शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
2
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
3
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
4
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
5
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
6
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
7
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
8
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
10
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
11
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
12
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
13
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
14
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
15
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
16
सुट्टीसाठी तळमळणाऱ्या मंत्र्यांना ‘डिसेंबर’ हुडहुडी!
17
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
18
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
19
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
20
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस सत्तेवर आल्यास कर्जमाफीची हमी घेऊ : राधाकृष्ण विखे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2019 19:49 IST

राज्यामध्ये काँंग्रेस सरकार आल्यास शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करण्याची हमी आम्ही घेवू, अशी ग्वाही विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.

लोणी : राज्यामध्ये काँंग्रेस सरकार आल्यास शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करण्याची हमी आम्ही घेवू, अशी ग्वाही विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.दाढ बुद्रुक येथे सुमारे १ कोटी ९३ लाख रुपयांच्या विविध विकास कामांचा शुभारंभ आणि तलाठी कार्यालयाचे उद्घाटन मंगळवारी विरोधी पक्षनेते विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. शासन आपल्या दारी या उपक्रमातून मंजूर झालेल्या रेशनकार्डचे वितरणही या कार्यक्रमात करण्यात आले.माजी सभापती सुभाष गाडेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास कारखान्याचे उपाध्यक्ष कैलासराव तांबे, प्रतापराव तांबे, देवीचंद तांबे, अशोक गाडेकर, माजी सभापती मच्छिंद्र थेटे, दिनेश बर्डे, नंदाताई तांबे, पूनम तांबे, श्रावणराव वाघमारे, गोरक्षनाथ तांबे, प्रल्हाद बनसोडे, विजय तांबे यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.सत्ता कोणाचीही असो विकास कामांमध्ये आपण कुठेही कमी पडत नाही. सध्याच्या सरकारकडून केवळ आश्वासने मिळाली. २०१४ साली त्यांच्या भुलथापांना मतदार बळी पडले. सत्तेवर येताच आम्ही सातबारा कोरा करु म्हणणारे सत्तेवर येताच बदलले. काँग्रेस पक्षाने राज्यात जनसंघर्ष यात्रा काढली. याचा दबाव राज्य सरकारवर आल्यामुळेच सरकारला कर्जमाफीचा निर्णय घ्यावा लागला. पण ही कर्जमाफी जाचक नियम आणि अटींमध्ये अडकविली. त्यांच्या कर्जमाफी योजनेचा कोणालाही लाभ झाला नाही. त्यामुळे या सरकारला खाली खेचल्याशिवाय पर्याय नाही.मोदी सरकार देशात दोन कोटी युवकांना नोकºया देणार होते. मात्र यांच्या नोटाबंदीच्या निर्णयामुळे अनेकांना आपला रोजगार गमवावा लागला. वाढत्या बेरोजगारीचा ४५ वर्षातील उच्चांक या निमित्ताने समोर आला. वाढत्या बेरोजगारीमुळे युवकांमध्ये नैराश्य आलेले आहे. त्यामुळेच या सरकारच्या विरोधात संघटीतपणे आता मुकाबला करावा लागेल. या सरकारच्या कोणत्याही धोरणांचा लाभ सामान्य माणसाला झालेला नाही. या सरकारच्या विरोधात आता लोकशाही मार्गानेच आपल्याला न्याय मिळवावा लागेल असे त्यांनी विखे म्हणाले. 

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरRadhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटील