शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
2
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
3
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
4
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
5
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
6
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
7
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
8
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
9
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
10
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
11
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
12
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
13
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
14
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
15
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
16
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
17
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
18
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
19
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
20
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू

शिक्षण विभागात पटपडताळणी शिबिरात नियोजनाचा अभाव

By चंद्रकांत शेळके | Updated: June 13, 2023 21:43 IST

शिक्षक भारतीचे शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन

अहमदनगर: दरवर्षी माध्यमिक, उच्च माध्यमिक विद्यार्थी संख्येची पटपडताळणी केली जाते. परंतु यंदाच्या पटपडताळणी शिबिरात शिक्षण विभागात नियोजनाचा अभाव असल्याने शिक्षक, मुख्याध्यापक, प्राचार्यांना त्याचा फटका बसत आहे. त्यामुळे ही पटपडताळणी शिबिरे तालुकास्तरावर आयोजित करावीत, अशी मागणी शिक्षक भारती संघटनेने शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांच्याकडे केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, माध्यमिक, उच्च माध्यमिक विभागाच्या विद्यार्थी संख्येचे पटपडताळणी शिबिर १२ ते १६ जूनदरम्यान जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागात आयोजित केलेले आहे. शिक्षण विभागाचे सहायक उपनिरीक्षक हे शिबिर घेत आहेत. परंतु शिक्षण विभागाच्या नियोजनाच्या अभावामुळे पट पडताळणी शिबिराचा बोजवारा उडाला आहे. मुळात विद्यार्थी संख्येनुसार पटपडताळणी शिबिर हे वर्षाच्या सुरुवातीलाच घेणे गरजेचे आहे.

आता या शिबिरासाठी प्रत्येक तालुक्यातून प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना थेट नगरला शिक्षण विभागात यावे लागत आहे. यात अकोलेसारख्या दीडशे किलोमीटर अंतराहून शिक्षक येत आहेत. परंतु पटपडताळणी करणाऱ्या सहायक उपनिरीक्षकांच्या कार्यालयात शिक्षकांना बसण्यासाठी जागा नाही. त्यांना ताटकळत उभे राहावे लागते.

शिबिरात येणाऱ्या त्रुटी पूर्तता देखील करता येत नाहीत. एका दिवसात तालुक्याची पटपडताळणी होत नसल्याने चकरा माराव्या लागतात. त्यामुळे सर्वांच्या सोयीनुसार ही शिबिरे तालुकास्तरावर घ्यावीत, अशी मागणी संघटनेचे राज्य सचिव सुनील गाडगे, जिल्हाध्यक्ष रामराव काळे, सचिव महेश पाडेकर, सल्लागार कैलास राहणे, जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब जगताप, उपाध्यक्ष सचिन जासूद, कार्याध्यक्ष किशोर डोंगरे, महिला राज्याध्यक्ष रूपाली कुरुमकर, अमोल चंदनशिवे आदींनी केली आहे.

टॅग्स :Studentविद्यार्थीSchoolशाळाAhmednagarअहमदनगर