शहरं
Join us  
Trending Stories
1
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
2
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
3
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
4
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
5
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
6
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
7
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
8
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
9
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
11
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
12
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
13
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
14
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
15
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
16
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
17
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
18
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
19
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
20
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...

देशनिर्माणासाठी श्रम आणि शिस्तीची गरज

By admin | Updated: June 17, 2014 00:37 IST

अहमदनगर : भारतात जनतेने लोकसभा निवडणुकीतून मोठे राजकीय परिवर्तन घडविले आहे. कोणीही एक व्यक्ती, एक पक्ष किंवा आघाडी जटील प्रश्न सोडवेल

अहमदनगर : भारतात जनतेने लोकसभा निवडणुकीतून मोठे राजकीय परिवर्तन घडविले आहे. कोणीही एक व्यक्ती, एक पक्ष किंवा आघाडी जटील प्रश्न सोडवेल, असे समजून निष्क्रिय होणे जनतेला परवडणारे नाही. त्यामुळे सामुदायिक श्रम, शिस्तीचा अवलंब करूनच भारताला महासत्ता बनवावे लागेल, असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केले. ज्येष्ठ समाजसेवक हजारे यांचा स्नेहालयातर्फे हिंमतग्राम येथील प्रकल्पात रविवारी ७६ वा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी ‘भारतनिर्माणाच्या नव्या प्रेरणा’ या विषयावर हजारे बोलत होते. या कार्यक्रमास जिल्हाधिकारी अनिल कवडे, सुमन त्रिभुवन, बाबुशेठ भंडारी, मिलिंद कुलकर्णी, संतोष होनकरपे आदी उपस्थित होते.हजारे म्हणाले, देशातील तरुणाईने मागील तीन वर्षांपासून भ्रष्टाचार, राजकारणाचे गुन्हेगारीकरण आणि राजकीय अराजकांविरुद्ध संघटित आंदोलन केले. यावेळी युवकांना संघटित करण्यात सामाजिक माध्यमांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. देशातील नव्या राज्यकर्त्यांकडून युवकांना खूप अपेक्षा आहेत. त्यांची अपेक्षापूर्ती शासनकर्त्याकडून झाली नाही तर संघटित युवा शक्ती कोणालाही माफ करणार नाही. तथापि कोणीही मसिहा आपले प्रश्न सोडवेल, असे म्हणणे आत्मघात ठरेल. जनमताचा संघटित आणि सक्रिय दबाव कायम राहिला पाहिजे. तरच राजकीय व्यवस्था आणि राज्यकर्ते जबाबदारीने काम करतात.हजारे यांच्या वाढदिवसानिमित्त स्नेहालयातर्फे एक हजार वृक्षांचे रोपण, दोनशे जणांचे रक्तदान, ग्रामसफाई आदी कार्यक्रम झाले.अण्णांसोबत भ्रष्टाचारविरोधी लढ्यात कार्यरत असलेल्या जळगाव येथील नरेंद्र अण्णा पाटील आणि अमरावती येथील अविनाश जुनघरे यांचा अण्णांनी भारतसेवक पुरस्काराने सन्मान केला. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेला ऋषिकेश पत्की,डॉ. संदीप साठे,डॉ. गणेश पोटे, रोहित जोशी, योगेश उंडे यांचा सत्कार करण्यात आला. प्रतिकूल परिस्थितीत बारावी उत्तीर्ण झालेल्या १२ विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यानिमित्त झालेल्या श्रमसंस्कार शिबिरात ५५ युवकांनी सहभाग घेतला. पुणे येथील रोटरी क्लब आॅफ प्राईमसिटी यांनी एचआयव्ही बाधित रुग्णांसाठी ३ लाख रुपये किमतीची रुग्णवाहिका स्नेहालयाला भेट दिली.