शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
2
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
3
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
4
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ
5
४२,८९२ कोटींची गुंतवणूक, २५,८९२ रोजगाराची निर्मिती; १० गुंतवणूक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी
6
ऑनलाइन गेमिंगला बसणार चाप! विधेयकाला केंद्राची मंजुरी; पैसे ट्रान्सफर करण्यास बँकांना मनाई
7
‘लोकमत’कडून नमामी गंगे प्रकल्पासाठी ५७.५० लाखांचा निधी; देवेंद्र दर्डा यांनी दिला धनादेश
8
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
9
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
10
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
11
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
12
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
13
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
14
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
15
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
16
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
17
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
18
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
19
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
20
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?

डल्ला मारणा-यांना हल्लाबोलचा अधिकार नाही -भानुदास बेरड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2018 15:23 IST

आघाडीच्या काळात पाटबांधारे, वीज, टँकर घोटाळा करुन सरकारच्या तिजोरीवर डल्ला मारणारे आता हल्लाबोलची भाषा करत आहेत़ त्यांनी जनावरांचा चारासुद्धा सोडला नाही. त्यामुळे जनता त्यांना रस्त्यावरच धडा शिकवेल, अशी टीका भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रा. भानुदास बेरड यांनी हल्लाबोल आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केली.

अहमदनगर : आघाडीच्या काळात पाटबांधारे, वीज, टँकर घोटाळा करुन सरकारच्या तिजोरीवर डल्ला मारणारे आता हल्लाबोलची भाषा करत आहेत. त्यांनी जनावरांचा चारासुद्धा सोडला नाही. त्यामुळे जनता त्यांना रस्त्यावरच धडा शिकवेल, अशी टीका भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रा. भानुदास बेरड यांनी हल्लाबोल आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केली.नगर जिल्ह्यातील सन २०१२-१३ व २०१३-१४ या काळातील ४२६ छावण्यातील जनावरांचा चारा घोटाळा उघड झाल्याने राष्ट्रवादीचे दाखवायचे दात वेगळे अन् खायचे दात वेगळे हे जनते समोर आले आहे. भ्रष्टाचाराचा आरोप असलेल्यांनी जनतेला नैतिकता शिकविण्याची गरज नाही. सरकारच्या काळात केलेले घोटाळे पुन्हा बाहेर येऊ नये म्हणून आंदोलनाचे हत्यार वापरुन रस्त्यावर उतरण्याची भाषा सुरु केली आहे. आघाडी सरकारच्या काळामध्ये काँग्रेस अंतर्गत संघर्ष याच जनतेने पाहिला आहे. सर्वसामान्यांना वेठिस धरण्याचे काम यांच्याच काळात झालेली आहे. टँकरमुक्त घोषणा हवेत विरली. उलट पक्षी अनेक ठिकाणी, टँकर घोटाळे बाहेर आले. २०१२-१३ व २०१३-१४ साली यांनीच जनावरांच्या छावण्या वाटल्या. पण चारा घोटाळा उघड झाल्यावर यामध्ये कशा प्रकारे भ्रष्टाचार झाला, हे जनतेसमोर आले आहे. यांच्याच काळात ‘लुना’ दुचाकीवर पंधरा टन चारा आणल्याची उदाहरणे आजही शासकीय रेकॉर्डवर उपलब्ध आहेत. यांनी जित्रांबांचा चारा सुद्धा सोडला नाही. जनसामान्यांचा कळवळा घेऊन आम्हीच त्यांचे कैवारी आहोत, असा केविलवाणा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेसने सुरु केला आहे. विदर्भात हल्लाबोल आंदोलनास सुरुवात झाली. तिथे प्रतिसाद कमी मिळाल्यामुळे आता महाराष्ट्रभर आंदोलन करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. भ्रष्टाचारमुक्त पारदर्शी शासनामुळे अन् व्हिआयपी संस्कृतीला फाटा देत सामान्य घटकांना थेट लाभ देणारे सरकार जनतेला आपलेसे वाटत आहे. त्यामुळे विरोधकांना कुठलेच मुद्दे सरकार विरोधात शिल्लक राहिले नसल्यामुळेच हल्लाबोलची नौटंकी सुरु केल्याचा आरोप बेरड यांनी केला.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरBJPभाजपा