शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

जामखेडची जलवाहिनी फुटली : १२ तासानंतर पाणीपुरवठा बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2018 18:16 IST

जामखेड शहराला भुतवडा तलावातून पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी सोमवारी मध्यरात्री फुटली. सकाळी ही बाब लक्षात आल्यानंतर १२ तासानंतर या जलवाहिनीचा व्हॉल्व बंद करण्यात आला. दरम्यानच्या काळात सुमारे १५ लाख लिटर पाणी वाया गेले.

जामखेड : जामखेड शहराला भुतवडा तलावातून पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी सोमवारी मध्यरात्री फुटली. सकाळी ही बाब लक्षात आल्यानंतर १२ तासानंतर या जलवाहिनीचा व्हॉल्व बंद करण्यात आला. दरम्यानच्या काळात सुमारे १५ लाख लिटर पाणी वाया गेले.या तलावापासून पाचशे मीटर अंतरावर एका शेतकऱ्याच्या शेतातून पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी जाते. हा शेतकरी रात्री बाराच्या सुमारास जलवाहिनी जाते, त्याठिकाणी जेसीबी मशिनच्या साह्याने काम करीत होता. जेसीबी चालकाला जलवाहिनीचा अंदाज न आल्याने त्याच्याकडून जलवाहिनीवर जेसीबीचे खोरे पडल्याने ती फुटली. दुरूस्तीचे काम होईपर्यंत जामखेड शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. अगोदरच चार दिवसाआड शहराला पाणी पुरवठा होत असताना जलवाहिनी फुटल्याने आता हे नवे जलसंकट ओढावले आहे.सोमवारी रात्री बाराच्या जलवाहिनी फुटल्याची माहिती पाणी पुरवठा कर्मचाºयांनी उपनगराध्यक्ष महेश निमोणकर यांना दिली. परंतु रात्रीच्या वेळी काहीच काम करता येत नसल्याने तेथे कोणी गेले नाही. मंगळवारी सकाळी महेश निमोणकर, नगरसेवक मोहन पवार व यानंतर मुख्याधिकारी विनायक औंधकर व कर्मचाºयांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. वाया जाणारे पाणी बंद करण्यासाठी व्हॉल्व बंद करणे गरजेचे होते. जुनी पाईपलाईन असल्याने पाणीपुरवठा करणाºया कर्मचाºयांना व्हॉल्व लवकर सापडला नाही. मंगळवार दुपारी एक वाजता व्हॉल्व सापडल्यानंतर तो बंद करून दुरूस्तीसाठी कर्मचारी सरसावले.जामखेड शहराला पाणीपुरवठा करणाºया भुतवडा तलावात मंगळवार दुपारपर्यंत २८ .४३ दशलक्ष घनफूट इतका उपयुक्त पाणीसाठा होता. शहराला दररोज पाणी दिले तरी ते आणखी चार महिने पुरणार आहे. परंतु शहरातील अंतर्गत पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी जिर्ण झालेली आहे. तसेच भुतवडा तलाव ते पिण्याच्या पाण्याच्या टाकीपर्यंत सहा कि. मी. लांबीची जलवाहिनी ४५ वर्षे जुनी व जिर्ण झाली आहे. शहराचा वाढता विस्तार व वाढती लोकसंख्या पाहता या जुन्या जलवाहिनीवरून सर्व भागात पाणी मिळण्यासाठी पाच दिवस लागत आहेत. मंगळवारी दुपारनंतर जलवाहिनी दुरूस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू होते. संताजीनगर, मोरेवस्ती, राळेभात गल्ली, शिक्षक कॉलनी, मिलिंदनगर या भागाला पाणी पुरवठा होऊ शकला नाही. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांचे हाल झाले.

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरJamkhedजामखेड