शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

डल्ला मारणा-यांना हल्लाबोलचा अधिकार नाही -भानुदास बेरड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2018 15:23 IST

आघाडीच्या काळात पाटबांधारे, वीज, टँकर घोटाळा करुन सरकारच्या तिजोरीवर डल्ला मारणारे आता हल्लाबोलची भाषा करत आहेत़ त्यांनी जनावरांचा चारासुद्धा सोडला नाही. त्यामुळे जनता त्यांना रस्त्यावरच धडा शिकवेल, अशी टीका भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रा. भानुदास बेरड यांनी हल्लाबोल आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केली.

अहमदनगर : आघाडीच्या काळात पाटबांधारे, वीज, टँकर घोटाळा करुन सरकारच्या तिजोरीवर डल्ला मारणारे आता हल्लाबोलची भाषा करत आहेत. त्यांनी जनावरांचा चारासुद्धा सोडला नाही. त्यामुळे जनता त्यांना रस्त्यावरच धडा शिकवेल, अशी टीका भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रा. भानुदास बेरड यांनी हल्लाबोल आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केली.नगर जिल्ह्यातील सन २०१२-१३ व २०१३-१४ या काळातील ४२६ छावण्यातील जनावरांचा चारा घोटाळा उघड झाल्याने राष्ट्रवादीचे दाखवायचे दात वेगळे अन् खायचे दात वेगळे हे जनते समोर आले आहे. भ्रष्टाचाराचा आरोप असलेल्यांनी जनतेला नैतिकता शिकविण्याची गरज नाही. सरकारच्या काळात केलेले घोटाळे पुन्हा बाहेर येऊ नये म्हणून आंदोलनाचे हत्यार वापरुन रस्त्यावर उतरण्याची भाषा सुरु केली आहे. आघाडी सरकारच्या काळामध्ये काँग्रेस अंतर्गत संघर्ष याच जनतेने पाहिला आहे. सर्वसामान्यांना वेठिस धरण्याचे काम यांच्याच काळात झालेली आहे. टँकरमुक्त घोषणा हवेत विरली. उलट पक्षी अनेक ठिकाणी, टँकर घोटाळे बाहेर आले. २०१२-१३ व २०१३-१४ साली यांनीच जनावरांच्या छावण्या वाटल्या. पण चारा घोटाळा उघड झाल्यावर यामध्ये कशा प्रकारे भ्रष्टाचार झाला, हे जनतेसमोर आले आहे. यांच्याच काळात ‘लुना’ दुचाकीवर पंधरा टन चारा आणल्याची उदाहरणे आजही शासकीय रेकॉर्डवर उपलब्ध आहेत. यांनी जित्रांबांचा चारा सुद्धा सोडला नाही. जनसामान्यांचा कळवळा घेऊन आम्हीच त्यांचे कैवारी आहोत, असा केविलवाणा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेसने सुरु केला आहे. विदर्भात हल्लाबोल आंदोलनास सुरुवात झाली. तिथे प्रतिसाद कमी मिळाल्यामुळे आता महाराष्ट्रभर आंदोलन करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. भ्रष्टाचारमुक्त पारदर्शी शासनामुळे अन् व्हिआयपी संस्कृतीला फाटा देत सामान्य घटकांना थेट लाभ देणारे सरकार जनतेला आपलेसे वाटत आहे. त्यामुळे विरोधकांना कुठलेच मुद्दे सरकार विरोधात शिल्लक राहिले नसल्यामुळेच हल्लाबोलची नौटंकी सुरु केल्याचा आरोप बेरड यांनी केला.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरBJPभाजपा