शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड यांच्या राजीनाम्याचं टायमिंग अनेकांना न पटण्यासारखे; 'त्या' ३ तासांत काय घडले?
2
एकदा- दोनदा नाही, एअर इंडियाला सहा महिन्यात ९ कारणे दाखवा नोटीस बजावल्या; सरकारची माहिती
3
४ मुलांच्या आईनं २४ वर्षाच्या युवकाशी केलं कोर्ट मॅरेज; पतीनं सोडला सुटकेचा नि:श्वास, म्हणाला...
4
जगदीप धनखड यांचा उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा; प्रकृतीच्या कारणास्तव निर्णय
5
आजचे राशीभविष्य, २२ जुलै २०२५: 'या' २ राशींसाठी लाभदायी दिवस, अचानक धनलाभ होईल
6
'आम्ही अणुकार्यक्रम सुरूच ठेवणार', युरोपीय देशांशी चर्चेपूर्वी इराणचा अमेरिकेला संदेश
7
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
8
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
9
एअर इंडिया विमानाचे तीन टायर फुटले; विमानतळावर लँडिंगच्या वेळी पावसामुळे विमानाने धावपट्टी सोडली
10
मुख्यमंत्र्यांनी कोकाटेंना सुनावले; जे काही घडले ते भूषणावह नाही!
11
ब्रिगिट मॅक्रॉन ‘पुरुष’? खटले आणि वादांना ऊत! दाव्याची सत्यता काय?
12
अंधेरी मेट्रो स्थानकात गळती; पाणी गोळा करण्यासाठी बादल्यांचा वापर
13
भाजपचा नवा फॉर्म्युला; प्रत्येक आमदाराची पाच कामे होणार! पालिका निवडणुकीसाठी रणनीती
14
परिचारिकांच्या संपामुळे पाच दिवसांपासून रुग्णांचे हाल; नियमित शस्त्रक्रियाही पूर्णपणे बंद
15
विधवा महिलेस १.२० लाखात गुजरातेत विकले, दोन वर्षांनी पुत्रप्राप्तीनंतर आणून गावात सोडले!
16
सोळावे वरीस... धोक्याचे नव्हे, निवडणुकीत मत देण्याचे! ब्रिटनचा धाडसी निर्णय; युवाशक्ती लोकशाहीत सहभागी!
17
शेअर ट्रेडिंगच्या बहाण्याने वृद्धेसह पायलटला १० कोटींचा गंडा; बनावट ॲपचा वापर करून लावला चुना
18
६३ खासदार म्हणतात, न्या. वर्मांना पदावरून हटवा! कारण काय?
19
संपादकीय : नामुष्कीचा बॉम्ब, १९ वर्षांनंतरही पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह
20
महाराष्ट्रातील ४ लाख शेतकरी लाभार्थी यादीतून झाले गायब; लाभार्थी १०.२ लाखांवरून केवळ १५ हजारांवर

काँग्रेस सत्तेवर आल्यास कर्जमाफीची हमी घेऊ : राधाकृष्ण विखे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2019 19:49 IST

राज्यामध्ये काँंग्रेस सरकार आल्यास शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करण्याची हमी आम्ही घेवू, अशी ग्वाही विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.

लोणी : राज्यामध्ये काँंग्रेस सरकार आल्यास शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करण्याची हमी आम्ही घेवू, अशी ग्वाही विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.दाढ बुद्रुक येथे सुमारे १ कोटी ९३ लाख रुपयांच्या विविध विकास कामांचा शुभारंभ आणि तलाठी कार्यालयाचे उद्घाटन मंगळवारी विरोधी पक्षनेते विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. शासन आपल्या दारी या उपक्रमातून मंजूर झालेल्या रेशनकार्डचे वितरणही या कार्यक्रमात करण्यात आले.माजी सभापती सुभाष गाडेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास कारखान्याचे उपाध्यक्ष कैलासराव तांबे, प्रतापराव तांबे, देवीचंद तांबे, अशोक गाडेकर, माजी सभापती मच्छिंद्र थेटे, दिनेश बर्डे, नंदाताई तांबे, पूनम तांबे, श्रावणराव वाघमारे, गोरक्षनाथ तांबे, प्रल्हाद बनसोडे, विजय तांबे यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.सत्ता कोणाचीही असो विकास कामांमध्ये आपण कुठेही कमी पडत नाही. सध्याच्या सरकारकडून केवळ आश्वासने मिळाली. २०१४ साली त्यांच्या भुलथापांना मतदार बळी पडले. सत्तेवर येताच आम्ही सातबारा कोरा करु म्हणणारे सत्तेवर येताच बदलले. काँग्रेस पक्षाने राज्यात जनसंघर्ष यात्रा काढली. याचा दबाव राज्य सरकारवर आल्यामुळेच सरकारला कर्जमाफीचा निर्णय घ्यावा लागला. पण ही कर्जमाफी जाचक नियम आणि अटींमध्ये अडकविली. त्यांच्या कर्जमाफी योजनेचा कोणालाही लाभ झाला नाही. त्यामुळे या सरकारला खाली खेचल्याशिवाय पर्याय नाही.मोदी सरकार देशात दोन कोटी युवकांना नोकºया देणार होते. मात्र यांच्या नोटाबंदीच्या निर्णयामुळे अनेकांना आपला रोजगार गमवावा लागला. वाढत्या बेरोजगारीचा ४५ वर्षातील उच्चांक या निमित्ताने समोर आला. वाढत्या बेरोजगारीमुळे युवकांमध्ये नैराश्य आलेले आहे. त्यामुळेच या सरकारच्या विरोधात संघटीतपणे आता मुकाबला करावा लागेल. या सरकारच्या कोणत्याही धोरणांचा लाभ सामान्य माणसाला झालेला नाही. या सरकारच्या विरोधात आता लोकशाही मार्गानेच आपल्याला न्याय मिळवावा लागेल असे त्यांनी विखे म्हणाले. 

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरRadhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटील