शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

खरिपात शेतकºयांची कपाशी, बाजरीलाच पसंती; तूर, मूग, सोयाबीनचा पेरा वाढला, मकाचे क्षेत्रही वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2020 13:18 IST

अहमदनगर : रोहिणी, मृग, आर्द्रा नक्षत्र जिल्हाभर बरसल्याने यंदा खरीप हंगामात कृषी विभागाने ठेवलेल्या उद्दिष्टाहून अधिक म्हणजेच ११४ टक्के पेरणी जूनमध्येच झाली. शेतकºयांची यंदाही कपाशी, बाजरीलाच पसंती राहिली तर तूर, मूग, सोयाबीनच्या पेºयातही मोठी वाढ झाली.

गोरख देवकर

अहमदनगर : रोहिणी, मृग, आर्द्रा नक्षत्र जिल्हाभर बरसल्याने यंदा खरीप हंगामात कृषी विभागाने ठेवलेल्या उद्दिष्टाहून अधिक म्हणजेच ११४ टक्के पेरणी जूनमध्येच झाली. शेतकºयांची यंदाही कपाशी, बाजरीलाच पसंती राहिली तर तूर, मूग, सोयाबीनच्या पेºयातही मोठी वाढ झाली.

मे महिन्याच्या अखेरच्या आठवड्यातच यंदा मान्सूनपूर्व (रोहिणी नक्षत्र) पाऊस जोरदार बरसला. हा पाऊस जिल्ह्यातील सर्वच भागात झाला. त्यामुळे मशागती करून ठेवलेल्या शेतकºयांनी जून महिन्याच्या सुरुवातीलाच खरीप हंगामातील पिकांची पेरणी केली. त्यानंतर काही ठिकाणी बाजरी, सोयाबीनचा अपवाद वगळता इतर खरीप पिकांची उगवण चांगली झाली. रोहिणीपाठोपाठ मृग, आर्द्रा नक्षत्रही चांगले बरसले. सध्या गावोगाव पिकांच्या आंतरमशागतीची कामे सुरू आहेत. 

यंदा कृषी विभागाने खरीप हंगामात उसाशिवाय ४ लाख ४७ हजार ९०४ हेक्टर क्षेत्राचे उद्दिष्ट ठेवले होते. ते पूर्ण होऊन ५ लाख १४ हजार ५९० हेक्टर क्षेत्रावर जूनमध्येच खरिपाची पेरणी पूर्ण  झाली. सरासरीच्या ११४ टक्के पेरणी झाली. यात सर्वाधिक क्षेत्रावर १ लाख ११ हजार २ हेक्टरवर बाजरीची पेरणी झाली आहे. पारनेर, संगमनेर, पाथर्डी तालुक्यात बाजरीचा पेरा मोठ्या प्रमाणावर आहे. त्यापाठोपाठ १ लाख १० हजार ९३३ हेक्टरवर कपाशीची लागवड झाली. शेवगाव, पाथर्डी, नेवासा तालुक्यातच कपाशी लागवड अधिक आहे.

मुगाची ५१ हजार ५२५ हेक्टरवर पेरणी झाली असून पारनेर, नगर तालुक्यात सर्वाधिक पेरा आहे. शेतकºयांनी सोयाबीनची ६८ हजार ५७८ हेक्टरवर पेरणी केली आहे. त्याला कोपरगाव, श्रीरामपूर, राहाता तालुक्यातील शेतकºयांनी अधिक पसंती दिली आहे. वाटाण्याचा नेहमीप्रमाणे पारनेर तालुक्यातच सर्वाधिक पेरा असून त्याचे क्षेत्र ४ हजार ५५७ हेक्टर आहे.----------------चवळी, हुलग्याची अत्यल्प पेरणीचवळी, हुलग्याची पेरणी अगदीच नगण्य आहे. चवळीची ५७ हेक्टरवर तर हुलग्याची ४३१ हेक्टरवरच पेरणी झाली आहे. मटकीचीही अवघ्या ६५२ हेक्टरवर पेरणी झाली आहे. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरFarmerशेतकरी