शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

शेतकऱ्यांच्या शेतीमाल वाहतुकीसाठी किसान रेल सुरू करणार : खा.डॉ.सुजय विखे पाटील

By सुदाम देशमुख | Updated: April 15, 2023 18:11 IST

अहमदनगर कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक निवडणुकी निमित्त आज नगरला कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. 

अहमदनगर : शेतकऱ्यांच्या शेतीमाल बाजारपेठेत नेण्यासाठी अहमदनगर येथून किसान रेल सुरू करणार असल्याचे आश्वासन खा.डॉ.सुजय विखे पाटील यांनी दिले.  या करिता रेल्वेमंत्री यांची भेट घेऊन त्यासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचे विखे यांनी  यावेळी सांगितले. अहमदनगर कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक निवडणुकी निमित्त आज नगरला कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. 

 यावेळी मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री बबनराव पाचपुते हे होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून जिल्हा  सहकारी बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले, अक्षय कर्डिले हे उपस्थिती होते.

यावेळी विखे म्हणाले की, आपल्या कडील शेतकऱ्याचा शेतीमालाची वाहतूक ही गाडीने होते त्याकरिता खर्च हा जास्त लागतं असून हा खर्च कमी केला तर शेतकऱ्याला फायदा होईल, त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या किसन रेल्वेने आपल्या भागातील शेतकऱ्यांचा शेतीमाल हा पाठविण्यासाठी किसन रेल्वे ही अहमदनगर येथे सुरू करण्याची मागणी केली असून लवकरच ही किसन रेल्वे आपल्याकडे सुरू होईल असे त्यांनी सांगितले. उत्पादन खर्च कमी करून शेतकऱ्यास अधिकचा नफा कसा करून देता येईल याकरिता आमचा प्रयत्न राहणार असल्याचे सांगताना खा.विखे यांनी शेतकऱ्यांना पायाभूत सुविधा ह्या उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

 याचाच एक भाग म्हणून बाजार समितीसाठी स्वतंत्र रस्ता मंजूर करून या करिता अडीच कोटी निधी हा उपलब्ध करून देण्यात आला आहे. या रस्त्याचे काम सुरू देखील झाले आहे. कांद्याचे अनुदान काही अटी - शर्ती मुळे मिळण्यास अडचण येत असल्याच्या तक्रारी होत्या. त्यावर या आठवड्यात शासन योग्य निर्णय घेणार असून याची लवकरच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे घोषणा करणार असल्याचे यावेळी सांगितले.    विरोधकांचा समाचार घेताना सुजय विखे म्हणाले की, विरोधकांकडे कुठलेही विकास कामाबाबत दिशा नाही की त्यांच्याकडे वैचारिक पात्रता. केवळ विरोध करायचा म्हणून ते बाजार समिती निवडणुकीत  धादांत खोटे आरोप करत आहेत. अशा आरोपांना आपण भीक घालत नाहीत, आपले नाणे खणखणीत आहे त्यामुळे आपण कोणाचाही विचार करत नाहीत. विखे पाटील घराण्यांनी आजवर गोरगरीब जनतेसाठी काम केले आहे आणि तोच वारसा आपणही पुढे चालवत असून आमच्या वर कुठलाही डाग नाही हाच पोटशूळ विरोधकांना सतावत असतो म्हणुच ते आमच्यावर टीका करतात. आपली या जनतेशी बांधिलकी असून कायम यांच्या उध्दारा करिता काम करू अशी ग्वाही याप्रसंगी त्यांनी उपस्थित मतदारांना दिली.     याप्रसंगी माजी मंत्री बबनराव पाचपुते, शिवाजीराव कर्डिले यांनी उपस्थित कार्यकर्त्यांनी मार्गदर्शन केले तर  दादाराव चितळकर,अरुण होळकर, दिलीप भालसिंग या माजी संचालकांनी आपले मनोगत व्यक्त केले. या मेळाव्यासाठी भाजप तालुका अध्यक्ष मनोज कोकाटे, अशोकराव झेरेकर, केशवराव अडसूरे, यांच्या सह सर्व ग्रामपंचायत सदस्य, सेवा सोसायटीचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.