शहरं
Join us  
Trending Stories
1
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
2
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
3
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
4
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
5
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार
6
“धर्म-भाषा काहीही असो, आपण सर्व हिंदू आहोत; ब्रिटिशांनी आपल्यात फूट पाडली”- मोहन भागवत
7
"...तोपर्यंत मी तुरुंगात राहण्यास तयार आहे"; सोनम वांगचुक यांनी जोधपूरहून भावाकडे पाठवला मेसेज
8
INDW vs PAKW: अचानक मैदानात पसरला पांढरा धूर: भारत-पाक सामन्यात नेमकं काय घडलं?
9
IND W vs PAK W : पुरुष असो वा महिला, नो हँडशेक फॉर्म्युला! हरमनप्रीतनं पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ
10
‘’२०२७ चा वर्ल्डकप खेळायला मिळाला तर…’’, बोलता बोलता रोहित झाला होता भावूक, तो व्हिडीओ होतोय व्हायरल  
11
बिहारमध्ये केव्हा होणार विधानसभा निवडणूक? CEC ज्ञानेश कुमार यांची घोषणा; SIR संदर्भातही मोठं विधान
12
गुजरातमधून आणलेला सिंह तामिळनाडूच्या प्राणीसंग्रहालयातून पळाला; स्थानिकांमध्ये घबराट...
13
EMI थकवला तर फोन, लॅपटॉप होणार लॉक! RBI चा नवा नियम; कर्ज वसुलीसाठी बँकांना मिळणार 'हे' अधिकार
14
अनिल परबांचे आरोप, ज्योती रामदास कदम पहिल्यांदाच मीडियासमोर आल्या; आगीची घटना कशी घडली?
15
"केस ओढले, इस्रायलच्या ध्वजाला किस करायला लावलं"; ग्रेटा थनबर्गला अमानुष वागणुकीचा आरोप, प्रकरण काय?
16
अनर्थ टळला! लँडिंगपूर्वी एअर इंडिया विमानाचं RAT एक्टिव्ह; बर्मिघम रनवेवर विमान सुरक्षित उतरवलं
17
देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी खिशात किती कॅश ठेवतात? स्वतःच केला खुलासा
18
Nashik Crime: टोळी संघर्षातून गोळीबार, भाजप नेत्यानंतर म्होरक्या विकी वाघसह साथीदार अडकला जाळ्यात
19
रोहित शर्माला कर्णधार पदावरून हटवण्यामागचं 'गंभीर' कनेक्शन; जाणून घ्या सविस्तर
20
Rape Case: पार्टीसाठी बोलावलं, शिक्षकेवर चार जीम ट्रेनर्संनी केला सामूहिक बलात्कार; आरोपींची नावे आली समोर

शेकडो हेक्टर जमीन येणार ओलिताखाली : निळवंडे धरण कालव्यांच्या कामाला वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2019 14:48 IST

निळवंडे धरणाच्या प्रस्तावित कालवे खोदण्याच्या कामास सुमारे ४७ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर सुरुवात झाली.

