शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

पत्नीने विरोधात साक्ष दिल्याने पतीची जाळून घेत आत्महत्या; सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2025 12:32 IST

सागर सुधारक निमसे (वय २६, रा. खारेकुर्जने) असे मयत तरुणाचे नाव आहे. याबाबत एमआयडीसी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

अहिल्यानगर : लग्न झाल्यानंतर सहा महिन्यांनी पती-पत्नीत वाद झाला. हा वाद न्यायालयात गेला. सुनावणी दरम्यान पत्नीने विरोधात साक्ष दिल्याने नाराज झालेल्या पतीने अंगावर ज्वलनशील पदार्थ अंगावर ओतून स्वतःला संपविल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. ही घटना शुक्रवारी (दि. २१) खारेकर्जुने (ता. अहिल्यानगर) शिवारात घडली. 

सागर सुधारक निमसे (वय २६, रा. खारेकुर्जने) असे मयत तरुणाचे नाव आहे. याबाबत एमआयडीसी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयत तरुणाचे अडीच वर्षापूर्वी लग्न झाले होते. लग्नानंतर सहा महिन्यांपासून पत्नी नांदत नव्हती. ती माहेरी आईकडे राहत होती. पती-पत्नीचा वाद न्यायालयात गेला. येथील जिल्हा न्यायालयात शुक्रवारी (दि. २१) सुनावणी होती. या सुनावणीला पत्नीही हजर होती.

सुनावणी दरम्यान पत्नीने सागरच्या विरोधात साक्ष दिली, असे सागर याचे म्हणणे होते. याचा राग मनात धरून सागरने टोकाचे पाऊल उचलले. त्याने सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल केली. त्यानंतर सागरने अंगावर ज्वलनशील पदार्थ ओतून घेऊन आत्महत्या केली. दुसऱ्या दिवशी सागर घरी आला नाही. त्यामुळे नातेवाइकांनी शोध घेतला असता हिंगणगाव ते खारेकर्जुने रोडवर त्याचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत मिळून आला.

टॅग्स :Ahilyanagarअहिल्यानगर