शहरं
Join us  
Trending Stories
1
सोलापूरात भाजपात दुफळी! "बाहेरून येणाऱ्यांनी किमान ३-४ वर्ष पक्षाचं काम करावं, त्यानंतरच.."
2
मोठी बातमी! १२ हजार भावांनी घेतला लाडकी बहीण योजनेचा लाभ; १६४ कोटींचा घोटाळा आला समोर
3
मुहूर्त ट्रेडिंग: शेअर बाजारात तेजी; निफ्टी वर्षाच्या सर्वोच्च पातळीवर, सेन्सेक्स 62 अंकांनी वधारला
4
BCCI: "आशिया चषक भारताला न दिल्यास..." बीसीसीआयचा मोहसिन नक्वी यांना इशारा!
5
अमित शाह यांच्यावर गंभीर आरोप, प्रशांत किशोर यांनी दाखवला फोटो; जनसुराजच्या उमेदवाराचं अपहरण?
6
अमेरिकेचा 88 लाखांचा H-1B व्हिसा आजपासून लागू; भारतीयांना मोठा दिलासा...
7
Beed: फटाका विझलाय समजून पुन्हा पेटवायला गेला अन्...; बीडमध्ये सहा वर्षांच्या मुलासोबत भयंकर घडलं!
8
"तात्या विंचू तुम्हाला चावेल...", संजय राऊतांच्या टीकेवर महेश कोठारेंची प्रतिक्रिया, म्हणाले- "ते माझ्याविषयी जे बोलले..."
9
Alyssa Healy : बॅक टू बॅक सेंच्युरी, तरीही स्टार्कच्या बायकोवर आली बाकावर बसण्याची वेळ; कारण...
10
Bhai Dooj 2025: भाऊबीजेसाठी पार्लर ग्लो फक्त चार स्टेप मध्ये! तोही घरच्या साहित्यात, चेहऱ्यावर आणा नैसर्गिक तेज!
11
युनूस सरकारला IMFचा मोठा धक्का! बांगलादेशला दिली जाणारी ८०० दशलक्ष डॉलर्सची मदत थांबवली...
12
"मला तू आवडत नाहीस, कधीच आवडणार नाहीस"; व्हाईट हाऊसमध्ये राडा, ऑस्ट्रेलियन राजदूताला ट्रम्प यांचा टोला
13
India Probable Playing 11 vs Australia 2nd ODI: कांगारुंना जाळ्यात अडकवण्यासाठी गंभीर हा डाव खेळणार?
14
नीतीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री बनूच शकणार नाहीत..! बिहार निवडणुकांपूर्वी मोठी भविष्यवाणी
15
Bhai Dooj 2025: यमराज भाऊबीजेला आले, तेव्हा यमुनेला काय मिळाली ओवाळणी?
16
मृत्यूनंतरही घरात फिरतोय पत्नीचा आत्मा, अभिनेत्याने सांगितला अनुभव म्हणाला- "अचानक कापूरचा वास आला आणि..."
17
चाळीसगावचे माजी आमदार राजीव देशमुख यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन
18
चंद्रपुरात दोन देशी कट्टे, दोन माऊझर, ३५ जिवंत काडतुसे, चार खंजिरांसह चौघांना अटक
19
ट्रम्प यांचा नवा वादग्रस्त निर्णय ! गांजा विक्रेत्याला केले अमेरिकेचा इराकमधील 'विशेष दूत'

हिवरेबाजार होणार अहमदनगर जिल्ह्यातील पहिले कोरोनामुक्त गाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 18:58 IST

आदर्शगाव हिवरेबाजार १५ मे रोजी कोरोनामुक्त होणार आहे. या गावात दोन महिन्यांत ५० जणांना कोरोनाची बाधा झाली होती. यावेळी लक्षणे असलेल्या नागरिकांची त्वरित कोरोना चाचणी, पॉझिटिव्ह रुग्णांना विलगीकरणात ठेवण्यात आले होते. तसेच ग्रामस्थांनी नियमांचे पालन केल्याने गाव कोरोनामुक्त होत आहे.

अहमदनगर : आदर्शगाव हिवरेबाजार १५ मे रोजी कोरोनामुक्त होणार आहे. या गावात दोन महिन्यांत ५० जणांना कोरोनाची बाधा झाली होती. यावेळी लक्षणे असलेल्या नागरिकांची त्वरित कोरोना चाचणी, पॉझिटिव्ह रुग्णांना विलगीकरणात ठेवण्यात आले होते. तसेच ग्रामस्थांनी नियमांचे पालन केल्याने गाव कोरोनामुक्त होत आहे. पद्मश्री पोपटराव पवार हे ग्रामस्थांशी संवाद साधत त्यांना धीर देत असल्याने रुग्णांचेही मनोबल वाढले आहे.

अहमदनगर तालुक्यातील आदर्श गाव हिवरेबाजारमध्ये एप्रिल व मे महिन्यात एकूण ५० व्यक्ती कोरोना संक्रमित झाल्या होत्या. त्यापैकी ३२ रुग्ण गावातील होते तर १८ रुग्ण हे हिवरेबाजार येथील रहिवासी परंतु कामानिमित्त बाहेरगावी गेले होते. यातील २ व्यक्तींचा मृत्यू झाला तर ५ रुग्णांना व्हेंटिलेटरची आवश्यकता होती. यशवंत कृषी ग्राम व पाणलोट विकास संस्थेच्या हिवरेबाजार प्रशिक्षण केंद्रावरील विलगीकरण कक्षात २५ रुग्णांना ठेवण्यात आले होते. तर १८ रुग्ण हे स्वत:च्या घरीच अलगीकरणात होते. सध्या गावात फक्त १ रुग्ण सक्रिय असून, तो नगर येथील जिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहे. १५ मे २०२१पर्यंत हिवरे बाजार गाव कोरोनामुक्त गाव करण्याचा संकल्प ग्रामपंचायत हिवरेबाजार, कोरोना समिती, प्राथमिक आरोग्य उपकेंद्र, हिवरेबाजार, यशवंत कृषी ग्राम व पाणलोट संस्था, ग्रामस्थ व स्वयंसेवक यांनी केला आहे. यासाठी मुंबादेवी सहकारी दूध उत्पादक संस्था, वाहतूक करणारे गाडीमालक, किराणा दुकानदार, प्राथमिक शाळा हिवरेबाजार, शिक्षक, यशवंत माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक या सर्वांनी नियमांचे काटेकोर पालन केले. तसेच उपाययोजना राबविण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉ. शिवानी देशपांडे व त्यांचे सर्व सहकारी, टाकळी खातगावचे डॉ. शंकर केदार, डॉ. राऊत, तलाठी संतोष पाखरे, ग्रामसेवक सचिन थोरात, डॉ. योगेश पवार, डॉ. सुशील पादीर, सरपंच विमल ठाणगे, विजय ठाणगे, दीपक ठाणगे यांचे सहकार्य मिळाले.

गावात स्वयंसेवकांची पथके

सध्या शेतीची कामे जोरात सुरु असल्यामुळे शेतात काम करण्यासाठी बाहेरुन कोकण, विदर्भ व परिसरातील जवळपास ३०० शेतमजूर येतात. या सर्वांची वेळेवर तपासणी, शेतात विलगीकरणामुळे त्यांचा कुटुंबाशी संपर्क येत नाही. यासाठी गावातील स्वयंसेवकांची ४ पथके तयार करण्यात आली आहेत. प्रत्येक आठवड्याला ऑक्सिजन व तापमान तपासणी करण्यात येते. त्यानुसार नोंदी ठेवण्यात आल्या आहेत. त्यात एखादा संशयित आढळल्यास त्याची लगेच टाकळी खतगाव व हिवरे बाजार येथील प्राथमिक आरोग्य केंद्रावर कोरोना चाचणी करण्यात येते. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वेळेत उपचाराचे धोरण घेऊन व प्रशिक्षण केंद्रावर रुग्णांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात येते. संक्रमित रुग्णांची प्राथमिक आरोग्य उपकेंद्रातील कर्मचाऱ्यांमार्फत दिवसातून दोनवेळा तपासणी करण्यात येते. गावातील ४ वाहने ही कोविड संक्रमित रुग्णांची तपासणी व उपचारासाठी ठेवण्यात आली आहेत. या सर्व उपायांमुळे रुग्ण चिंतामुक्त, कोरोनामुक्त होत आहेत, असे पोपटराव पवार यांनी सांगितले.

संवादाने वाढले मनोबल

पद्मश्री पोपटराव पवार हे दररोज गावातील २५ कुटुंबांना भेट देऊन चर्चा करतात. तसेच प्रशिक्षण केंद्रातील विलगीकरण कक्षाला सकाळी व संध्याकाळी भेट देऊन कोरोनाबाधित रुग्णांशी चर्चा करतात. स्वत:च्या घरी अलगीकरणत असलेल्या रुग्णांना एकवेळ भेटून चर्चा करतात. तसेच हॉस्पिटलमधील रुग्णांशीही दूरध्वनीवर बोलतात. संबंधित डॉक्टरांशी बोलल्यामुळे रुग्णांचे मनोबल वाढते व मनातील भीती दूर होते. ग्रामपंचायतीने ऑक्सिमीटर, हॅण्डग्लोव्हज्, आयपॅड, सॅनिटायझर, ई-सुविधा उपलब्ध केल्यामुळे कर्मचारी व स्वयंसेवक बाधित झालेले नाहीत. तसेच कोविड रुग्णांची वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या चालकांची विशेष काळजी घेतली जाते.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस