शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

शेतकऱ्यांच्या शेतीमाल वाहतुकीसाठी किसान रेल सुरू करणार : खा.डॉ.सुजय विखे पाटील

By सुदाम देशमुख | Updated: April 15, 2023 18:11 IST

अहमदनगर कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक निवडणुकी निमित्त आज नगरला कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. 

अहमदनगर : शेतकऱ्यांच्या शेतीमाल बाजारपेठेत नेण्यासाठी अहमदनगर येथून किसान रेल सुरू करणार असल्याचे आश्वासन खा.डॉ.सुजय विखे पाटील यांनी दिले.  या करिता रेल्वेमंत्री यांची भेट घेऊन त्यासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचे विखे यांनी  यावेळी सांगितले. अहमदनगर कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक निवडणुकी निमित्त आज नगरला कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. 

 यावेळी मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री बबनराव पाचपुते हे होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून जिल्हा  सहकारी बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले, अक्षय कर्डिले हे उपस्थिती होते.

यावेळी विखे म्हणाले की, आपल्या कडील शेतकऱ्याचा शेतीमालाची वाहतूक ही गाडीने होते त्याकरिता खर्च हा जास्त लागतं असून हा खर्च कमी केला तर शेतकऱ्याला फायदा होईल, त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या किसन रेल्वेने आपल्या भागातील शेतकऱ्यांचा शेतीमाल हा पाठविण्यासाठी किसन रेल्वे ही अहमदनगर येथे सुरू करण्याची मागणी केली असून लवकरच ही किसन रेल्वे आपल्याकडे सुरू होईल असे त्यांनी सांगितले. उत्पादन खर्च कमी करून शेतकऱ्यास अधिकचा नफा कसा करून देता येईल याकरिता आमचा प्रयत्न राहणार असल्याचे सांगताना खा.विखे यांनी शेतकऱ्यांना पायाभूत सुविधा ह्या उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

 याचाच एक भाग म्हणून बाजार समितीसाठी स्वतंत्र रस्ता मंजूर करून या करिता अडीच कोटी निधी हा उपलब्ध करून देण्यात आला आहे. या रस्त्याचे काम सुरू देखील झाले आहे. कांद्याचे अनुदान काही अटी - शर्ती मुळे मिळण्यास अडचण येत असल्याच्या तक्रारी होत्या. त्यावर या आठवड्यात शासन योग्य निर्णय घेणार असून याची लवकरच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे घोषणा करणार असल्याचे यावेळी सांगितले.    विरोधकांचा समाचार घेताना सुजय विखे म्हणाले की, विरोधकांकडे कुठलेही विकास कामाबाबत दिशा नाही की त्यांच्याकडे वैचारिक पात्रता. केवळ विरोध करायचा म्हणून ते बाजार समिती निवडणुकीत  धादांत खोटे आरोप करत आहेत. अशा आरोपांना आपण भीक घालत नाहीत, आपले नाणे खणखणीत आहे त्यामुळे आपण कोणाचाही विचार करत नाहीत. विखे पाटील घराण्यांनी आजवर गोरगरीब जनतेसाठी काम केले आहे आणि तोच वारसा आपणही पुढे चालवत असून आमच्या वर कुठलाही डाग नाही हाच पोटशूळ विरोधकांना सतावत असतो म्हणुच ते आमच्यावर टीका करतात. आपली या जनतेशी बांधिलकी असून कायम यांच्या उध्दारा करिता काम करू अशी ग्वाही याप्रसंगी त्यांनी उपस्थित मतदारांना दिली.     याप्रसंगी माजी मंत्री बबनराव पाचपुते, शिवाजीराव कर्डिले यांनी उपस्थित कार्यकर्त्यांनी मार्गदर्शन केले तर  दादाराव चितळकर,अरुण होळकर, दिलीप भालसिंग या माजी संचालकांनी आपले मनोगत व्यक्त केले. या मेळाव्यासाठी भाजप तालुका अध्यक्ष मनोज कोकाटे, अशोकराव झेरेकर, केशवराव अडसूरे, यांच्या सह सर्व ग्रामपंचायत सदस्य, सेवा सोसायटीचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.