणा-या बहुराष्ट्रीय कंपन्यांनी बियाणे तसेच कीटकनाशके यांचेदर विक्रेत्यांना निश्चित करून दिलेल्या दराच्या खाली विक्रीकेल्यास विक्रीसाठी दिलेले बियाणे उचलून नेऊ, असेकाही दुकानदारांकडून सांगण्यात आले आहे.दुकानदारांना त्याच दरात विक्री करावी लागत असल्याने या कंपन्यांची एक प्रकारची मनमानीच म्हणावी लागेल .असे आहेत प्रति पॅकेटचे दरसोयाबीन ३० किलोच्या बॅगसाठी -१८०० ते १८५०मका ४ किलोच्या पॅकेटसाठी १२०० ते १८००बाजरी दीड किलोच्या पॅकेटसाठी ४५० ते ५३०तूर २ किलोच्या पॅकेटसाठी ३२० ते ३५०मूग १ किलोच्या पॅकेटसाठी १८० ते २२५तंत्र कपाशीचा प्रति ४५० ग्रॅम पॅकेट ७३० रुपये असे दर आहेत.शासनाने कपाशीप्रमाणेच खासगी कंपन्यांच्या मकासह इतर सर्वच बियाणांच्या दरावर नियंत्रण आणावे. त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक होणार नाही. शेतकºयांनी एकाच पिकावर अवलंबून न राहता वेगवेगळी पिके घ्यावी जेणेकरून उत्पादित मालाला चांगला भाव मिळेल. शेतकºयांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा . - आबासाहेब भोकरे, संचालक, अंकुर कृषी सेवा, कोपरगाव.बियाणे कंपन्यांनी त्यांचे दर निश्चित केले हा त्यांचा खासगी विषय आहे. परंतु निश्चित केलेल्या दरापेक्षा जास्त दरात शेतकºयांना बियाणे विक्री केल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल. - पंडित वाघेरे, कृषी अधिकारी, कोपरगाव.

 

यंदा बियाणे, खताचे, मजुरीचे भाव चांगलेच वाढले आहेत. मागील दोन वर्षापासून सततचा दुष्काळ आहे. सध्या पाऊस पडला आहे. परंतु शेती कशी उभी करायची हीच चिंता आहे. आमचे गाव दुष्काळग्रस्त जाहीर झालेले असताना शासनाकडून एका रुपयाचीही देखील अजून मदत मिळाली नाही. -संतोष सीताराम चव्हाण, शेतकरी,धोत्रे, ता.कोपरगाव. 

 

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar collector officeअहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय