शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

कोरेगाव-भिमाची दंगल भाजपमुळेच - कुमार सप्तर्षी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2018 20:00 IST

लोकसभेच्या निवडणुकीत ८० जागा कमी होतील याची भीती भाजप नेत्यांना आल्याने त्यांनी प्रत्येक मतदारसंघात जातीय वाद पेरला असल्याचा आरोप युवक क्रांती दलाचे संस्थापक व ज्येष्ठ विचारवंत डॉ. कुमार सप्तर्षी यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केला.

राशीन (जि. अहमदनगर) : कोरेगाव - भीमाची दंगल ही भाजपनेच घडवून आणली आहे. गुजरातमध्ये झालेल्या निवडणुकीत दलित व मुस्लिम मतदार एक होत असल्याचे भाजपच्या लक्षात आले. त्यामुळे लोकसभेच्या निवडणुकीत ८० जागा कमी होतील याची भीती भाजप नेत्यांना आल्याने त्यांनी प्रत्येक मतदारसंघात जातीय वाद पेरला असल्याचा आरोप युवक क्रांती दलाचे संस्थापक व ज्येष्ठ विचारवंत डॉ. कुमार सप्तर्षी यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केला.खेड (ता.कर्जत) येथील लोकनायक जयप्रकाश नारायण विद्यालयाच्या बक्षीस वितरण समारंभासाठी आले असता डॉ. सप्तर्षी बोलत होते. ते पुढे म्हणाले, गुजरात निवडणुकीत निकाल कमी लागल्याच्या पार्श्वभूमीवर आगामी निवडणुका नजरेसमोर ठेऊन महाराष्ट्रात मराठा, माळी, धनगर व वंजारी या समाजात जातीवादाचे द्वेष पसरविण्याची भाजप खेळी करीत आहे. आघाडी सत्तेच्या काळात माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी केलेला गैरव्यवहार पचविण्यासाठीच भाजपच्या बिळात त्यांनी घुसखोरी केली. ते कसले आले पक्षनिष्ठ? अशी टीका डॉ. सप्तर्षी यांनी करीत ईव्हीएम मशिनमधला घोळ हा ठराविक मतदारसंघातच केला जातो. या कारणामुळे येत्या लोकसभा निवडणुकीत मतपत्रिकांची मागणी जोर धरील, त्यातूनही मोदी सत्तेवर आल्यास हुकूमशहा होतील, असेही ते म्हणाले.राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर निशाणा साधत सप्तर्षी म्हणाले, गुजरात निवडणुकीत त्यांच्या पक्षाची ताकद नसताना उमेदवार उभे करुन महाराष्ट्रातील मित्रपक्ष कॉँग्रेसचा विश्वास त्यांनी कमी केला. राहुल गांधी यांना भाजपच्या अगोदर काँग्रेसवालेच पप्पू म्हणत असल्याची टीका डॉ. सप्तर्षी यांनी काँग्रेस नेत्यांवर केली.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरKumar Saptarshiकुमार सप्तर्षीKarjatकर्जतBhima-koregaonकोरेगाव-भीमा हिंसाचार