शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

अहमदनगर जिल्ह्यातील साखर कारखान्यांच्या वाहतूक खर्चात वाढ; तोटा वाढणार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2020 12:51 IST

जिल्ह्यातील साखर उद्योगासाठी चालू हंगाम अत्यंत आव्हानात्मक ठरला आहे. सरासरी अवघ्या ९० दिवसांचे गाळप करताना कारखान्यांची दमछाक झाली आहे. कार्यक्षेत्रात ऊस नसल्याने अनेक कारखान्यांना अडीचशे किलोमीटर अंतरावरील पंढरपूर व नंदूरबार येथून गाळपासाठी ऊस आणावा लागला. त्यामुळे वाहतूक खर्चात वाढ होऊन आर्थिक फटका बसला.

शिवाजी पवार ।  श्रीरामपूर : जिल्ह्यातील साखर उद्योगासाठी चालू हंगाम अत्यंत आव्हानात्मक ठरला आहे. सरासरी अवघ्या ९० दिवसांचे गाळप करताना कारखान्यांची दमछाक झाली आहे. कार्यक्षेत्रात ऊस नसल्याने अनेक कारखान्यांना अडीचशे किलोमीटर अंतरावरील पंढरपूर व नंदूरबार येथून गाळपासाठी ऊस आणावा लागला. त्यामुळे वाहतूक खर्चात वाढ होऊन आर्थिक फटका बसला.साखर कारखानदारीसाठी १८० दिवसांचा हंगाम हा आर्थिकदृष्ट्या उत्तम मानला जातो. मात्र नगर जिल्ह्यात उसाच्या कमतरतेमुळे हंगाम सरासरी ९० दिवस चालला. जिल्ह्यातील गणेश, राहुरी, साईकृपा, श्रीगोंदे, कुकडी व पारनेर हे साखर कारखाने बंद ठेवण्याचा तेथील व्यवस्थापनाने निर्णय घेतला होता. खासगी व सहकारी अशा १३ कारखान्यांचे धुराडे पेटले होते. त्यातील ज्ञानेश्वर, मुळा व वृद्धेश्वर साखर कारखान्यांचे गाळप फेब्रुवारीच्या प्रारंभी बंद झाले. सध्या दहा कारखान्यांचा हंगाम सुरू असून मार्चच्या पंधरवाड्यापर्यंत सर्वच धुराडे बंद होतील.जिल्ह्यातील कारखान्यांच्या कार्यक्षेत्रात अल्प प्रमाणात ऊस उपलब्ध होता. त्यामुळे सर्वच कारखान्यांना ऊस मिळविण्यासाठी कसरत करावी लागली. अशोक साखर कारखान्याने यंदा धुळे जिल्ह्यातून ऊस उपलब्ध केला. याशिवाय संगमनेर, प्रवरा या कारखान्यांना जिल्ह्याबाहेर पडावे लागले. पंढरपूर, करमाळा, शिरपूर, जळगाव, जालना, नंदूरबार या भागातून त्यांनी ऊस आणला. त्यामुळे वाहतूक खर्च व पर्यायाने उत्पादन खर्च वाढला आहे. कारखाने कमी क्षमतेने चालवावे लागले. त्यातच साखरेचे दर वाढलेले नसल्याने तोट्यात वाढ होईल असा जाणकारांचा अंदाज आहे. कारखान्यांच्या अपुºया हंगामामुळे सहवीजनिर्मिती प्रकल्प, इथेनॉल निर्मितीसह व इतर उपपदार्थ निर्मितीवर विपरित परिणाम होणार आहे. 

नगर जिल्ह्यात यंदा ४७ ते ५० लाख टन उसाचे गाळप होईल असा अंदाज आहे. साखर उतारा सरासरी १० टक्क्यांच्या आसपास राहील. सर्वच कारखान्यांसाठी हा कसोटीचा हंगाम ठरला आहे. पूर्ण क्षमतेने कारखाने चालले नाहीत. त्यामुळे आर्थिक अडचणी वाढणार आहेत, असे अशोक सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक देवराव लोकरे यांनी सांगितले.  

टॅग्स :AhmednagarअहमदनगरSugar factoryसाखर कारखाने