शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

अकोलेतील कुमशेत समस्यांच्या गर्तेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:16 IST

राजूर : कोरोनाला आपल्या गावापासून कोसो दूर ठेवत ४५ वर्षांपुढील ७० टक्के नागरिकांचे लसीकरण करून घेतलेल्या आणि जलक्रांती घडवत ...

राजूर : कोरोनाला आपल्या गावापासून कोसो दूर ठेवत ४५ वर्षांपुढील ७० टक्के नागरिकांचे लसीकरण करून घेतलेल्या आणि जलक्रांती घडवत जलयुक्त पुरस्कारप्राप्त म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अकोले तालुक्यातील आदिवासी भागातील कुमशेत हे गाव सध्या रस्ते, आरोग्य, वीज, रोजगार, बंद झालेली एसटी बस, वैयक्तिक वनहक्क दावे रखडले आहेत.

अहमदनगर जिल्ह्याच्या आणि तालुक्याच्या नैऋत्य सरहद्दीवर सह्याद्रीच्या डोंगररांगांच्या कुशीत वसलेले अतिदुर्गम भागातील कुमशेत. या गावी कृषी विभागाने नऊ आणि वनविभागाने दोन असे एकूण अकरा कोल्हापूर पद्धतीचे बंधारे बांधले. पावसाळ्यात ओसंडून वाहणाऱ्या या बंधाऱ्यांनी या खेड्यात जलक्रांती केली, असे असतानाही अनेक मूलभूत सुविधांच्या विळख्यात हे खेडेगाव सापडलेले दिसून येत आहे.

आदिवासी समाजाचे श्रद्धास्थान असणारे धारेराव देवस्थान याच ठिकाणी. या मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावरील पुलास मागील दोन-तीन वर्षांपूर्वी मंजुरी मिळाली, पुलाचे कामही सुरू झाले; मात्र ठेकेदाराने अर्धवट काम करून धूम ठोकली, ते आजतागायत तसेच आहे. अनेक भाविकांना आणि या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना पावसाळ्यात ये-जा करताना मोठ्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे.

या गावी जाणाऱ्या रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. रस्त्यावर पडलेले मोठमोठे खड्डे, त्यावरील उघडी पडलेली खडी या सर्व बाबींचा या गावी व वाड्यावस्त्यांना जाणाऱ्या लोकांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे.

यामुळे गावी येणारी कुमशेत आणि दुसरी आंबित बस सध्या बंदच आहे. रस्त्यावरील जायनावाडी ते कुमशेत हा रस्ता मुख्यमंत्री सडक योजनेतून दोन वर्षांपूर्वी मंजूर झाला; मात्र त्याचे काम सुरू होण्यास अद्यापही मुहूर्त सापडला नाही.

कोरोना सुरू झाल्यापासून येथील अनेक तरुणांच्या आणि इतरांच्या हाताला काम मिळत नाही. त्यामुळे रोजगाराच्या समस्या येथे भेडसावत आहेत. पावसाळ्यात येथील वीजपुरवठा सातत्याने खंडित होत असतो आणि नागरिकांना अंधारात रात्र काढावी लागत आहे.

गावापासून सुमारे वीस किलोमीटर अंतरावर असणाऱ्या शिरपुंजे येथे प्राथमिक आरोग्य केंद्राचे उपकेंद्र आहे तर त्यापुढे मोठ्या अंतरावर प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. जवळपास उपकेंद्र नसल्याने अनेक रुग्ण दवाखान्यात जाण्याचे टाळताना दिसून येतात. यावर उपाय म्हणून येथे एक आरोग्य केंद्राचे उपकेंद्र सुरू करण्याची या गावाची मागणी तशी जुनीच आहे. तर १९९८ मध्ये झालेली नळपाणी पुरवठा योजना मोडकळीस आल्यामुळे अनेक वेळा महिलांना डोक्यावर हंडा घ्यावा लागत आहे.

..............

बंधाऱ्यामुळे जलक्रांती

गाव शिवारात कृषी आणि वनविभागाने बांधलेल्या बंधाऱ्यांमुळे जलक्रांती झाली. भर उन्हाळ्यात या बंधाऱ्यांत पाणी असते. मात्र, नळपाणी पुरवठा योजना कायम सतावत असल्याने महिलांच्या डोक्यावरील हंडा कायम आहे. जलजीवन मिशनचा प्रस्ताव दोन वर्षांपूर्वी केला; मात्र तो अद्याप लालफितीत अडकला आहे. वनहक्क दावे, रस्ता आणि पूल दुरुस्तीसाठी हेलपाटे मारूनही मार्ग निघत नाही.

..........

सामाजिक बांधिलकी जपत कोरोनाला दूर ठेवले आहे. त्यातच आदिवासी भागात लसीकरणाबाबत समज-गैरसमज निर्माण होत असतानाही ४५वर्षांपुढील नागरिकांचे प्रबोधन करत सत्तर टक्के लोकांचे लसीकरण पूर्ण केले. आता तरुणाईचे लसीकरण करून घेणार आहे. शासनाने लक्ष घालून आमच्या समस्या सोडवाव्यात, अशी आमची इच्छा आहे.

- सयाजी असवले, सरपंच, कुमशेत.

फोेटो आहे...