शहरं
Join us  
Trending Stories
1
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
2
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
3
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
4
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
5
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
6
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
7
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
8
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
9
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
10
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
11
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
12
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
13
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
14
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
15
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
16
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
17
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
18
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा
19
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
20
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?

सहकारी संस्थांच्या चाव्या मुदत संपलेल्या मंडळाच्याच हाती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:22 IST

लोकमत न्यूज नेटवर्क अहमदनगर : राज्य सरकारने गावपातळीवरील विविध कार्यकारी सोसायट्यांसह सहकारी संस्थांना वेळोवेळी दिलेल्या मुदतवाढीमुळे संचालक मंडळांना दोन ...

लोकमत न्यूज नेटवर्क

अहमदनगर : राज्य सरकारने गावपातळीवरील विविध कार्यकारी सोसायट्यांसह सहकारी संस्थांना वेळोवेळी दिलेल्या मुदतवाढीमुळे संचालक मंडळांना दोन वर्षे जास्तीचा कार्यकाळ मिळाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अडीच हजार विविध कार्यकारी संस्थांसह इतर सहकारी संस्थांचा कारभार विनाप्रशासक सुरू आहे.

कोरोनाचा संसर्ग वाढू नये, यासाठी सरकारने मार्च २०२० पासून निवडणुकांना स्थगिती दिली. ग्रामपंचायतींसह जिल्हा सहकारी बँकांच्या निवडणुकांनंतर कोरोनाच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ झाली हाेती. त्यामुळे सरकारने गावपातळीवरील विकास सोसायट्यांच्या निवडणुकांना परवानगी दिली नाही. जिल्ह्यातील २ हजार ५०० विविध कार्यकारी सोसायट्यांची मुदत संपलेली आहे. मुदत संपल्यानंतर निवडणुका न झाल्यास प्रशासक नेमला जातो. परंतु, विविध कार्यकारी सोसायट्यांवर दोन वर्षे उलटूनही प्रशासक नेमला गेलेला नाही. मुदतवाढ तीन टप्प्यांत मिळाली. कोरोनाची रुग्णसंख्या कमीजास्त होत असल्याने सरकारचाही नाइलाज होता. सरकारच्या या निर्णयामुळे विविध कार्यकारी सोसायट्यांच्या विद्यमान संचालकांना दोन वर्षे वाढीव मिळाले. गावातील आर्थिक कारभारावर दोन वर्षे उलटूनही विद्यमान संचालकांचाच पगडा आहे. विकास सोसायटीची मुदत संपणार असल्याने इच्छुकांनी तयारीही केलेली होती. परंतु, सरकारने मुदतवाढ दिल्याने त्यांचा भ्रमनिरास झाला आहे. कोरोनाची लाट ओसरल्याने सरकारने शाळा व मंदिरे खुले करण्याची घोषणा केली आहे. विविध कार्यकारी संस्थांच्या निवडणुका ज्या टप्प्यावर थांबलेल्या होत्या, त्या टप्प्यापासून सुरू करण्याचा आदेश सहकार खात्याने दिला आहे. परंतु, यामध्ये जिल्ह्यातील दीडशेच विविध कार्यकारी सोसायट्यांचा समावेश आहे. त्यामुळे उर्वरित विविध कार्यकारी संस्थांच्या निवडणुकांचा मुहूर्त कधी काढणार, असा प्रश्न गावोगावच्या कार्यकर्त्यांकडून उपस्थित केला जात आहे.

....

कारभारी खूश, इच्छुक कोमात

गावागावांतील विविध कार्यकारी सोसायट्यांच्या निवडणुका लांबणीवर पडल्या आहेत. सोसायटीचा कारभार हाकण्यासाठी दोन वर्षे वाढीव मिळाले. त्यामुळे संचालक मंडळ खूश आहे. परंतु, निवडणुकीसाठी गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत. परंतु, दोन वर्षे उलटूनही निवडणुका होत नसल्याने इच्छुक गावात फिरकत नसल्याची चर्चा आहे.