शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
6
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
7
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
8
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
9
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
10
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
11
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
12
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
13
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
14
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
15
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
16
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
17
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
18
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
19
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
20
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज

शेवगाव तालुक्यातील शेतक-यांवरील गोळीबाराची उच्चस्तरीय चौकशी- सदाभाऊ खोत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2017 18:57 IST

शेवगाव येथील ऊस दरासाठी आंदोलन करणा-या शेतक-यांवर गोळीबार योग्य नाही़ गोळीबाराची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कडक कारवाई केली जाईल, असे आश्वासन कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी शुक्रवारी येथे दिले.

अहमदनगर : शेवगाव येथील ऊस दरासाठी आंदोलन करणा-या शेतक-यांवर गोळीबार योग्य नाही़ गोळीबाराची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कडक कारवाई केली जाईल, असे आश्वासन कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी शुक्रवारी येथे दिले.शेवगाव तालुक्यातील पोलिसांनी आंदोलनकर्त्यांवर केलेल्या गोळीबारात जखमी शेतक-यांची खोत यांनी भेट घेऊन प्रकृतीची विचारपूस केली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. खोत म्हणाले, अन्नदात्या शेतक-यांवर लाठीचार्ज करणे योग्य नाही़ एफआरपीप्रमाणे उसाला भाव देण्याची शेतक-यांची मागणी आहे. शेतक-यांनी या मागणीसाठी आंदोलन केले. त्यांच्यावर पोलिसांनी गोळीबार केला. या घटनेचे कुणीही समर्थन करणार नाही, असे सांगून त्यांनी पोलीस प्रशासनावर निशाणा साधला. मात्र राज्याला स्वतंत्र गृहमंत्री देण्याच्या विरोधी पक्षांनी केलेल्या मागणीबाबत पत्रकारांनी छेडले असता गृहमंत्री पद सांभाळण्यासाठी मुख्यमंत्री सक्षम असल्याचे सांगून त्यांनी मुख्यमंत्र्यांचे समर्थन केले.ऊस दरासाठीच्या आंदोलनात सहभागी शेतक-यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्याचा अहवाल येत्या आठ दिवसांत प्राप्त होईल, याबाबत योग्य तो निर्णय सरकार घेईल. तसेच ऊस दराबाबत येत्या २३ नोव्हेंबर रोजी साखर कारखान्यांचे प्रतिनिधी व शेतक-यांची संयुक्त बैठक बोलविण्यात आल्याचे खोत यावेळी म्हणाले.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरSadabhau Khotसदाभाउ खोत ShevgaonशेवगावFarmerशेतकरीMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार