शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

राष्ट्रवादीला घरी बसवा-सुजय विखे; शिवाजी कर्डिलेंच्या प्रचारार्थ सभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2019 13:54 IST

गेली दहा वर्षापासून कर्डिले यांनी मतदारसंघात भरीव विकास कामे केली आहेत. विकासासाठी आमदार कर्डिले यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहा. विरोधकांनी अनेक संस्था बंद पाडल्या आहेत. विरोधकांची कामे सर्वांना माहित आहेत, असे प्रतिपादन खासदार सुजय विखे यांनी केले आहे. 

तिसगाव : गेली दहा वर्षापासून कर्डिले यांनी मतदारसंघात भरीव विकास कामे केली आहेत. विकासासाठी आमदार कर्डिले यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहा. विरोधकांनी अनेक संस्था बंद पाडल्या आहेत. विरोधकांची कामे सर्वांना माहित आहेत, असे प्रतिपादन खासदार सुजय विखे यांनी केले आहे. पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथे रविवारी भाजपाचे उमेदवार शिवाजी कर्डिले यांच्या प्रचारार्थ  जाहीर सभा झाली. यावेळी ते बोलत होते. सभेच्या अध्यक्षस्थानी तिसगावचे सरपंच काशिनाथ पाटील लवांडे होते. माजी जिल्हा परिषद सदस्य मोहनराव पालवे, संभाजीराव वाघ, महादेव कुटे पाटील, पृथ्वीराज आठरे, राजेंद्र तागड उपस्थित होते. विखे म्हणाले, राष्ट्रवादीने नेहमीच जिरवा जिरवीचे, गटातटाचे राजकारण केले. राष्ट्रवादीच्या जिल्ह्यातील सर्व उमेदवारांना घरी बसवण्याची जबाबदारी आमच्यावर आहे. सिंचन घोटाळा, बँक घोटाळा करून सर्वसामान्य शेतकºयांच्या पैशावर डल्ला मारणा-या नेत्यांना जेलमध्ये जावेच लागेल.  काशिनाथ लवांडे म्हणाले, राजकारणात कोणी कोणाचा कायमस्वरूपी शत्रू नसतो. तिसगावचा पिण्याच्या पाण्याचा व शेतीच्या पाण्याचा प्रश्न सोडवावा.वृद्धेश्वर देवस्थानचे अध्यक्ष सुधाकर पालवे, माजी सभापती मिर्झा मणियार, शिवसेना नेते रफिक शेख, जिल्हा परिषद सदस्य पुरुषोत्तम आठरे, पंचायत समिती सदस्य सुनील परदेशी, एकनाथ आटकर, माजी सरपंच सुनील साखरे, भाऊसाहेब लोखंडे, विक्रमराव ससाणे, गहिनीनाथ खाडे, अरुण पुंड, उपसरपंच फिरोजभाई पठाण, सिराज पठाण, सरपंच अनिल गीते, अनिल पालवे, शिवसेना शहराध्यक्ष शरद शेंदुरकर, भरत गारुडकर, आबासाहेब काळे, शंकरराव उंडाळे, धीरज मैड, शिवाजी भाकरे, भाऊसाहेब क्षेत्रे, रावसाहेब वांढेकर, राजेंद्र दगडखैर, संतोष शिंदे, बाजीराव वारे, प्रदीप टेमकर, ताराबाई क्षेत्रे, इब्राहीम सय्यद, काकासाहेब लवांडे उपास्थित होते.  तनपुरे यांचे कट्टर समर्थक  राजेंद्र दगडखैर यांनी भाजपात प्रवेश केला.भाजप कामे करतो, नुसते बोलत नाही नरेंद्र मोदी यांनी प्रत्येक शेतक-याला वर्षाला सहा हजार रुपये खात्यावर टाकण्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे पाच वर्षात ७५ हजार कोटी रुपये शेतक-यांना मिळणार आहेत. त्यामुळे शेतक-यांना थेट मानधन देण्याचा नवा संकल्प देशाचे पंतप्रधान मोदी यांनी राबवला म्हणून भाजपाला मत द्या, असे म्हणालो तर बिघडले कुठे? राज्यात पंधरा वर्षे काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता होती. त्यावेळी शेतक-यांसाठी नऊ हजार कोटी रुपये दिले. त्याच्यावरच काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेतेमंडळींनी पंधरा वर्ष मत मागितले. भाजप प्रत्यक्ष मदत करतो. नुसते बोलत नाही, असे विखे म्हणाले. 

टॅग्स :PoliticsराजकारणMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019