शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

बस गायब, प्रवासी फलाटावर!

By admin | Updated: December 17, 2015 23:43 IST

अहमदनगर : पंचवीस टक्के वेतनवाढ व इतर मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले.

अहमदनगर : पंचवीस टक्के वेतनवाढ व इतर मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. इंटकच्या पुढाकाराने झालेल्या या आंदोलनाला मनसे, कास्ट्राईब संघटनांनीही पाठिंबा दिला. संपामुळे स्थानकावरून बस गायब झाल्या. परिणामी प्रवाशांना खासगी वाहनांची मदत घ्यावी लागली. एसटी कर्मचाऱ्यांना २५ टक्के वेतनवाढ द्यावी, राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्यात यावा, यासह इतर मागण्यांसाठी इंटकने राज्यभर संप पुकारला होता. कर्मचाऱ्यांनी आपापल्या आगारात बस बंद ठेवत घोषणाबाजी केली. शासनाने मागण्यांचा विचार केला नाही, तर संप बेमुदत सुरू राहील, असे पदाधिकाऱ्यांनी जाहीर केले. दरम्यान, या संपामुळे प्रवासी वाहतूक पूर्णपणे कोलमडली. शालेय विद्यार्थी तसेच नोकरदार खोळंबून पडले. ग्रामीण भागातील प्रवासी एसटीची वाट पाहत आहे तेथेच राहिले. काहींनी खासगी प्रवासी वाहनांचा आधार घेतला. या सर्व घडामोडींत खासगी वाहतूकदारांनी अव्वाच्या सव्वा भाडे आकारत संधी ‘कॅश’ केली. पारनेर, सुपा, जामखेड, कर्जत तसेच जिल्हाभरातील सर्वच आगारांत संपाचा परिणाम जाणवत होता. जवळपासचे प्रवासी खासगी वाहनांनी जात असले तरी पुणे, मुंबई, नाशिक अशा लांब पल्ल्यांचे प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. तारकपूर आगारात इंटकचे हनिफ शेख, बाळासाहेब पातारे, दिनकर लिपाणे, संजय पाटोळे यांच्यासह अनेक आंदोलकांनी घोषणाबाजी करत बस बाहेर पडू दिल्या नाहीत. बसमध्ये बसलेल्या प्रवाशांना खाली उतरविण्यापर्यंत आंदोलकांची मजल गेली. तारकपूर येथील काही गाड्यांची हवा कर्मचाऱ्यांनी सोडली. (प्रतिनिधी)