शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

नगर जिल्ह्यातील कारागृह बनलेत कोंडवाडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2020 15:42 IST

कर्जत येथील उपकारागृहाचे छत्र कापून तीन दिवसांपूर्वी पाच आरोपी फरार झाले. या घटनेची प्रशासनाने गंभीर दखल घेतली असून, जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यातील उपकारागृहांच्या सुरक्षेचा आढावा घेण्याचे आदेश दिले आहेत. प्रत्यक्षात मात्र जिल्ह्यातील सर्वच उपकारागृहांची दयनीय अवस्था आहे. 

अरुण वाघमोडे । अहमदनगर : कर्जत येथील उपकारागृहाचे छत्र कापून तीन दिवसांपूर्वी पाच आरोपी फरार झाले. या घटनेची प्रशासनाने गंभीर दखल घेतली असून, जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यातील उपकारागृहांच्या सुरक्षेचा आढावा घेण्याचे आदेश दिले आहेत. प्रत्यक्षात मात्र जिल्ह्यातील सर्वच उपकारागृहांची दयनीय अवस्था आहे. उखनलेल्या भिंती, मोडकळीस आलेल्या खिडक्या आणि तुटलेले कौलारु अशा अवस्थेत उभ्या असलेल्या या कारागृहात आरोपी कसे कैद राहणार? असा प्रश्न आहे. नगर शहरात एक जिल्हा कारागृह तर तालुकास्तरावर बारा उपकारागृह आहेत. बहुतांशी उपकारागृहांच्या इमारती या इंग्रजांच्या काळातील आहेत. त्यामुळे या ठिकाणी कैदी ठेवणे योग्य नाही़ नगर येथील कारागृहाची क्षमता ६३ कैद्यांची आहे़. या कारागृहात मात्र नेहमीच तीन ते चार पट जास्त कैदी ठेवले जातात. सध्या या ठिकाणी १६८ कैदी आहेत. येथे जागा उपलब्ध होत नसल्याने गंभीर गुन्ह्यातील आरोपींना तालुकास्तरावरील जुनाट झालेल्या कारागृहात ठेवले जात आहे. आरोपी येथून पळून जाण्याचा प्रयत्न करतात. वर्षभरापूर्वी  कोपरगाव येथील उपकारागृहातील सतरा कैद्यांनी बराकीत सुरंग खोदून पळून जाण्याचा प्रयत्न केल होता. जिल्हा कारागृह तुरुंग प्रशासनाच्या अंतर्गत येते तर इतर बारा उपरागृह हे महसूल प्रशासनाच्या अंतर्गत येतात. या इमारतींची डागडुजीची जबाबदारी महसूल प्रशासनाची आहे तर येथील सुरक्षेची जबाबदारी ही पोलीस प्रशासनाची आहे. राज्यात नगर जिल्ह्यात सर्वाधिक बारा उपकारागृह आहेत. जिल्ह्यातील पारनेर, कर्जत, नेवासे, शेवगाव, पाथर्डी, कोपरगाव, जामखेड, राहुरी, श्रीरामपूर, श्रीगोंदे, अकोले, संगमनेर येथे असलेल्या या दुय्यम कारागृहांची क्षमता ४० ते ५० कैदी ठेवण्याची आहे. प्रत्यक्षात मात्र येथे क्षमतेपेक्षा जास्त कैदी ठेवले जातात. नवीन कारागृहाचा प्रस्तावच अजून गेला नाही नगर तालुक्यातील नारायणडोह येथील ११ एकर जागेवर ५०० कैद्यांची क्षमता असलेले नवीन वर्ग १ चे कारागृह प्रस्तावित आहे. या कारागृहाचा नकाशा आणि आराखडा तयार करण्याचे काम येथील बांधकाम विभागाकडे गेल. अनेक वर्षे प्रलंबित आहे. त्यामुळे नवीन कारागृहासाठी अजून शासनाकडे प्रस्तावच पाठविण्यात आलेला नसल्याचे वास्तव समोर आले आहे.

 कर्जत येथील कोठडीतून पळून गेलेल्या आरोपींचा शोध सुरू आहे. तसेच जिल्ह्यातील इतर उपकारागृहांच्या सुरक्षेबाबत आढावा घेण्याचे आदेश महसूल प्रशासनाला जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत. पोलीस प्रशासनाच्या दृष्टिनेही येणा-या काळात योग्य ती दक्षता घेतली जाईल, असे प्रभारी पोलीस अधीक्षक डॉ.सागर पाटील यांनी सांगितले.      

टॅग्स :AhmednagarअहमदनगरKarjatकर्जतCrime Newsगुन्हेगारी