शहरं
Join us  
Trending Stories
1
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
2
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
3
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
4
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
5
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
6
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार
7
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 'रेल्वेला कवच'; आमला-परासिया मार्गावर झाली ट्रायल
8
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
9
"मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला, अब तेरा क्या होगा मुरली ?’’ सुषमा अंधारेंचा खोचक टोला  
10
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
11
दिवाळी-छठपूजा उत्सवासाठी नागपूरहून पुणे, मुंबईकरिता स्पेशल ट्रेन, मध्य रेल्वेचा निर्णय, सोमवारी महाराष्ट्रात एकाच दिवशी २३ स्पेशल ट्रेन
12
कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा
13
Phaltan Doctor Death: पंढरपुरातून पळाला, बीडमध्ये गेला अन्...; 48 तासात PSI गोपाळ बदने कुठे कुठे लपला?
14
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर 'निवृत्ती'? 'सिडनीला शेवटचा निरोप...'! भारतात  परतण्यापूर्वीच रोहित शर्माची भावनिक पोस्ट
15
"सत्तेत आलो तर आम्ही वक्फ कायदा कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ..."; तेजस्वी यादव यांचे जाहीर सभेत आश्वासन
16
नशेमुळे झाला कुर्नूल बस अपघात; चूक कुणाची? बाइकस्वारांची की बस ड्रायव्हरची? खुद्द डीआयजींनीच केला खुलासा
17
पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल, अंत्यसंस्कारही झाले, चूक कोणाची? समोर आली धक्कादायक माहिती
18
'मला थोडीशी शंका असती तरी कार्यक्रमाला आलो नसतो'; फडणवीसांनी रणजितसिंह निंबाळकरांना जाहीर सभेत स्पष्टच सांगितले
19
आंध्र प्रदेशातील बस अपघातातील चालकाला अटक, आग लागल्यानंतर प्रवाशांना सोडून पळून गेला होता
20
पॅरिसमधील संग्रहालयात ‘धूम’स्टाईल चोरी, मौल्यवान रत्ने लांबवली, अखेर असे सापडले चोर  

डल्ला मारणा-यांना हल्लाबोलचा अधिकार नाही -भानुदास बेरड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2018 15:23 IST

आघाडीच्या काळात पाटबांधारे, वीज, टँकर घोटाळा करुन सरकारच्या तिजोरीवर डल्ला मारणारे आता हल्लाबोलची भाषा करत आहेत़ त्यांनी जनावरांचा चारासुद्धा सोडला नाही. त्यामुळे जनता त्यांना रस्त्यावरच धडा शिकवेल, अशी टीका भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रा. भानुदास बेरड यांनी हल्लाबोल आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केली.

अहमदनगर : आघाडीच्या काळात पाटबांधारे, वीज, टँकर घोटाळा करुन सरकारच्या तिजोरीवर डल्ला मारणारे आता हल्लाबोलची भाषा करत आहेत. त्यांनी जनावरांचा चारासुद्धा सोडला नाही. त्यामुळे जनता त्यांना रस्त्यावरच धडा शिकवेल, अशी टीका भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रा. भानुदास बेरड यांनी हल्लाबोल आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केली.नगर जिल्ह्यातील सन २०१२-१३ व २०१३-१४ या काळातील ४२६ छावण्यातील जनावरांचा चारा घोटाळा उघड झाल्याने राष्ट्रवादीचे दाखवायचे दात वेगळे अन् खायचे दात वेगळे हे जनते समोर आले आहे. भ्रष्टाचाराचा आरोप असलेल्यांनी जनतेला नैतिकता शिकविण्याची गरज नाही. सरकारच्या काळात केलेले घोटाळे पुन्हा बाहेर येऊ नये म्हणून आंदोलनाचे हत्यार वापरुन रस्त्यावर उतरण्याची भाषा सुरु केली आहे. आघाडी सरकारच्या काळामध्ये काँग्रेस अंतर्गत संघर्ष याच जनतेने पाहिला आहे. सर्वसामान्यांना वेठिस धरण्याचे काम यांच्याच काळात झालेली आहे. टँकरमुक्त घोषणा हवेत विरली. उलट पक्षी अनेक ठिकाणी, टँकर घोटाळे बाहेर आले. २०१२-१३ व २०१३-१४ साली यांनीच जनावरांच्या छावण्या वाटल्या. पण चारा घोटाळा उघड झाल्यावर यामध्ये कशा प्रकारे भ्रष्टाचार झाला, हे जनतेसमोर आले आहे. यांच्याच काळात ‘लुना’ दुचाकीवर पंधरा टन चारा आणल्याची उदाहरणे आजही शासकीय रेकॉर्डवर उपलब्ध आहेत. यांनी जित्रांबांचा चारा सुद्धा सोडला नाही. जनसामान्यांचा कळवळा घेऊन आम्हीच त्यांचे कैवारी आहोत, असा केविलवाणा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेसने सुरु केला आहे. विदर्भात हल्लाबोल आंदोलनास सुरुवात झाली. तिथे प्रतिसाद कमी मिळाल्यामुळे आता महाराष्ट्रभर आंदोलन करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. भ्रष्टाचारमुक्त पारदर्शी शासनामुळे अन् व्हिआयपी संस्कृतीला फाटा देत सामान्य घटकांना थेट लाभ देणारे सरकार जनतेला आपलेसे वाटत आहे. त्यामुळे विरोधकांना कुठलेच मुद्दे सरकार विरोधात शिल्लक राहिले नसल्यामुळेच हल्लाबोलची नौटंकी सुरु केल्याचा आरोप बेरड यांनी केला.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरBJPभाजपा