शहरं
Join us  
Trending Stories
1
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."
2
Iran Terrorist Attack : Video - इराणवर मोठा दहशतवादी हल्ला; ८ जणांचा मृत्यू, १३ जखमी
3
धक्कादायक! राजस्थानमधील झालावाड शाळेतील दुर्घटनेनंतर आणखी एक निष्काळजीपणा, विद्यार्थ्याचे टायर पेटवून अंत्यसंस्कार
4
IND vs ENG: जसप्रीत बुमराह पुन्हा दुखापतग्रस्त? चौथ्या कसोटीदरम्यान गोलंदाजी प्रशिक्षकाचा खुलासा
5
गृहकर्जावरील व्याज अनुदान; सविस्तर जाणून घ्या, मोदी सरकारची ही खास योजना; पूर्ण होईल घर घेण्याचं स्वप्न!
6
पहिला श्रावणी रविवार: वैभवप्राप्तीसाठी आदित्य राणूबाई व्रत; वाचा व्रतविधी आणि द्या खिरीचा नैवेद्य!
7
NSE, SBI आणि IDBI साठी NSDL चा आयपीओ बनला मल्टीबॅगर मनी मशीन; ३९९९०% पर्यंत रिटर्न  
8
Shravan Somvar 2025: महादेवाला वाहिलेले बेलाचे पान टाकू नका, तेच करेल धनवृद्धी!
9
वर्षभर मसल पॉवर रसेलची बॅट सोबत बाळगली; तो निवृत्त झाल्यावर ती टीम डेविडच्या हाती तळपली
10
ओठ फुटलेत, कोरडे झालेत... ओठांना मॉइश्चरायझ करण्यासाठी लिप बाम की ऑइल काय आहे बेस्ट?
11
"मला दु:ख आहे की मी अशा सरकारला पाठिंबा देतोय जे..."; चिराग पासवान यांची संतप्त प्रतिक्रिया
12
१७ वर्ष जुनी कंपनी आणतेय IPO, SEBI कडे केला अर्ज; BSE आणि NSE मध्ये लिस्टिंगची शक्यता
13
Period Pain : ‘तिच्या’ आयुष्यातील ‘ते’ चार दिवस; कोवळ्या कळ्यांना पाळीचा अर्थ समजावताना कुठे कमी पडतोय आपण?
14
चीन नंबर १ आणि भारत दुसऱ्या क्रमांकावर, ही कोणती यादी ज्यात अमेरिका-इंडो​नेशिया आणि तुर्कीही राहिले मागे
15
भारत-यूके मुक्त व्यापार कराराने लक्झरी कारच्या किंमती दणक्यात कमी होणार; या वाहनांना मोठा फायदा मिळणार; तुमचा विश्वास बसणार नाही!
16
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
17
"...तर राहुल गांधी दुसरे आंबेडकर सिद्ध होतील", ओबीसी समाजाला आवाहन करत काँग्रेसच्या मोठ्या नेत्याचं विधान
18
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
19
माता न तू वैरिणी! बिर्याणीवाल्याच्या प्रेमात वेडी झाली टिकटॉक स्टार, पोटच्या लेकरांना संपवलं अन्...
20
ऑनलाईन मागवलं विष, दह्यामध्ये टाकून पतीला दोनदा पाजलं; पत्नीचा कारनामा पोलिसांनी केला उघड

राष्ट्रवादीत बेईमानांना शिक्षा नाही, इमानदारांची कदर नाही; राष्ट्रवादीच्या माजी प्रदेश उपाध्यक्षाची टीका

By साहेबराव नरसाळे | Updated: June 16, 2023 18:09 IST

पक्षाला प्रामाणिकपणे काम करणाऱ्यांची कदर नाही, अशी टीका राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष राहिलेले व नुकतेच बीआरएस पक्षात गेलेले घनश्याम शेलार यांनी केली.

अहमदनगर - राष्ट्रवादी पक्षात गेली २३ वर्ष आपण प्रामाणिकपणे काम केले. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे जे कृषीविषयक धोरण आहे, अगदी त्याच्या उलट धोरण पक्षातील लोकं राबवितात. पक्षात बेईमान नेत्यांचा भरणा होत असून, सध्या पक्ष राजकीयदृष्ट्या अस्थिर झाला आहे. पक्षातील बेईमान लोकांच्या अनेकदा तक्रारी केल्या. मात्र, पक्षा त्यांच्यावर काहीही कार्यवाही करीत नाही. तसेच पक्षाला प्रामाणिकपणे काम करणाऱ्यांची कदर नाही, अशी टीका राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष राहिलेले व नुकतेच बीआरएस पक्षात गेलेले घनश्याम शेलार यांनी केली.

शेलार यांनी शुक्रवारी (दि. १६) येथील शासकीय विश्रामगृहावर पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, १४ जून रोजी आपण राष्ट्रवादीतून बाहेर पडलो आहोत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे शेतकऱ्यांविषयी अत्यंत स्पष्ट धोरण होते. परंतु पक्षातील लोकं अगदी त्याविरोधात भूमिका घेतात. अनेक कारखानदार नेते शेतकऱ्यांची देणी देत नाहीत. एफआरपीप्रमाणे उस उत्पादक शेतकऱ्यांना पेमेंट देत नाहीत. पक्षातील अशा नेत्यांची व पक्षविरोधी भूमिका घेऊन विरोधी पक्षांना निवडणुकीत मदत करणाऱ्यांची आपण अनेकदा वरिष्ठांकडे तक्रारी केल्या. पण उपयोग झाला नाही.

राष्ट्रवादी हा शेतकऱ्यांचा कल्याणकारी पक्ष होईल, अशा अपेक्षेने आपण अनेक वर्ष मृगजळाच्या मागे धावत होतो. पण आता वास्तविक आशेचा किरण बीआरएसच्या रुपाने दिसला आहे. बीआरएसने तेलंगणामध्ये शेतकऱ्यांना सुखी जीवन दिले आहे. महाराष्ट्रात व देशातही हा बीआरएस पॅटर्न लागू व्हावा, यासाठी आपण बीआरएस पक्षात दाखल झालेलो आहे. पक्षाची आगामी विधानसभा व लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने जोरदार तयारी सुरु आहे. राज्यात लोकसभेच्या ४८ व विधानसभेच्या २८८ जागा लढण्यासाठी पक्षाची तयारी सुरु आहे, असेही शेलार म्हणाले.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरNCPराष्ट्रवादी काँग्रेस