शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

सहकारी संस्थांच्या चाव्या मुदत संपलेल्या मंडळाच्याच हाती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:22 IST

लोकमत न्यूज नेटवर्क अहमदनगर : राज्य सरकारने गावपातळीवरील विविध कार्यकारी सोसायट्यांसह सहकारी संस्थांना वेळोवेळी दिलेल्या मुदतवाढीमुळे संचालक मंडळांना दोन ...

लोकमत न्यूज नेटवर्क

अहमदनगर : राज्य सरकारने गावपातळीवरील विविध कार्यकारी सोसायट्यांसह सहकारी संस्थांना वेळोवेळी दिलेल्या मुदतवाढीमुळे संचालक मंडळांना दोन वर्षे जास्तीचा कार्यकाळ मिळाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अडीच हजार विविध कार्यकारी संस्थांसह इतर सहकारी संस्थांचा कारभार विनाप्रशासक सुरू आहे.

कोरोनाचा संसर्ग वाढू नये, यासाठी सरकारने मार्च २०२० पासून निवडणुकांना स्थगिती दिली. ग्रामपंचायतींसह जिल्हा सहकारी बँकांच्या निवडणुकांनंतर कोरोनाच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ झाली हाेती. त्यामुळे सरकारने गावपातळीवरील विकास सोसायट्यांच्या निवडणुकांना परवानगी दिली नाही. जिल्ह्यातील २ हजार ५०० विविध कार्यकारी सोसायट्यांची मुदत संपलेली आहे. मुदत संपल्यानंतर निवडणुका न झाल्यास प्रशासक नेमला जातो. परंतु, विविध कार्यकारी सोसायट्यांवर दोन वर्षे उलटूनही प्रशासक नेमला गेलेला नाही. मुदतवाढ तीन टप्प्यांत मिळाली. कोरोनाची रुग्णसंख्या कमीजास्त होत असल्याने सरकारचाही नाइलाज होता. सरकारच्या या निर्णयामुळे विविध कार्यकारी सोसायट्यांच्या विद्यमान संचालकांना दोन वर्षे वाढीव मिळाले. गावातील आर्थिक कारभारावर दोन वर्षे उलटूनही विद्यमान संचालकांचाच पगडा आहे. विकास सोसायटीची मुदत संपणार असल्याने इच्छुकांनी तयारीही केलेली होती. परंतु, सरकारने मुदतवाढ दिल्याने त्यांचा भ्रमनिरास झाला आहे. कोरोनाची लाट ओसरल्याने सरकारने शाळा व मंदिरे खुले करण्याची घोषणा केली आहे. विविध कार्यकारी संस्थांच्या निवडणुका ज्या टप्प्यावर थांबलेल्या होत्या, त्या टप्प्यापासून सुरू करण्याचा आदेश सहकार खात्याने दिला आहे. परंतु, यामध्ये जिल्ह्यातील दीडशेच विविध कार्यकारी सोसायट्यांचा समावेश आहे. त्यामुळे उर्वरित विविध कार्यकारी संस्थांच्या निवडणुकांचा मुहूर्त कधी काढणार, असा प्रश्न गावोगावच्या कार्यकर्त्यांकडून उपस्थित केला जात आहे.

....

कारभारी खूश, इच्छुक कोमात

गावागावांतील विविध कार्यकारी सोसायट्यांच्या निवडणुका लांबणीवर पडल्या आहेत. सोसायटीचा कारभार हाकण्यासाठी दोन वर्षे वाढीव मिळाले. त्यामुळे संचालक मंडळ खूश आहे. परंतु, निवडणुकीसाठी गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत. परंतु, दोन वर्षे उलटूनही निवडणुका होत नसल्याने इच्छुक गावात फिरकत नसल्याची चर्चा आहे.