शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

ज्ञानसंपादनाची प्रेरणा गुलामाची असेल तर भाषा समृद्ध कशी होणार? - नारायण सुमंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2018 17:51 IST

इंग्रज जाऊन इतकी वर्षे झाली, पण आमच्यातला इंग्रज अजून गेला नाही. त्यामुळे भाषेचे वर्चस्वही आपण मान्य करत आहोत, असे प्रतिपादन कवी नारायण सुमंत यांनी केले.

अहमदनगर : इंग्रज जाऊन इतकी वर्षे झाली, पण आमच्यातला इंग्रज अजून गेला नाही. त्यामुळे भाषेचे वर्चस्वही आपण मान्य करत आहोत, असे प्रतिपादन कवी नारायण सुमंत यांनी केले. न्यू आर्टस महाविद्यालयाच्या मराठी विभागाच्यावतीने आयोजित मराठी राजभाषा दिनाच्या कार्यक्रमात सुमंत बोलत होते.नारायण सुमंत म्हणाले, जगण्याला जे प्रेरणा देते ते ज्ञान व तंत्रज्ञान आपण शिकत नाही. त्यामुळे अनेक समस्या आपल्याकडे निर्माण झाल्या आहेत. शेतकरी, कष्टकरी, कामगार आणि विद्यार्थी वर्गापासून ते शिक्षणापर्यंत अनेक विषय मातृभाषेतून आपणाला मांडता येतात. कवितेच्या माध्यमातून मराठी शब्दातून राजकीय, सामाजिक विषयावरील विडंबने व वात्रटिका प्रभावीपणे करता येतात, असेही ते म्हणाले.कुसुमाग्रजांच्या प्रतिमेस अभिवादन करुन कार्यक्रमाची सुरुवात झाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.बी.एच. झावरे होते. प्रास्तविक डॉ.सुनीता भांगे पाटील यांनी केले. पाहुण्यांचा परिचय डॉ.लक्ष्मीकांत येळवंडे यांनी करुन दिला. सूत्रसंचालन डॉ.महेबुब सय्यद यांनी केले. आभार डॉ.नवनाथ येठेकर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रा.निलेश लंगोटे व प्रा.स्वाती चौधरी यांनी परिश्रम घेतले.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरMarathi Language Day 2018मराठी भाषा दिन 2020