हेमंत आवारी अकोले : निळवंडे धरणाच्या प्रस्तावित कालवे खोदण्याच्या कामास सुमारे ४७ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर सुरुवात झाली. अकोले तालुक्यातील डाव्या कालव्याचे २८ किलोमीटर तर उजव्या कालव्याचे १८ किलोमीटर काम पहिल्या टप्प्यात होत आहे. कालवा खोलीकरण, रुंदीकरणाच्या कामांनी वेग घेतला आहे. ही कामे पूर्ण झाल्यानंतर शेकडो हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहे़लाभक्षेत्रातील अवर्षणप्रवण गावातील शेतकऱ्यांची कालव्यांसाठीची प्रतीक्षा कमी झाली आहे. पूर्वीचे म्हाळादेवी आणि आताचे निळवंडे धरण निर्मितीला ७०च्या दशकात सुरु झाली. ९० च्या दशकात निळवंडे-२ ची जागा निश्चित होऊन ८.३२ टीएमसी क्षमतेच्या धरणाच्या भिंतीच्या बांधकामाला सुरुवात झाली. २००८ पासून धरणात पाणी साठविण्यास सुरुवात झाली. पण अकोले तालुक्यातील कालव्यांची कामे रखडली होती. लाभक्षेत्रातील निळवंडेच्या पाण्याची गेली पाच दशक वाट पाहणाºया वंचित शेतकऱ्यांनी संघर्षाची मशाल पेटवली. त्या संघर्षाचे फलित कालव्यांच्या कामांना १२ जूनला मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने सुरुवात झाली. निदान आता तरी तिसºया पिढीला निळवंडे कालव्याचे पाणी पहायला मिळेल, यात शंका नाही.अडीच वर्षाने कालव्यांतून वाहिल पाणीअकोलेतील बागायत क्षेत्रातून हे कालवे जात असल्याने साहजिकच ज्यांचे बागायत बुलडोझरने तुडवून उद्ध्वस्त झाले, ‘त्या’ शेतक-यांच्या डोळ्यात आसवं आल्याखेरीज राहिली नाहीत. न्यायालयाचा धाक आणि पोलीस बळ यातून अकोलेकरांचा कालव्यांसाठीचा विरोध मावळला. भूमिगत कालव्यांची मागणी विरुन गेली. तालुक्यातील ५७० खातेदार शेतक-यांची उजव्या कालव्यासाठी ११४ हेक्टर तर ९०० खातेदार शेतक-यांची डाव्या कालव्यासाठी १७१ हेक्टर शेतजमीन ८०च्या दशकातच शासनाने संपादित केली आहे. कालव्यांच्या बांधकाम ठिकाणी ३०० फूट तर बांधकाम नसलेल्या ठिकाणी २०० फूट अशी जमीन संपादित केली आहे. सध्या गरजेइतक्याच जमिनीवर कालवे खोदाईचे काम प्रगतीपथावर आहे. सुमारे अडीच वर्षात कालवे पूर्ण होऊन धरणातील पाणी कालव्यांतून लाभक्षेत्राकडे झेपावेल असे अपेक्षित आहे.कालव्यांसाठी २८५ हेक्टर जमीन संपादिततालुक्यातील एकूण २८५ हेक्टर जमीन कालव्यांसाठी संपादित आहे. भविष्यात यातील काही जमीन शेतकºयांना भाडेतत्वावर शेती करण्यासाठी वापरायला देण्याचा सरकारचा मानस आहे. म्हाळादेवी जलसेतूपासून पुढे कालवा खोलीकरण व रुंदीकरणाच्या कामास सुरुवात करण्यात आली आहे. कालवे बांधकामक्षेञात कलम १४४(३) लागू असल्याने कालवे कामसुरु असलेल्या ठराविक शंभर दीडशे फूटाच्या अंतरात जमावबंदी आदेश आहे. कार्यकारी अभियंता भारत शिंगाडे, उपअभियंता मनोज डोके, रोहित कोरे, तहसीलदार मुकेश कांबळे, पोलीस उपअधीक्षक अशोक थोरात व पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख हे कालव्यांच्या कामांवर बारीक लक्ष ठेवून आहेत.अधिकारीपदाचा बडेजाव बाजूला ठेवून कालवाग्रस्त शेतक-यांच्या भावना समजून घेऊन कालवे खोदाईला सुरुवात केल्याने शेतक-यांचा रोष मावळला आहे. शेतकरी सहकार्य करीत असल्याने कामाची गतीही वाढली आहे. कालव्यांची जमीन साफसफाई व सपाटीकरणाचे पहिल्या टप्प्यातले काम पूर्ण झाले आहे. आता कालवा खोलीकरण व रुंदीकरणाचे काम सुरु आहे. खोदलेल्या कालव्यांमधे कुणीही अतिक्रमण करु नये. -भारत शिंगाडे, कार्यकारी अभियंता,निळवंडे कालवे विभाग.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरAkoleअकोले