शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
3
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
4
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
5
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
6
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
7
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
8
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
9
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
10
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
11
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
12
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
13
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
14
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
15
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
16
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
17
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
18
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
19
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
20
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
Daily Top 2Weekly Top 5

अहिल्यानगरमध्येही ‘मस्साजोग’; गटाराच्या चेंबरमध्ये कोंबून तरुणाची अमानुष हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2025 05:25 IST

याप्रकरणी अटक केलेल्या नऊ आरोपींना न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, अहिल्यानगर : बीडमधील मस्साजोगची घटना ताजी असतानाच अहिल्यानगरमध्ये दोन तरुणांना गटाराच्या चेंबरमध्ये कोंबून अमानुष मारहाण करण्यात आली. यात एकाचा मृत्यू झाल्यानंतर मृतदेह डोंगरात नेऊन जाळून टाकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी अटक केलेल्या नऊ आरोपींना न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे.

वैभव ऊर्फ सोन्या नायकोडी (१९, रा. ढवणवस्ती, अहिल्यानगर) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. २२ फेब्रुवारी रोजी सकाळी साडेआठ वाजता त्याचे अपहरण केले होते. त्यापूर्वी २१ फेब्रुवारी रोजी आरोपींनी संदेश भागाजी वाळूंज ऊर्फ गोट्या (वय १९, रा. नवनागापूर, एमआयडीसी) याचेही अपहरण केले होते.

संदेशला त्याच्या घरून कारमध्ये घालून बेदम मारहाण करण्यात आली. त्यानंतर एका निर्जनस्थळी नेऊन नवीन ले-आउटमध्ये गटारीसाठी केलेल्या चेम्बरमध्ये कोंबून मारहाण केली. या मारहाणीचा व्हिडीओ आरोपींनी काढला. तेथून त्याला नागापूर येथील एका फ्लॅटमध्ये रात्रभर डांबून ठेवले. दुसऱ्या दिवशी म्हणजे २२ फेब्रुवारीला संदेश याच्या मोबाइलवर वैभव नायकोडीचा संदेश आला, म्हणून आरोपींनी संदेशला वैभव नायकोडी यास फोन करण्यास सांगितले. संदेशने वैभवला फोन करून तपोवन रोडवरील एका रुग्णालयाजवळ बोलविले. 

आरोपींनी संदेशच्या डोळ्यावर पट्टी बांधून वैभव ज्या सलूनच्या दुकानावर थांबला होता तेथे नेले. नायकोडीची ओळख पटवली. त्यानंतर आरोपींनी दोघांना पुन्हा निर्जनस्थळी नेत चेम्बरमध्ये घालून मारहाण केली. त्या रात्री दोघांनाही फ्लॅटमध्ये डांबले. तेथे आरोपींनी त्यांना मॅगी खाण्यास दिली. संदेशने मॅगी खाल्ली, पण वैभवने नकार दिला. म्हणून, त्यास पुन्हा मारहाण केली. दुसऱ्या दिवशी पहाटे वैभवला आरोपींनी उठविण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो उठत नव्हता. तो मयत झाल्याचे लक्षात येताच त्याचा मृतदेह मनमाड रोडवरील केकताईच्या डोंगरात नेत जाळून टाकला. त्यानंतर आरोपींनी संदेशला घडल्या प्रकाराबाबत कोठे न बोलण्याची धमकी देत सोडले. वैभवच्या खुनाची घटना उघड झाल्यानंतर संदेशने पोलिसांत येत ही सर्व हकीगत सांगितली आहे.

हत्या का केली?

तरुणांच्या दोन टोळ्यांमध्ये वाद आहेत. गत १९ जानेवारीला आरोपी अनिकेत सोमवंशी याच्यावर एक अल्पवयीन मुलगा व त्याच्या इतर पाच साथीदारांनी कोयत्याने वार केले होते. मयत वैभव नायकोडी व संदेश हे दोघे सोमवंशीला मारहाण करणाऱ्या टोळीसोबत राहतात, या रागातून त्यांचे अपहरण केले होते.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी