शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs PAK W "म्हारी छोरियां छोरो से कम है के.." हरमनप्रीत ब्रिगेडनंही पाकची जिरवली!
2
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
3
मुंबईतील राजकीय नेत्याच्या मुलाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, शौचालयात गाठले आणि...
4
IND vs AUS : बढती मिळताच अय्यरनं टीम इंडियाला जिंकून दिली ट्रॉफी; घरच्या मैदानात कांगारुंची शिकार
5
गाझातील सत्ता सोडण्यास नकार दिल्यास हमासची धुळधाण उडवू, डोनाल्ट ट्रम्प यांची ताकिद 
6
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
7
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
8
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
9
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
10
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
11
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
12
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
13
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
14
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
15
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
16
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
17
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
18
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
19
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
20
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार

कोविड प्रतिबंधक लसीच्या प्रत्येक थेंबाला महत्त्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:20 IST

श्रीरामपूर : सरकारने ज्येष्ठ नागरिकांबरोबर १८ ते ४४ वयोगटातील तरुणांचे लसीकरण हाती घेतल्यामुळे लसीच्या एकेका थेंबाला महत्त्व प्राप्त झाले ...

श्रीरामपूर : सरकारने ज्येष्ठ नागरिकांबरोबर १८ ते ४४ वयोगटातील तरुणांचे लसीकरण हाती घेतल्यामुळे लसीच्या एकेका थेंबाला महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे लसीच्या बाटली किंवा कुपीतील एकही डोस वाया जाणार नाही, याची आरोग्य कर्मचारी खबरदारी घेत आहेत.

वाहतूक, साठवणूक व हाताळणीतील चुकांमुळे लसीचे डोस काही प्रमाणात वाया जात होते. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दहा टक्‍क्‍यांपर्यंत लस वाया जाते, अशी एक मर्यादा ठरवून दिली आहे. लसीकरण मोहीम देशभरात सुरू झाल्यानंतर प्रारंभीच्या काळात त्याला नागरिकांकडून फारसा प्रतिसाद मिळाला नव्हता. त्यामुळे बाटलीतील लस एखाद्या व्यक्तीला दिल्यानंतर इतर डोससाठी दुसऱ्या व्यक्तीची प्रतीक्षा करावी लागत होती. त्यामुळे लसीची बाटली वाया जाण्याचा धोका उद्भवत होता. आता मात्र लसीकरणाबाबत जागरूकता निर्माण झाली आहे. ज्येष्ठांबरोबरच १८ ते ४४ वयोगटातील तरुणही केंद्रावर गर्दी करत आहेत. त्यातच लसीचा अपुरा पुरवठा होत आहे. त्यामुळे केंद्रावरून लसीविना परतण्याची वेळ नागरिकांवर येत आहे.

-----

अशी असते लसीची मात्रा

एका बाटली किंवा कुपीत पाच मिली किंवा दहा मिली लसीची मात्रा असते. यातून दहा लोकांना लस देता येते. मात्र, कुणालाही कमी मात्रेचा डोस मिळू नये याकरिता कंपन्यांकडून १० मिलीपेक्षा काही अंशी जास्त लस एका बाटलीमध्ये दिली जाते.

-----

लसीकरण मोहिमेतील नर्स तसेच इतर आरोग्य कर्मचारी हे आपल्या कामात निपुण आहेत. अनुभवामुळे आता बाटलीतील डोस वाया जाणार नाहीत, याची ते पुरेपूर काळजी घेतात. त्यामुळे अधिकाधिक लोकांना लसीकरण करणे शक्य झाले आहे.

-योगेश बंड, ग्रामीण रुग्णालय, श्रीरामपूर

----

जिल्ह्याला दररोज सरासरी १० हजार डोस प्राप्त होतात. यात प्रत्येक दिवशी हे प्रमाण वेगवेगळे असते. जिल्ह्यात आतापर्यंत पाच लाख ४७ हजार नागरिकांचे लसीकरण झाले आहे. १८ ते ४४ वयोगटातील मात्र केवळ २० हजार जणांचे लसीकरण पूर्ण झाले आहे.

-----

डोस वाया जाण्याचे प्रमाण अत्यल्प

केंद्र सरकारने डोस वाया जाण्याचे प्रमाण दहा टक्के गृहीत धरले असले तरी जिल्ह्यात मात्र त्यापेक्षा खूप कमी लसींची मात्रा वाया जात आहे. पूर्वीच्या तुलनेमध्ये लस वाया जाण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर घटले आहे.